शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

‘कर्जत-कल्याण’ गतिरोधक काढले

By admin | Updated: June 21, 2016 01:31 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले

कर्जत : कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हावा असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे या महामार्गावरील सर्व गतिरोधक नेरळ पोलिसांच्या आक्र मक भूमिकेमुळे काढले जात आहेत. या महामार्गावर आजही काही ठिकाणी गरजेपेक्षा अधिक गतिरोधक आहेत, ते काढण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.कोट्यवधी रु पये खर्चून कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर डांबरीकरण होत असताना या रस्त्यावर अनेक गावकऱ्यांच्या आग्रहामुळे गतिरोधक टाकले गेले. तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे भरताना ठेकेदाराच्या डांबराच्या गाड्या आल्यानंतर अनेक ठिकाणी ठेकेदारावर दबाव टाकून गतिरोधक रस्त्यावर टाकून घेतले. अनेक ठिकाणी गरज नसताना टाकलेल्या गतिरोधकांमुळे अनेक दुचाकींना अपघात झाले आणि काहींचे यात बळी गेले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्वत: जेसीबी मशीन घेऊन गतिरोधक काढून टाकण्यास सुरु वात केली. त्याचवेळी वारंवार होणारे अपघात यामुळे पोलीस प्रशासन देखील कामाला लागले होते.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शालिग्राम पाटील यांना रस्त्यावरील गतिरोधक यांचा मुद्दा स्पष्ट करीत या दोन्ही अधिकाऱ्यांनी कल्याण-कर्जत रस्त्यावरील गतिरोधकांची पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सर्व गतिरोधक न काढल्यास यापुढील रस्ते अपघाताचे सर्व गुन्हे दाखल करण्यात येतील असे सुनावले. ठेकेदाराने गतिरोधक काढायला गेल्यास ग्रामस्थ कामगारांना मारहाण करतात असे स्पष्टीकरण दिले. त्यावेळी नेरळ पोलिसांनी बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व गतिरोधक काढण्यास सुरु वात झाली. थेट कर्जतपर्यंत गतिरोधक काढून टाकण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी शाळा आणि गावे याची गरज म्हणून तेथे गतिरोधक कायम ठेवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हिसका दाखवून पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनधिकृतपणे टाकण्यात आलेले गतिरोधक काढल्याने वाहनचालकांना हायसे वाटत आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी जास्त गतिरोधक आहेत, त्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)