शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

कारखानदारांकडून सांडपाण्याचा गटारात निचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 00:24 IST

सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.

सिकंदर अनवारे दासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी थेट गटारांमध्ये सोडत आहेत. हे सांडपाणी गटार मार्गाने थेट सावित्री खाडीला मिळत असल्याने सध्या ही खाडी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे खाडी किनारी असणारी शेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.गेली तीन महिने करोनामुळे संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन आहे.आशा परस्थितीमध्ये देखील महाड औद्योगिक क्षेत्रातील जवळपास बहुतेक कारखाने हे सुरूच आहेत. गेली पंधरा दिवस पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे.याचाच फायदा घेत महाड औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी कारखान्यांना लागून असलेल्या सार्वजनिक गतारांमध्ये सोडले आहे. सध्या हे सर्व गटारे हिरवी, पिवळी, लाल झाली आहेत. या सर्व करखंदारांवर या संबंधित असलेल्या कोणत्याच शासकीय खात्याचा वचक राहिलेला दिसून येत नाही. गटार मार्गे सोडले जाणारे हे पाणी थेट सावित्री खाडीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीमध्ये दुर्गंधी पसरत असून खाडी किनारी असलेली भातशेती आणि मासेमारी धोक्यात आली आहे.।मणीराम आॅर्गनिकस या कारखान्याचा पाणी गटारामध्ये येत होता. नमुने घेऊन कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात तपासणी सुरू आहे, जे कारखाने गटारामध्ये पाणी सोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.- सागर औटी, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ।कारवाईकडे दुर्लक्ष : अशा प्रकारे रसायन मिश्रीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखानदारांना आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. याचे कार्यालय देखील याच औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. असे असताना देखील कारखानदार पाणी सोडण्याचे हे काम करत आहे. मात्र हे प्रदूषण नियंत्रण मंडळ या कारखानदारांवर कोणतीच कारवाई न करता दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिक करत असून नाराजी व्यक्त करत आहेत.