शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिवेआगर किनारा पर्यटकांनी बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 02:10 IST

दिवाळी सुट्टीतील अखेरचा रविवार : पर्यटनासाठी श्रीवर्धन, हरिहरेश्वरला पसंती

बोर्ली पंचतन : दिवेआगर समुद्रकिनाऱ्याची भुरळ, फेसाळत्या लाटांमध्ये डुंबण्याचा आनंद व माशांवर ताव मारण्यासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर तसेच देशभरातून पर्यटक दिवेआगर, श्रीवर्धन व हरिहरेश्वर बीचला नेहमीच पसंती देतात. दिवाळीच्या सुट्टीतील शेवटच्या शनिवार-रविवार दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून गेला होता.

पावसाळा संपल्यानंतर दिवाळी हा पर्यटनाच्या दृष्टीने नवीन हंगामाची सुरुवात होत असते. श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशाच्या दिवेआगर, श्रीमंत बाळाजी पेशव्यांचे स्मारक व भारतामध्ये दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र आदी पर्यटनस्थळे, तसेच समुद्रकिनारे गेल्या १५ दिवसांपासून ओस पडले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे समुद्रकिनारे फुलून गेले आहेत.पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण कुटुंबसहलीवर आले आहेत तर काही तरुण-तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींसह श्रीवर्धन तालुक्यामध्ये दाखल झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये दिवेआगर समुद्रकिनारा चांगलाच बहरला आहे. मागील १५ दिवसांमध्ये ग्राहक नसल्याने नाराज झालेले हॉटेल व्यावसायिक घरगुती खानावळ यांना दिलासा मिळाला आहे.दिवेआगर समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यातील सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या ठिकाणी प्रकट झालेल्या सुवर्ण गणेशामुळे श्रीवर्धनच नव्हे तर रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या जगाच्या नकाशावर चमकू लागला आहे. नव्याने बांधण्यात आलेले दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमंदिर, पुरातन मूर्ती असलेले रूपनारायण, सुंदर नारायण, उत्तरेश्वर मंदिर पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी आवर्जून पर्यटक महाराष्ट्रातून येत असतात. सध्या पर्यटनाचा काळ पुन्हा सुरू झाला असून दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरून गेला आहे. 

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन