शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

जिल्ह्यात गुलाबी थंडीची लागली चाहूल, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:30 IST

जिल्ह्यातील विविध भागांमध्ये थंडीने जोर धरला असून, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण होऊ लागली आहे.

दिघी : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये थंडीने जोर धरला असून, श्रीवर्धनमध्ये किमान तापमानामध्ये घसरण होऊ लागली आहे. यंदा दिवाळीत पडणारी थंडी, तापमान बदलामुळे उशिरा जाणवत आहे. आणखी काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.श्रीवर्धन परिसरात सायंकाळच्या वेळेस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे, वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण वाढत आहे. हीच परिस्थिती आगामी चार ते पाच दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आता सध्या पर्यटन हंगामात दिवेआगर येथे पर्यटकांची वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्वच भागांमध्ये तापमान दिवसेंदिवस खाली येत आहे. यावर्षी दिवाळीमध्ये पाऊस असतानाही थंडी नसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. या महिन्यात दिवसभर ३० अंशांपर्यंत गेलेले तापमान आता सायंकाळी १० ते १५ अंश सेल्सिअसवर आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून २५ ते २० अंशांदरम्यान तापमान राहू लागले. त्यामुळे अचानक थंडीची लाट आल्याचा अनुभव श्रीवर्धनमधील नागरिक घेत आहेत. मुख्य रस्त्यावर सकाळी ८ वाजेपर्यंत वातावरणात धुके दिसत आहे, तसेच सायंकाळी ६ वाजल्यापासून थंडी वाढत असून, नागरिकांना शाल, मफलर, स्वेटर असे गरम कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्यादेखील रोडावली आहे.> पर्यटनाला येतील ‘अच्छे दिन’- व्यावसायिकया वेळी जून महिन्यात सुरू झालेला पाऊस पाच महिन्यांच्या कालावधीत नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत अधून-मधून सुरूच होता. परतीचा पाऊस उशिरा सुरूच असतानाच जूनमधील क्यार, महा वादळाचा फटका पर्यटनाला बसला. त्यामुळे पर्यटनाशी निगडित अनेक व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र, सध्या गुलाबी हवेचा जोर वाढल्याने दिवेआगर पर्यटनात वाढ होत असून पुढील पर्यटनाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त के ली.