शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विकास व्हावा; मात्र पर्यावरणाचा बळी नको- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 01:24 IST

विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले.

माणगाव : विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले. वडघर येथील राष्ट्रीय स्मारक येथे आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. पर्यावरणाच्या -हासामुळे आज आपण अनेक संकटांना तोंड देत आहोत. ही संकटे कशामुळे येतात, यासाठी पर्यावरणावर काम करण्याची गरज आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यामुळे पर्यावरणाचा नाश होऊ नये यांची काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी असल्याचे विचार सुळे यांनी मांडले. महाराष्ट्रात आलेले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे असून, पाच वर्षांत विकासाच्या नावे फरफट होणार नाही, याची काळजी घेणारे सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. कार्यक्रमास राज्यमंत्री आदिती तटकरे, उपसभापती राजेश पानावकर, स्मारक अध्यक्ष कवयित्री नीरजा, माजी अध्यक्ष युवराज मोहिते, उल्का महाजन, कुरैटर राजू सुतार आदी उपस्थित होते.प्रदर्शनामध्ये साकारलेल्या कलाकृतींवर बोलताना सुळे म्हणाल्या, चित्रामध्ये कलाकारांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. इंदापूर ते आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असा आर्टिस्ट कॉरिडोर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.