शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘कर्जत-कल्याण’ गतिरोधक काढले

By admin | Updated: June 21, 2016 01:31 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले

कर्जत : कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हावा असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे या महामार्गावरील सर्व गतिरोधक नेरळ पोलिसांच्या आक्र मक भूमिकेमुळे काढले जात आहेत. या महामार्गावर आजही काही ठिकाणी गरजेपेक्षा अधिक गतिरोधक आहेत, ते काढण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.कोट्यवधी रु पये खर्चून कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर डांबरीकरण होत असताना या रस्त्यावर अनेक गावकऱ्यांच्या आग्रहामुळे गतिरोधक टाकले गेले. तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे भरताना ठेकेदाराच्या डांबराच्या गाड्या आल्यानंतर अनेक ठिकाणी ठेकेदारावर दबाव टाकून गतिरोधक रस्त्यावर टाकून घेतले. अनेक ठिकाणी गरज नसताना टाकलेल्या गतिरोधकांमुळे अनेक दुचाकींना अपघात झाले आणि काहींचे यात बळी गेले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्वत: जेसीबी मशीन घेऊन गतिरोधक काढून टाकण्यास सुरु वात केली. त्याचवेळी वारंवार होणारे अपघात यामुळे पोलीस प्रशासन देखील कामाला लागले होते.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शालिग्राम पाटील यांना रस्त्यावरील गतिरोधक यांचा मुद्दा स्पष्ट करीत या दोन्ही अधिकाऱ्यांनी कल्याण-कर्जत रस्त्यावरील गतिरोधकांची पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सर्व गतिरोधक न काढल्यास यापुढील रस्ते अपघाताचे सर्व गुन्हे दाखल करण्यात येतील असे सुनावले. ठेकेदाराने गतिरोधक काढायला गेल्यास ग्रामस्थ कामगारांना मारहाण करतात असे स्पष्टीकरण दिले. त्यावेळी नेरळ पोलिसांनी बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व गतिरोधक काढण्यास सुरु वात झाली. थेट कर्जतपर्यंत गतिरोधक काढून टाकण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी शाळा आणि गावे याची गरज म्हणून तेथे गतिरोधक कायम ठेवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हिसका दाखवून पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनधिकृतपणे टाकण्यात आलेले गतिरोधक काढल्याने वाहनचालकांना हायसे वाटत आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी जास्त गतिरोधक आहेत, त्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)