शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’ विद्यार्थ्यांसाठी ठरतोय जीवरक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 03:04 IST

२१ शाळा, महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांनी गिरवले धडे : जिल्हा वाहतूक पोलिसांचा यशस्वी प्रयोग

आविष्कार देसाई 

अलिबाग : वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून रायगड जिल्हा वाहतूक विभागाने ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून जनजागृतीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सात ठिकाणच्या २१ शाळा आणि महाविद्यालयातील तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देण्यात आले आहेत. यातील प्रशंसनीय बाब म्हणजे शाळा, महाविद्यालयातील काही युवकांनी दुचाकीला स्वत:पासून दूर ठेवण्याला पसंती दिल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित होत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने छोटे-मोठे उद्योग उभे राहिले आहेत. आरसीएफ, गेल, एचपीसी, आयपीसीएल (रिलायन्स), एचओसी, पास्को यासह अन्य कंपन्यांनी येथे प्रकल्प उभे केले आहेत. वाढत्या उद्योगांमुळे येथील नागरीकरणातही वाढ होत आहे. परिणामी वाहतुकीच्या समस्याही वाढत आहेत. जिल्ह्यात असणाऱ्या स्वतंत्र वाहतूक विभागाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियोजन आणि नियंत्रण केले जाते. मात्र वाढती वाहनसंख्या त्याचप्रमाणे वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे अपघातांचा आकडा वाढत आहे. नववी, दहावीतील मुलेही दुचाकी वापरताना दिसत असून त्यांच्याकडून बहुतांश वेळा वेगमर्यादांचे उल्लंघन होताना दिसते. वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाºया कारवाईत अल्पवयीन दुचाकीस्वारांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. विविध अपघातातून तसेच पोलीस कारवाईतून समोर आले आहे. त्यांना वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये मृत्यू होण्याबरोबरच अपंगत्व येण्याचेही प्रमाण चिंतेमध्ये वाढ करणारे आहे.१अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी वाहन चालवताना पोलिसांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांंच्या पालकांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामध्ये पालकांना शिक्षा आणि दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.२वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास होणारे अपघात, गुन्हे रोखता येऊ शकतात. यासाठी रायगड जिल्हा वाहतूक विभागाने ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून जनजागृतीला प्रारंभ केला आहे. यासाठी त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन युवा वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे.३अलिबाग, पेण, महाड, कर्जत, खोपोली, रेवदंडा आणि मुरुड या विभागातील २१ शाळा, महाविद्यालयातील तब्बल १५ हजार युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’ राबवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.४जीवनामध्ये वाहतुकीच्या नियमांचे किती महत्त्व आहे, त्याचे पालन केल्याने काय होऊ शकते याची माहिती त्यांना देण्यात येत असल्याचे वराडे यांनी स्पष्ट केले. यासाठी अपघातांची आकडेवारी, पालकांना दंड आणि शिक्षा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, अति वेगाने गाडी चालवण्यासारख्या विषयांवर त्यांच्याशी सखोल चर्चा करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.च्अशा विविध कार्यक्रमामुळे आता काही मुले हे शाळा, महाविद्यालयात जाताना-येताना वाहनांचा वापर करत नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी आवर्जून सांगितल्याचेही वराडे यांनी स्पष्ट केले.च्‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून लगेचच १०० टक्के फरक पडणार नाही, परंतु काही मुलांनी याचे पालन केले तर, आपल्या राष्ट्राची युवा शक्ती हकनाक अपघातात दगावणार नाही आणि हेच सक्षम राष्ट्राच्या हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRaigadरायगड