शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 01:56 IST

कोलाड ते वाकण प्रवास खडतर : प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

धाटाव : मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड, खांब, सुकेळी, वाकण या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर प्रचंड पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले होते, त्यामुळे येथील खड्डे बुजविण्यासाठी खड्ड्यात माती मिश्रित खडी टाकण्यात आली. पाऊस पडताच या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर आता पाऊस थांबल्यामुळे सर्वत्र धूळ पसरली आहे.

मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असून चिखलाचे रूपांतर धुळीत झाले आहे. ही सर्व धूळ प्रवाशांच्या व महामार्गालगत असणाऱ्या गावातील ग्रामस्थ नागरिकांच्या अंगावर उडत आहे, यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ही धूळ नागरिकांच्या नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अतिशय मंदगतीने सुरू असून हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही; परंतु पाऊस पडला तर या मार्गावर चिखल व खड्डे यामुळे प्रवासी त्रस्त होतात, यामुळे कंबरदुखीसारखे आजार तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे खोकला, सर्दी यासारखे आजार होताना दिसत आहेत. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असून धूळ प्रवाशांच्या डोळ्यात उडत आहे, यामुळे अपघातही होताना दिसत आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे वाटत असताना नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; परंतु पाच ते सहा वर्षे रस्त्याचे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.शिवाय एक खड्डा भरण्यासाठी आठ दिवसांतून चार ते पाच वेळा भर टाकली तरी खड्डा भरेना, अशी अवस्था आहे. याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याने लक्ष द्यावे,अशी मागणी प्रवाशांकडून होतआहे. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई