शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

हापूस आंब्याच्या उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:57 IST

शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची बागायतदारांची मागणी

अलिबाग : जिल्ह्यात चालू वर्षात उच्च तापमान, बदलते हवामान आणि अवेळी पडणारा पाऊ स अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाल्याने, आंबा उत्पादक बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाचे शासकीय स्तरावर सर्वेक्षण होऊन नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून होत आहे.

आंब्याच्या उत्पादनाकरिता फवारणी, औषधे, मनुष्यबळ आदी सर्व खर्च मोठा होत असून, त्या प्रमाणात यंदा आंबा उत्पादन मिळालेले नाही. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना ३५ ते ४० टक्के आंबा हाती लागला आहे. अशीच अवस्था राहिल्यास आंबा बागाईतदार भुईसपाट होईल. तो होऊ नये यासाठी शासनाने आंबा उत्पादकांना सहकार्य करावे, अशीही अपेक्षाही भुवनेश्वर येथील आंबा बागायतदार तथा कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थांचे संचालक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे. बदललेल्या हवामानामुळे तसेच वारंवार पडलेल्या थंडीमुळे या वर्षी आंब्याचा मोहर गर्भावस्थेत असताना कमी झाला. परिणामी, आंब्याची धारणा कमी झाल्याने उत्पादकता खाली आली. आंबा उत्पादन कमी असल्याने पर्यायाने त्यावर आधारित शेतमजूर, खोके बनवणारे, वाहतूक व्यवसायदार, यांच्यावर विपरित परिणाम झाल्याचे पाटील यांनी सांगितले.आंबा नुकसानाचा अहवाल शासनास पाठवणारच्हवामानातील सततच्या बदलामुळे जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादनात यंदा सुमारे ६० टक्के घट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंबा उत्पादक शेतकºयांचे अल्प उत्पन्न वा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ नये त्याचबरोबर नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी, याकरिता कृषी विमा योजना शासनाने उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकºयांनी हा पीक विमा घेतला आहे आणि ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना विमा योजनेनुसार नुकसानभरपाई मिळेल. दरम्यान, आंबानुकसानाबाबतचा अहवाल शासनास पाठविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी दिली आहे.