शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

कर्जतमधील शिबिरात दिव्यांगांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 03:35 IST

अभियानात गोंधळ : पंचायत समितीचे नियोजन फसले

कांता हाबळे

नेरळ : अपंग आयुक्तालय महाराष्ट्र यांच्याकडून दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. मात्र, कर्जतमधील शिबिरामुळे तालुक्यातील दिव्यांगांची डोकेदुखी वाढली आहे. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका दिव्यांगांना बसला.रायगड जिल्ह्यात ६ फेब्रुवारीपासून पंचायत समिती कार्यालयात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. १५ फेब्रुवारी रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयात दिव्यांगांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील सुमारे १५०० दिव्यांगांनी शिबिरात नोंदणी केली होती. सकाळी कर्जत पंचायत समिती कार्यालयात सुमारे २०० च्या वर दिव्यांगांनी हजेरी लावली होती. पंचायत समितीचे नियोजन फसल्याने दिव्यांगाना त्रास सहन करावा लागला.

पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला रॅम्प नसल्याने दिव्यांगांना चढा उतरायला त्रास झाला. दुसऱ्या मजल्यावर शिबिरासाठी काही टेबल ठेवण्यात आले होते. मात्र, त्याठिकाणी पोहोचेपर्यंत दिव्यांगांना घाम फुटला. फोटोची जागेवर सोय नसल्याने लाभार्थींच्या सोबत आलेल्या व्यक्तीचीदेखील धावपळ उडाली. यामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच गोंधळ उडाला. या गोंधळामुळे अनेक दिव्यांग माघारी गेले. शासनाकडून अनेक योजना नागरिकांसाठी येतात मात्र स्थानिक पातळीवरील नियोजनअभावी नागरिक वंचित राहत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.दिव्यांग शिबिराचे नियोजन २०० जणांच्या सहभाग लक्षात घेऊन करण्यात आले होते. लाभार्थींची दोन ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र, लाभार्थींसोबत घरातली मंडळीदेखील आली. दुसºया मजल्यावर ज्यांना चढता येऊ शकते, अशा व्यक्तींसाठी सोय केली होती. तर ज्यांना जिने चढता येत नाही, त्यांची खाली सोय केली होती. मात्र ऐनवेळी गडबड झाली. पंचायत समितीच्या मागच्या बाजूस रॅम्प केलेला आहे.- छतरसिंग एस राजपूत, सहायक गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समितीदिव्यांगांचे शिबिर तळमजल्यावर घेतले जावे, अशी अधिसूचना असताना दुसºया मजल्यावर पंचायत समितीने शिबिर ठेवले, यामुळे अपंग बांधवाना त्रास झाला.- अरु ण जोशी, अध्यक्ष अंध अपंग संस्था वारे,शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पथक अचानक दाखल झाले. त्यामुळे जास्त गोंधळ उडाला. कार्यक्रमाचे आयोजन पटांगणात केले असते तर ते योग्य ठरले असते.- साईनाथ पवार, समाजकल्याण विभाग सहायक, राजिपशिबिरात ठिकाणी प्यायला पाणी, नाश्ता नव्हता. दुसºया मजल्यापर्यंत दिव्यांग चालून जाताना अक्षरश: मेटाकुटीला आले.- अमर साळोखे, शिबिरार्थी, डिकसळ

टॅग्स :Karjatकर्जतRaigadरायगड