शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगर किनारा पर्यटकांनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 02:10 IST

दिवाळी सुट्टीतील अखेरचा रविवार : पर्यटनासाठी श्रीवर्धन, हरिहरेश्वरला पसंती

बोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची भुरळ, फेसाळत्या लाटांमध्ये डुंबण्याचा आनंद व माशांवर ताव मारण्यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर तसेच देशभरातून पर्यटक दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर बीचला नेहमीच पसंती देतात. दिवाळीच्या सुट्टीतील शेवटच्या शनिवार-रविवार दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला होता.

पावसाळा संपल्यानंतर दिवाळी हा पर्यटनाच्या दृष्टीने नवीन हंगामाची सुरुवात होत असते. श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाच्या दिवेआगर, श्रीमंत बाळाजी पेशव्यांचे स्मारक व भारतामध्ये दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र आदी पर्यटनस्थळे, तसेच समुद्रकिनारे गेल्या १५ दिवसांपासून ओस पडले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे समुद्रकिनारे फुलून गेले आहेत.पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण कुटुंबसहलीवर आले आहेत तर काही तरुण-तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींसह श्रीवर्धन तालुक्यामध्ये दाखल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दिवेआगर समुद्रकिनारा चांगलाच बहरला आहे. मागील १५ दिवसांमध्ये ग्राहक नसल्याने नाराज झालेले हॉटेल व्यावसायिक घरगुती खानावळ यांना दिलासा मिळाला आहे.दिवेआगर समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यातील सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या ठिकाणी प्रकट झालेल्या सुवर्ण गणेशामुळे श्रीवर्धनच नव्हे तर रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर चमकू लागला आहे. नव्याने बांधण्यात आलेले दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमंदिर, पुरातन मूर्ती असलेले रूपनारायण, सुंदर नारायण, उत्तरेश्वर मंदिर पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आवर्जून पर्यटक महाराष्ट्रातून येत असतात. सध्या पर्यटनाचा काळ पुन्हा सुरू झाला असून दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरून गेला आहे. 

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन