शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

म्हसळ्यातील २ गावे व ९ वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:44 IST

म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही.

अरूण जंगम म्हसळा : म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना, सरकार दरबारी अद्याप हालचालींना वेग आलेला नाही. तालुक्यातील खामगाव व गायरोणे या दोन गावांना व नऊ वाड्यांना विंधण विहीर करण्यासाठी प्रस्ताव एक वर्षअगोदर मंजूर केला असूनसुद्धा विंधण विहिरींबाबत कार्यवाही करण्यात पंचायत समिती प्रशासनास अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.माजी सभापती महादेव पाटील यांनी म्हसळा तहसीलदारांना निवेदन दिले असून, आठ दिवसांत या विंधण विहिरींचे काम पूर्ण न झाल्यास ही दोन गावे व नऊ वाड्यांमधील लोकांना घेऊन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून म्हसळा तालुका ओळखला जातो. पावसाचे सरासरी प्रमाण पाहता म्हसळा तालुक्यातील पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा जास्त असूनही म्हसळा तालुक्यातील दोन गावे व जवळपास नऊ वाड्यांवर दरवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होते.पाऊस पडूनही पाणी साठविण्याचे नियोजन व वाहत जाणारे पाणी अडविले जात नसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. केवळ नळपाणी पुरवठा योजना राबविण्यापेक्षा पाण्याचे स्रोत व उगमस्थाने बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.म्हसळा तालुक्यातील जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणलोट योजना, वनराई उपक्र म, शासनाचे विविध प्रकारचे उपक्र म कागदावरच झाले आहेत. वास्तविक पाहता जनतेस त्याचा काहीच उपयोग नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ११ विंधण विहिरींना तत्काळ मंजुरी देऊनसुद्धा स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.म्हसळ््याच्या ग्रामीण भागात लोकांना जसे पाणी मिळणे कठीण झाले आहे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांची तहान हा मोठ्या चिंतेचा भाग बनली आहे.विंधण विहीर खोदण्याबाबतीत कंत्राटदारांना संपर्क करूनही ते येण्यास तयार होत नाहीत. विंधण विहिरींना आलेला निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात येणार असून, विंधण विहिरींचे काम संबंधित ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण झाल्यावर त्या ग्रामपंचायतीकडून बिल चेकने कंत्राटदारास अदा करणार असल्याने काम लवकरात लवकर पूर्ण होईल.- वाय. एम. प्रभे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती म्हसळाया गावातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. लहान मुलांनादेखील पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. या गावांमध्ये विंधण विहिरींना मंजुरी मिळून एक वर्ष झाले असून प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.- महादेव पाटील, माजी उपसभापतीविंधण विहिरी मंजूर गावेखामगाव, गायरोणेविंधण विहिरी मंजूर वाड्याकेल्टे चंदनवाडी, निगडी मोहल्ला,रु द्रवट, घुम, खानलोशी बौद्धवाडी, पेडांबे आदिवासीवाडी, पाभरे विठ्ठलवाडी, खामगाव आदिवासीवाडी, जिजामाता हायस्कूल वरवठणे.