शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

प्रशासनाच्या दृष्टिकोनालाच अपंगत्व !

By admin | Updated: December 19, 2015 02:34 IST

अपंगांच्या विकासासाठी नव्याने तालुका आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. याबाबत सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ ला निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा

- आविष्कार देसाई ल्ल अलिबागअपंगांच्या विकासासाठी नव्याने तालुका आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. याबाबत सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ ला निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या गावी मात्र असा निर्णय झाला आहे, याची माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाचा अपंगांच्या कल्याणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच अपंग झाल्याचे चित्र आहे.अपंगांच्या विकासासाठी नव्याने निर्माण होणाऱ्या तालुका आणि जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून अपंगच स्वत:च्या विकासाची दिशा ठरविणार आहेत. सरकारच्या नवीन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची अपंगांच्या विकासातील लुडबुड कमी होणार आहे. या निर्णयाचे अपंगांच्या विविध संघटनांनी स्वागत केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारली असता, काहींना अशी समिती असल्याचे माहीतच नव्हते. त्यामुळे त्यांनी माहिती घेतो आणि सांगतो, अशी उत्तरे दिली. समिती गठीत करण्याची प्रकिया सुरू असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी तथा महिला व बालकल्याण अधिकारी संदीप यादव यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या उत्पन्नातील तीन टक्के रक्कम अपंगांच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र कोणत्या योजनांवर खर्च करावा, याबाबत सरकारच्या मार्गदर्शक सूचना आतापर्यंत नव्हत्या. स्थानिक स्वराज्य संस्था तीन टक्के निधी देत असल्याने ते ठरवतील त्याच विकास योजनेवर खर्च केला जायचा. त्यामुळे अपंगांना अपेक्षित असणारा विकास होत नव्हता. सरकारने १८ नोव्हेंबर १५ च्या निर्णयानुसार अपंगांच्या विकासासाठी ४३ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. समितीमध्ये अपंग सदस्यांचा समावेश करण्यात येणार असल्याने योग्य योजनांवर योग्य निधी खर्च होतो की नाही, यावर समितीचा चांगलाच अंकुश राहणार आहे. त्याचप्रमाणे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची लुडबुड कमी होणार आहे. अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नाही याचे आश्चर्य वाटते.- व्ही. के. पाटील, संघटक, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना.