शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘कर्जत-कल्याण’ गतिरोधक काढले

By admin | Updated: June 21, 2016 01:31 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले

कर्जत : कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हावा असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे या महामार्गावरील सर्व गतिरोधक नेरळ पोलिसांच्या आक्र मक भूमिकेमुळे काढले जात आहेत. या महामार्गावर आजही काही ठिकाणी गरजेपेक्षा अधिक गतिरोधक आहेत, ते काढण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.कोट्यवधी रु पये खर्चून कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर डांबरीकरण होत असताना या रस्त्यावर अनेक गावकऱ्यांच्या आग्रहामुळे गतिरोधक टाकले गेले. तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे भरताना ठेकेदाराच्या डांबराच्या गाड्या आल्यानंतर अनेक ठिकाणी ठेकेदारावर दबाव टाकून गतिरोधक रस्त्यावर टाकून घेतले. अनेक ठिकाणी गरज नसताना टाकलेल्या गतिरोधकांमुळे अनेक दुचाकींना अपघात झाले आणि काहींचे यात बळी गेले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्वत: जेसीबी मशीन घेऊन गतिरोधक काढून टाकण्यास सुरु वात केली. त्याचवेळी वारंवार होणारे अपघात यामुळे पोलीस प्रशासन देखील कामाला लागले होते.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शालिग्राम पाटील यांना रस्त्यावरील गतिरोधक यांचा मुद्दा स्पष्ट करीत या दोन्ही अधिकाऱ्यांनी कल्याण-कर्जत रस्त्यावरील गतिरोधकांची पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सर्व गतिरोधक न काढल्यास यापुढील रस्ते अपघाताचे सर्व गुन्हे दाखल करण्यात येतील असे सुनावले. ठेकेदाराने गतिरोधक काढायला गेल्यास ग्रामस्थ कामगारांना मारहाण करतात असे स्पष्टीकरण दिले. त्यावेळी नेरळ पोलिसांनी बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व गतिरोधक काढण्यास सुरु वात झाली. थेट कर्जतपर्यंत गतिरोधक काढून टाकण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी शाळा आणि गावे याची गरज म्हणून तेथे गतिरोधक कायम ठेवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा हिसका दाखवून पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनधिकृतपणे टाकण्यात आलेले गतिरोधक काढल्याने वाहनचालकांना हायसे वाटत आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी जास्त गतिरोधक आहेत, त्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)