शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:58 IST

पेणमधील शेतकरी समाधानी; रब्बी हंगामाच्या कामाची लगबग सुरू

पेण : हेटवणे धरणाच्या ओलिताखाली येणाऱ्या १७०० एकर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या कालावधीत पिकणाºया भातशेतीसाठी कालव्यातून हेटवणे सिंचनाचे पाणी सोडले आहे. या परिसरातील जमीन पाण्याखाली आली असून, या दोन-चार दिवसांत भात पेरणीला प्रारंभ होणार आहे. यावर्षी नववर्षाच्या मुहूर्तावर पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांची कामे थोडीफार बाकी राहिली होती. ती आटोपताच शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सध्या पेण शहरात व ग्रामीण भागात गुलाबी थंडी जाणवू लागली आहे, अशा थंडीत शेतीसाठी पाणी सोडल्याने सायंकाळी व रात्री वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. हा गारवा आंबा व इतर फळ उत्पादनासाठी आवश्यक असतो, त्यामुळे आंबा मोहोर ताटवे फुलू लागतील. शेतजमिनीत पाणी साचल्याने एकंदर गुलाबी थंडी अधिक जाणवत आहे. सकाळी या परिसरात धुक्याची दुलई पसरते. त्यामुळे दैनंदिन कामे सूर्यप्रकाश अर्थात उन्हे पडल्यावर सुरू होत नाहीत. सध्या या परिसरात बगळे व इतर पक्ष्यांच्या आगमनाने पक्षिगणांचा किलबिलाट ऐकू येतो. शेतकरी ओल्या चिखल मातीमध्ये नांगरणी करून ओलितावर भात बियाणे भिजवून पेरणीकरून हिरवे तृणपात्याची उगवण करेल.पुढील १५ ते २० दिवस रब्बीच्या हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त राहणार असून, खरीप हंगामातील पिकांना जो फटका बसला होता, ती कसर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करेल. उन्हाळ्यातील भातशेतीला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, याबरोबर मुबलक पाणी व खतांची मात्रा पिकांना मिळते. खात्रिशीर उत्पन्नाची हमी व पिकांवर रोगराईची भीती नसल्याने शेतकरी सिंचनाच्या पाण्यावर होणाºया शेतीसाठी नेहमीच उत्सुक व आनंदी असतो.सिंचनाचे पाणी एप्रिल २०२० पर्यंत गरजेनुसार सोडण्यात येणार आहे. शेतकºयाची जशी मागणी असते, तसतसे पाणी कमी-जास्त प्रमाणात सोडण्यात येत असते, अशी माहिती प्रकल्प सूत्रांनी दिली. एकूणच सिंचनाचे पाणी जमिनीत सोडण्यात आल्याने येत्या महिन्याभरात येथील शिवारात शेतकरी व मजुरांची लगबग दिसून येईल. संपूर्ण शिवारात हिरवाईचा गालिचा पसरलेला दिसेल आणि येथील वातावरण प्रफुल्लित राहील.