शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

महामार्गावर वाढलेल्या झाडीमुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:32 IST

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील.

दासगाव : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या प्रवासाला निघतील. शासन गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा करीत असला, तरी हा दावा महाड परिसरात फोल ठरताना दिसत आहे. महाडमधून जाणाºया मुंबई-गोवा महामार्गालगत दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. यामुळे महामार्गाची साइडपट्टी दिसत आहे. तर दासगाव, वहूर, टोळ, वीर परिसरात साइडपट्टीवरील टाकण्यात आलेली अनावश्यक खडी, दगडे अपघातांना निमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या या प्रश्नाकडे महामार्ग पोलीस आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.कोकणवासीयांसाठी शिमगा आणि गणेशोत्सव या दोन सणाला अधिक महत्त्व आहे. चाकरमानी जगाच्या कोणत्याही कोपºयात असला, तरी गावातील या दोन सणांसाठी गावाकडे परत येतो. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, आठ ते दहा तासांची वाहतूककोंडी, अपघाताची भीती, आबालवृद्धांना होणारा त्रास, अशी अनेक संकटे पार करत चाकरमानी कोकणात पोहोचतोच. महाड तालुका हद्दीतून सुमारे २५ कि.मी.चा मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गाचा आढावा घेतला असता, मुळातच हा महामार्ग अरुंद आहे. औद्योगिक वसाहत आणि स्थानिक पातळीवरील वाहनांची संख्यादेखील अधिक आहे.गणेशोत्सवासाठीच्या वाहनांची संख्या या महामार्गावर वाढल्यानंतर वाहतूककोंडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे इतर भागांप्रमाणे या महामार्ग परिसरात लक्ष घालणे गरजेचे आहे. असे असतानादेखील महामार्गाच्या साइडपट्टीवरील वाहतुकीला अडथळा ठरलेली झाडी-झुडपे अद्याप काढलेली नाहीत. यामुळे या झाडी-झुडपांचा वाहतुकीला त्रास होत आहे. त्याचप्रमाणे या झाडी-झुडपांमुळे साइडपट्टी देखील बेपत्ता झाली आहे. साइडपट्टी दिसून न आल्यामुळे वाहनचालकांना गाड्या थांबविण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे.>वाहतूक वळवण्याकडे प्रशासनाचा कलगेली दोन दशके मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. १० वर्षांपूर्वीपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग अरुंद आणि खड्ड्यांनी भरलेला होता, तर नजीकच्या काळात चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पुरती वाट लागली आहे. रस्ता रुंद झाला असला, तरी रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.पनवेल ते इंदापूरदरम्यान रस्ता शिल्लकच नाही, अशी अवस्था आहे. महाड-पोलादपूर मार्ग कोकणात जाणारा हा मुंबई-गोवा महामार्ग जवळचा असूनदेखील गणेशोत्सव आणि शिमगा उत्सवकाळात प्रशासन तळकोकणात जाणारी वाहतूक पुणेमार्गे कराड, चिपळूण-आंबोली घाटमार्ग रत्नागिरी वळवण्याकडे सर्वाधिक कल आहे.हा मार्ग चांगला असला तरी प्रवास वाढतो आणि घाटदेखील वाढत आहे. महाड-पोलादपूर मार्गे जाणाºया रस्त्यावर सुविधा देण्याऐवजी प्रशासन उत्सवकाळातील वाहतूक घाटमार्गे वळवण्यात मग्न आहे. मात्र, यामुळे चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्यासाठी वेळही जास्त लागतो तर वाढलेल्या अंतरामुळे खिशाला चापही बसत आहे.वीर, टोल, दासगाव, वहूर या परिसरांत अनेक ठिकाणी महामार्गाच्या साइडपट्टीवर वाळू उत्खननातून निघालेली टाकाऊ खडी (रेजगा) टाकून देण्यात आला आहे. हा रेजगा कोणत्याही परिस्थितीमध्ये गच्च बसणारा नाही. यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होते.रेजगा टाकलेला खड्डा अगर साइडपट्टी लांबून दिसताना समतल दिसला तरी गाडीचे चाक जेव्हा या ठिकाणी जाते, त्या वेळी हा रेजगा बाजूला होऊन चाक पूर्ण खड्ड्यात जाते. छोटी चारचाकी वाहने अशी परिस्थिती अनियंत्रित होऊ शकतात.तर दुचाकी वाहन अपघातग्रस्त होण्याची शक्यता पूर्ण असते. यामुळे साइडपट्टीवरून रेजगा हलवणे गरजेचे आहे. अपघाताला निमंत्रण देणाºया या साइडपट्टीवरील रेजग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.>महामार्गालगत गवताचे प्रमाण आहे. त्याचप्रमाणे साइडपट्टीवर टाकाऊ खडी (रेजगा) पडलेली आहे. गणपती सणासाठी कोकणात जाणाºया चाकरमान्यांच्या वाहनांना अडचण निर्माण होऊ नये. यासाठी हे अडथळे दोन दिवसांत दूर करण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाला लेखी पत्राद्वारे कळविण्यात येईल.- एस. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा महामार्ग महाड केंद्र