शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पोलीस भरतीवेळी अमिषाला बळी पडू नका : सोमनाथ घार्गे

By राजेश भोस्तेकर | Updated: November 5, 2022 12:42 IST

पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे. 

अलिबाग : पोलीस दलात होणारी भरती ही पारदर्शक, नियमांना धरून केली जाणार आहे. त्यामुळे भरती होणाऱ्या उमेदवारांनी आपल्या हिमतीवर आणि बुद्धी कौशल्याने पोलीस दलात सामील व्हा. पोलीस भरतीत अमिषाला बळी पडून स्वतः चे नुकसान करू नका अशी स्पष्टता जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना दिली आहे. 

राज्यात पोलीस विभागात अनेक पदे रिक्त आहेत. पोलीस विभागात रिक्त पदे भरावीत यासाठी शासनामार्फत राज्यात पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकाधिक तरुण तरुणींनी या पोलीस दलात सामील होण्यासाठी जिल्हा पोलिस दलातर्फे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर २०२२ चे आयोजन अलिबाग पोलीस परेड मैदानावर एक दिवसासाठी आयोजित केले होते. उमेदवाराच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात झाली. या शिबिरात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपस्थित तरुण तरुणींना मार्गदर्शन केले. यावेळी घार्गे यांनी पैसे देऊन अमिषाला बळी पडू नका असे आवाहन केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, गृह उप अधीक्षक जगदीश काकडे, मुरुड पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे, मांडवा पोलीस निरीक्षक राजीव पाटील यावेळी उपस्थित होते.

रायगड पोलीस दलात भरती होणारे उमेदवार हे परजिल्ह्यातील अधिक असतात. त्यामुळे काही वर्षाने पोलीस कर्मचारी हे आपल्या गावी बदली करून जात असतात. त्यामुळे रायगड पोलीस दलात पोलीस कर्मचारी याची रिक्त पदांची कमतरता भासत आहे. यासाठी होणाऱ्या पोलीस भरतीत रायगडातील अधिकाधिक तरुण तरुणींनी सहभाग घेऊन दलात सामील व्हावे अशी इच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मार्गदर्शन करताना बोलून दाखवली.

पोलीस दलात सामील होणाऱ्या तरुण तरुणीला भरतीचे नियम, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा बाबत मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत केले जाणार आहे. लेखी परीक्षेत बेसिक अभ्यासावर भर देणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत कशा पद्धतीने उमेदवार याला मार्क मिळू शकतात. याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले गेले. त्यामुळे भरती वेळी उमेदवारांना याचा अधिक लाभ होऊन मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यातील उमेदवार दलात सामील होण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आठ उपविभागीय अधिक्षक विभागात मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले होते. साधारण आठ ते दहा हजार उमेदवार या शिबिरात सहभागी झाले होते.---जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुले मुली यांनी पोलीस दलात सामील व्हावे, यादृष्टीने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात लेखी परीक्षा, मैदानी चाचणी कशा पद्धतीने असते. याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. भरती प्रक्रिया किती पारदर्शक होणार, याबाबतही सांगितले असून कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. तरुणांनी आपल्या हिंमतीवर दलात सामील व्हावे लागणार आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड 

टॅग्स :PoliceपोलिसRaigadरायगडalibaugअलिबाग