शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विकास व्हावा; मात्र पर्यावरणाचा बळी नको- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 01:24 IST

विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले.

माणगाव : विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले. वडघर येथील राष्ट्रीय स्मारक येथे आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. पर्यावरणाच्या -हासामुळे आज आपण अनेक संकटांना तोंड देत आहोत. ही संकटे कशामुळे येतात, यासाठी पर्यावरणावर काम करण्याची गरज आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यामुळे पर्यावरणाचा नाश होऊ नये यांची काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी असल्याचे विचार सुळे यांनी मांडले. महाराष्ट्रात आलेले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे असून, पाच वर्षांत विकासाच्या नावे फरफट होणार नाही, याची काळजी घेणारे सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. कार्यक्रमास राज्यमंत्री आदिती तटकरे, उपसभापती राजेश पानावकर, स्मारक अध्यक्ष कवयित्री नीरजा, माजी अध्यक्ष युवराज मोहिते, उल्का महाजन, कुरैटर राजू सुतार आदी उपस्थित होते.प्रदर्शनामध्ये साकारलेल्या कलाकृतींवर बोलताना सुळे म्हणाल्या, चित्रामध्ये कलाकारांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. इंदापूर ते आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असा आर्टिस्ट कॉरिडोर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.