शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’ विद्यार्थ्यांसाठी ठरतोय जीवरक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 03:04 IST

२१ शाळा, महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांनी गिरवले धडे : जिल्हा वाहतूक पोलिसांचा यशस्वी प्रयोग

आविष्कार देसाई 

अलिबाग : वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून रायगड जिल्हा वाहतूक विभागाने ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून जनजागृतीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सात ठिकाणच्या २१ शाळा आणि महाविद्यालयातील तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे देण्यात आले आहेत. यातील प्रशंसनीय बाब म्हणजे शाळा, महाविद्यालयातील काही युवकांनी दुचाकीला स्वत:पासून दूर ठेवण्याला पसंती दिल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित होत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने छोटे-मोठे उद्योग उभे राहिले आहेत. आरसीएफ, गेल, एचपीसी, आयपीसीएल (रिलायन्स), एचओसी, पास्को यासह अन्य कंपन्यांनी येथे प्रकल्प उभे केले आहेत. वाढत्या उद्योगांमुळे येथील नागरीकरणातही वाढ होत आहे. परिणामी वाहतुकीच्या समस्याही वाढत आहेत. जिल्ह्यात असणाऱ्या स्वतंत्र वाहतूक विभागाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियोजन आणि नियंत्रण केले जाते. मात्र वाढती वाहनसंख्या त्याचप्रमाणे वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे अपघातांचा आकडा वाढत आहे. नववी, दहावीतील मुलेही दुचाकी वापरताना दिसत असून त्यांच्याकडून बहुतांश वेळा वेगमर्यादांचे उल्लंघन होताना दिसते. वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाºया कारवाईत अल्पवयीन दुचाकीस्वारांची संख्या अधिक असल्याचे समोर येत आहे. विविध अपघातातून तसेच पोलीस कारवाईतून समोर आले आहे. त्यांना वाहतुकीच्या नियमांचे गांभीर्य नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये मृत्यू होण्याबरोबरच अपंगत्व येण्याचेही प्रमाण चिंतेमध्ये वाढ करणारे आहे.१अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी वाहन चालवताना पोलिसांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी त्यांंच्या पालकांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामध्ये पालकांना शिक्षा आणि दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.२वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास होणारे अपघात, गुन्हे रोखता येऊ शकतात. यासाठी रायगड जिल्हा वाहतूक विभागाने ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून जनजागृतीला प्रारंभ केला आहे. यासाठी त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन युवा वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे.३अलिबाग, पेण, महाड, कर्जत, खोपोली, रेवदंडा आणि मुरुड या विभागातील २१ शाळा, महाविद्यालयातील तब्बल १५ हजार युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’ राबवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.४जीवनामध्ये वाहतुकीच्या नियमांचे किती महत्त्व आहे, त्याचे पालन केल्याने काय होऊ शकते याची माहिती त्यांना देण्यात येत असल्याचे वराडे यांनी स्पष्ट केले. यासाठी अपघातांची आकडेवारी, पालकांना दंड आणि शिक्षा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, अति वेगाने गाडी चालवण्यासारख्या विषयांवर त्यांच्याशी सखोल चर्चा करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.च्अशा विविध कार्यक्रमामुळे आता काही मुले हे शाळा, महाविद्यालयात जाताना-येताना वाहनांचा वापर करत नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी आवर्जून सांगितल्याचेही वराडे यांनी स्पष्ट केले.च्‘ट्रॅफिक सेन्स प्रोग्रॅम’च्या माध्यमातून लगेचच १०० टक्के फरक पडणार नाही, परंतु काही मुलांनी याचे पालन केले तर, आपल्या राष्ट्राची युवा शक्ती हकनाक अपघातात दगावणार नाही आणि हेच सक्षम राष्ट्राच्या हिताचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRaigadरायगड