शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

दररोज दहा ग्लास पाणी प्या; उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळा

By निखिल म्हात्रे | Updated: May 19, 2024 17:31 IST

वाढत्या उन्हाळ्यात दक्षता घ्या; लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार करा

अलिबाग : उन्हाळा आला की आपल्याला डिहायड्रेशनची समस्या सतावते. शरीरात पाणी कमी असेल तर ही समस्या निर्माण होते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे लागते. अनेकदा डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे काहीजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे याचा त्रास वाढतो. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.

सध्या उष्णतेचे प्रमाण हे फारच वाढत आहे. त्यातून वातावरणात देखील सतत बदल होत आहेत. त्यामुळे आपण याकडे नीट लक्ष देणे फार आवश्यक असते. दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याचा अर्थ निदान आठ ते दहा ग्लास तरी आपण रोज पाणी पिणे आवश्यक असते. सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्याला दररोज जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. आपल्या शरीराला नीट हायड्रेड ठेवायला हवे. कामाच्या गडबडीत आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. आपल्याला पाणी पिणे जमले नाही तर ताज्या फळांचा रस पिणे महत्त्वाचे असते. जाणून घ्या कारणे -सोडियम, मग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आदी इलेक्ट्रोलाइटसच्या कमतरतेमुळे ही डिहायड्रेशनची समस्या भेडसावू शकते.त्यातून मधुमेहाच्या लक्षणांमुळेही हा त्रास होऊ शकतो जसे की, सतत लघवीला होणे, यात आपल्या शरीरातील साखर वाढली की मग शरीर ही साखर लघवीतून बाहेर टाकते. तेव्हा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुर्लक्ष नको महिलांमध्ये -डिहायड्रेशनची समस्या वाढल्यास तोंड कोरडे पडणे, जास्त तहान लागणे, लघवी कमी प्रमाणात होणे किंवा न होणे. जास्त प्रमाणात धाप, लागणे, ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. डिहायड्रेशनची लक्षणे -साधारणपणे जास्त प्रमाणात पिवळी लघवी होणे हे एक प्रामुख्याने दिसणारे लक्षण आहे. जेव्हा लघवी पिवळी होत असेल तर समजावे की डिहायड्रेशनचा त्रास आहे. त्यानंतर श्वासाची दुर्गंधी येणे ही लक्षणे दिसू लागतात. डिहायड्रेशन झाल्यास जास्त प्रमाणात घाम येणे किंवा मग अजिबातच घाम न येणे ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसताच यावर तत्काळ उपचार घ्यावेत.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग