शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

दररोज दहा ग्लास पाणी प्या; उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळा

By निखिल म्हात्रे | Updated: May 19, 2024 17:31 IST

वाढत्या उन्हाळ्यात दक्षता घ्या; लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार करा

अलिबाग : उन्हाळा आला की आपल्याला डिहायड्रेशनची समस्या सतावते. शरीरात पाणी कमी असेल तर ही समस्या निर्माण होते. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे लागते. अनेकदा डिहायड्रेशनच्या लक्षणांकडे काहीजण दुर्लक्ष करतात. त्यामुळे याचा त्रास वाढतो. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असते.

सध्या उष्णतेचे प्रमाण हे फारच वाढत आहे. त्यातून वातावरणात देखील सतत बदल होत आहेत. त्यामुळे आपण याकडे नीट लक्ष देणे फार आवश्यक असते. दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याचा अर्थ निदान आठ ते दहा ग्लास तरी आपण रोज पाणी पिणे आवश्यक असते. सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे आहे. त्यामुळे आपल्याला दररोज जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. आपल्या शरीराला नीट हायड्रेड ठेवायला हवे. कामाच्या गडबडीत आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. आपल्याला पाणी पिणे जमले नाही तर ताज्या फळांचा रस पिणे महत्त्वाचे असते. जाणून घ्या कारणे -सोडियम, मग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आदी इलेक्ट्रोलाइटसच्या कमतरतेमुळे ही डिहायड्रेशनची समस्या भेडसावू शकते.त्यातून मधुमेहाच्या लक्षणांमुळेही हा त्रास होऊ शकतो जसे की, सतत लघवीला होणे, यात आपल्या शरीरातील साखर वाढली की मग शरीर ही साखर लघवीतून बाहेर टाकते. तेव्हा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुर्लक्ष नको महिलांमध्ये -डिहायड्रेशनची समस्या वाढल्यास तोंड कोरडे पडणे, जास्त तहान लागणे, लघवी कमी प्रमाणात होणे किंवा न होणे. जास्त प्रमाणात धाप, लागणे, ताप येणे अशी लक्षणे आढळल्यास याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. डिहायड्रेशनची लक्षणे -साधारणपणे जास्त प्रमाणात पिवळी लघवी होणे हे एक प्रामुख्याने दिसणारे लक्षण आहे. जेव्हा लघवी पिवळी होत असेल तर समजावे की डिहायड्रेशनचा त्रास आहे. त्यानंतर श्वासाची दुर्गंधी येणे ही लक्षणे दिसू लागतात. डिहायड्रेशन झाल्यास जास्त प्रमाणात घाम येणे किंवा मग अजिबातच घाम न येणे ही लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे दिसताच यावर तत्काळ उपचार घ्यावेत.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग