शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दासगाव आरोग्य केंद्र वाऱ्यावर, नागरिकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:07 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या महिनाभरापासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या महिनाभरापासून डॉक्टर उपलब्ध नसल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्रशिक्षणासाठी असलेल्या डॉक्टरांचा कार्यकाळ संपल्याने येथील पद रिक्त राहिले आहे. याठिकाणी कायम डॉक्टर देण्याची मागणी केली जात आहे.महाड तालुक्यातील दासगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा कोलमडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गोरेगाव ते महाड दरम्यान महामार्गावर असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख आधार आहे. या परिसरातील जवळपास २२ गावांसाठी याचा उपयोग होतो. शिवाय महामार्गावर अपघात झाल्यास देखील हेच आरोग्य केंद्र उपयोगात येते. मात्र गेली काही वर्षे याठिकाणी केवळ प्रशिक्षित डॉक्टर नेमले जात असल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडलीआहे. नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित डॉक्टरचा कार्यकाळ जून महिन्यात संपल्यानंतर आजतागायत याठिकाणी कोणीच डॉक्टर उपलब्ध झालेलेनाही.या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची दोन पदे मंजूर आहेत. मात्र गेली काही महिने केवळ प्रशिक्षित डॉक्टर नेमले जात आहेत. गरज पडेल तेव्हा याठिकाणी डॉक्टर उपलब्ध केले जात आहेत. तालुक्यातील इतर केंद्रातील डॉक्टर याठिकाणी आणले जातात. यामुळे सद्यस्थितीत या आरोग्य केंद्राची सेवा वाºयावर आहे.दासगाव परिसरातील कोकरे, दाभोळ, सापे, टोल, वीर, आडी, दासगाव, वहूर, केंबुर्ली, गांधारपाले, करंजखोल, चांभारखिंड, नाडगाव, देशमुख कांबळे, शेल भोगाव, राजेवाडी, कोंडीवते, वडवली, इसाने कांबळे, चांढवे अशा २२ गावांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक गावे ही दुर्गम भागातील आहेत. या गावांना याच प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार आहे. ऐन पावसाळ्यात साथीचे आजार, डेंग्यू, मलेरिया, ताप, आणि सर्प आणि विंचू दंश अशा आजारांना सामोरे जावे लागते. मात्र याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीमुळे ही अवस्था निर्माण झाली आहे.>रायगड जिल्हा परिषदेचे या गणातील सदस्य जितेंद्र सावंत हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य समितीवर अध्यक्ष म्हणून काम करतात. दरदिवशी याच मार्गावरून ते ये -जा करतात. मात्र आपल्या कार्यकक्षेतील कामाबाबत ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तर महाड पंचायत समितीचे सदस्य सदानंद मांडवकर हे देखील येथील आरोग्य समितीवर सदस्य म्हणून काम करत आहेत. मांडवकर हे देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत जितेंद्र सावंत आणि सदानंद मांडवकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>गोरगरिबांच्या खिशाला कात्रीया प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षभरात जवळपास तेरा हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. सध्या याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने निराश होऊन परत जावे लागत आहे. नाईलाजाने या रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागत आहे. यामुळे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी स्वत:चे पैसे मोजावे लागतात. या केंद्रांत दोन डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर उपलब्ध केले जात आहेत.- डॉ. एजाज बिरादार,तालुका आरोग्य अधिकारी