शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जिल्हा रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:36 IST

रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात.

अलिबाग : रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण विविध उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, सध्या याच सरकारी रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी कचरा, वाया गेलेले अन्न, बाटल्या, गुटख्याच्या पुड्या, नाल्यावरील तुटलेली झाकणे यामुळे दुर्गंधी पसरल्याने रुग्णासह त्यांच्या नातेवाइकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने यामध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक विविध आजारांवरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये येतात. अलोपॅथी उपचार पद्धतीबरोबरच, आयुष विभागाच्या माध्यमातून उपचार केले जातात. दररोज येथे उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या ही सुमारे ५०० च्या आसपास आहे. त्यातील गंभीर रुग्णांवर उपचार करणे गरजेचे असल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले जाते. त्यामुळे येथे येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या संख्येचा विचार केल्यास या ठिकाणच्या परिसराचा, स्वच्छतागृहाचा, कॉरिडोरचा वापर केला जातो. त्यामुळे सहाजिकच या ठिकाणी कचरा, फेकलेले अन्न, बाटल्या, सिगारेटची पाकिटे, गुटख्याच्या पुड्या अशा प्रकारचा कचरा जमा होतो.रुग्णालयाचा वापर मोठ्या संख्येने होत असल्याने तेथील स्वच्छताही सातत्याने राखली जाणे गरजेचे आहे. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या कचºयामुळे दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूकडे तर घाणीचे साम्राज्य असल्याने तेथे काही क्षण उभे राहणेही मुश्कील झाले आहे. याच ठिकाणी बाहेरून उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या नातेवाइकांना आसरा घ्यावा लागत असल्याचे दिसून येते. दरम्यान, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.>या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य गरजू रुग्ण येतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कोणीच येत नाही, त्यामुळे महत्त्वांच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमच्या रुग्णाला येथे बरा करण्यासाठी आणले आहे. मात्र, येथील घाणीमुळे अन्य आजार जडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.>वॉर्डमध्ये दुर्गंधीरुग्णालयातील स्वच्छतागृहांचीही पुरती वाट लागलेली असल्याने तेथील साफसफाई नियमित होते का? असाच प्रश्न पडत आहे. पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील वॉर्डमध्येही दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आल्या आहेत.तळमजल्यावर पिण्याच्या पाण्याची ज्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणीही अस्वच्छता असल्याचे दिसून येते. परिसरातील नाल्यावरील झाकण तुटलेली असल्याने अपघातीची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे डासांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना त्याचा अधिक त्रास होत आहे.लाइटचे बोर्डही उघडे असल्याने शॉक लागण्याची शक्यता आहे. रुग्णांना विविध योजनेची माहिती मिळावी, यासाठी उभारण्यात आलेले डिजिटल बोर्डही बंद अवस्थेमध्ये आहे. इमारतीचे जागोजागी प्लास्टर गळून पडले आहे.