शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धुळीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 01:56 IST

कोलाड ते वाकण प्रवास खडतर : प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

धाटाव : मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड, खांब, सुकेळी, वाकण या मार्गावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महामार्गावर प्रचंड पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले होते, त्यामुळे येथील खड्डे बुजविण्यासाठी खड्ड्यात माती मिश्रित खडी टाकण्यात आली. पाऊस पडताच या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर आता पाऊस थांबल्यामुळे सर्वत्र धूळ पसरली आहे.

मागील दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असून चिखलाचे रूपांतर धुळीत झाले आहे. ही सर्व धूळ प्रवाशांच्या व महामार्गालगत असणाऱ्या गावातील ग्रामस्थ नागरिकांच्या अंगावर उडत आहे, यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ही धूळ नागरिकांच्या नाकातोंडात जाऊन सर्दी, खोकला व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अतिशय मंदगतीने सुरू असून हे काम केव्हा पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही; परंतु पाऊस पडला तर या मार्गावर चिखल व खड्डे यामुळे प्रवासी त्रस्त होतात, यामुळे कंबरदुखीसारखे आजार तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे खोकला, सर्दी यासारखे आजार होताना दिसत आहेत. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असून धूळ प्रवाशांच्या डोळ्यात उडत आहे, यामुळे अपघातही होताना दिसत आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे वाटत असताना नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले; परंतु पाच ते सहा वर्षे रस्त्याचे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.शिवाय एक खड्डा भरण्यासाठी आठ दिवसांतून चार ते पाच वेळा भर टाकली तरी खड्डा भरेना, अशी अवस्था आहे. याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम खात्याने लक्ष द्यावे,अशी मागणी प्रवाशांकडून होतआहे. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई