शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

कर्जतमधील शिबिरात दिव्यांगांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 03:35 IST

अभियानात गोंधळ : पंचायत समितीचे नियोजन फसले

कांता हाबळे

नेरळ : अपंग आयुक्तालय महाराष्ट्र यांच्याकडून दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. मात्र, कर्जतमधील शिबिरामुळे तालुक्यातील दिव्यांगांची डोकेदुखी वाढली आहे. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका दिव्यांगांना बसला.रायगड जिल्ह्यात ६ फेब्रुवारीपासून पंचायत समिती कार्यालयात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. १५ फेब्रुवारी रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयात दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील सुमारे १५०० दिव्यांगांनी शिबिरात नोंदणी केली होती. सकाळी कर्जत पंचायत समिती कार्यालयात सुमारे २०० च्या वर दिव्यांगांनी हजेरी लावली होती. पंचायत समितीचे नियोजन फसल्याने दिव्यांगाना त्रास सहन करावा लागला.

पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला रॅम्प नसल्याने दिव्यांगांना चढा उतरायला त्रास झाला. दुसऱ्या मजल्यावर शिबिरासाठी काही टेबल ठेवण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी पोहोचेपर्यंत दिव्यांगांना घाम फुटला. फोटोची जागेवर सोय नसल्याने लाभार्थींच्या सोबत आलेल्या व्यक्तीचीदेखील धावपळ उडाली. यामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच गोंधळ उडाला. या गोंधळामुळे अनेक दिव्यांग माघारी गेले. शासनाकडून अनेक योजना नागरिकांसाठी येतात मात्र स्थानिक पातळीवरील नियोजनअभावी नागरिक वंचित राहत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.दिव्यांग शिबिराचे नियोजन २०० जणांच्या सहभाग लक्षात घेऊन करण्यात आले होते. लाभार्थींची दोन ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र, लाभार्थींसोबत घरातली मंडळीदेखील आली. दुसºया मजल्यावर ज्यांना चढता येऊ शकते, अशा व्यक्तींसाठी सोय केली होती. तर ज्यांना जिने चढता येत नाही, त्यांची खाली सोय केली होती. मात्र ऐनवेळी गडबड झाली. पंचायत समितीच्या मागच्या बाजूस रॅम्प केलेला आहे.- छतरसिंग एस राजपूत, सहायक गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समितीदिव्यांगांचे शिबिर तळमजल्यावर घेतले जावे, अशी अधिसूचना असताना दुसºया मजल्यावर पंचायत समितीने शिबिर ठेवले, यामुळे अपंग बांधवाना त्रास झाला.- अरु ण जोशी, अध्यक्ष अंध अपंग संस्था वारे,शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पथक अचानक दाखल झाले. त्यामुळे जास्त गोंधळ उडाला. कार्यक्रमाचे आयोजन पटांगणात केले असते तर ते योग्य ठरले असते.- साईनाथ पवार, समाजकल्याण विभाग सहायक, राजिपशिबिरात ठिकाणी प्यायला पाणी, नाश्ता नव्हता. दुसºया मजल्यापर्यंत दिव्यांग चालून जाताना अक्षरश: मेटाकुटीला आले.- अमर साळोखे, शिबिरार्थी, डिकसळ

टॅग्स :Karjatकर्जतRaigadरायगड