शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आधी दुरुस्ती करा मगच कालव्यात पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:41 IST

कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याच्या दुरुस्ती नंतर अवघ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

- कांता हाबळे कर्जत : कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याच्या दुरुस्ती नंतर अवघ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील दुबार भात शेतीसाठी डिसेंबर महिन्यात पाणी सोडल्यास ते पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे प्रथम कालव्याची डागडुजी करा मगच पाणी सोडा, अशी जोरदार मागणी गौरकामथ आणि वदप आदी गावांतील शेतकºयांनी पाटबंधारे अभियंत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली.कर्जत तालुक्यातील गौरकामथ येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता राजनाल्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-२ अमित पारधी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक श. रु. माने, मोजणीदार राम व्ही. वाघ, हनुमान कालेकर, मजूर सुरेश सोनावळे उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रश्नाचा भडीमार करत अधिकाºयांची बोलती बंद केली. शेतकºयांनी नाल्याची दुरवस्था झाल्याचे अधिकाºयांना सांगितले. मागील वर्षीही याबाबत निवेदन दिले होते. तेव्हा राजनाल्याची डागडुजी करून स्वच्छता करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नाल्याचे काम न केल्याने नाल्यात जंगली झाडेझुडपे वाढली आहते. नाल्याच्या कडेची माती नाल्यात ढासळल्याने नाल्यात गाळ साचला आहे. अद्यापपर्यंत काहीच काम केले नाही. गेल्या वर्षीही आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते आणि आताही तेच आश्वासन देतात. आता आम्हाला आश्वासन नको ठोस काम पाहिजे, अशी मागणी शेतकºयांनी केली. वदप येथील १३-बी पोटनाल्यालगत पाइप फुटल्याने नाल्याचे पाणी शेजारील तलावात जाते, त्यामुळे तलावाची पातळी वाढून तलावाचा बांध फुटण्याची शक्यता आहे. तसेच तलावाजवळ वस्ती असल्यामुळे तलावाचा बांध फुटल्यास संपूर्ण पाणी त्या वस्तीत शिरण्याची भीती असून, मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागेल. परिणामी, वस्तीमध्ये भीतीचे सावट पसरले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बैठकीत बळीराम खंडागळे, खंडू शिंदे, जगदीश पाटील, कृष्णा चव्हाण, राजेश पाटील, पंकज पाटील आदी शेतकºयांनी समस्या मांडल्या.वदप तळ्यालगत असलेला राजनाल्याचा आउट लेट पाइप फुटल्याने तलावात पाणी शिरून तलाव ओव्हर फ्लो होत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात, घरांत पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे.- जगदीश पाटील,शेतकरी, वदप

टॅग्स :Raigadरायगड