शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

धोकादायक पूल : खडताळ पुलावरील रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:57 IST

अलिबाग : सावित्री पुलाच्या महाभयंकर दुर्घटनेनंतर सरकारला अचानक जाग आल्याने त्यांनी राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. धोकादायक पुलांची यादीच सरकारने त्यावेळी सादर केली होती. धोकादायक ठरणारे पूल बंद करून तेथे तातडीने नव्याने पूल बांधण्याच्या वल्गनाही सरकारने केल्या होत्या, मात्र अलिबाग तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या खडताळ पुलाबाबत सरकारने अद्यापही कार्यवाही ...

अलिबाग : सावित्री पुलाच्या महाभयंकर दुर्घटनेनंतर सरकारला अचानक जाग आल्याने त्यांनी राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. धोकादायक पुलांची यादीच सरकारने त्यावेळी सादर केली होती. धोकादायक ठरणारे पूल बंद करून तेथे तातडीने नव्याने पूल बांधण्याच्या वल्गनाही सरकारने केल्या होत्या, मात्र अलिबाग तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या खडताळ पुलाबाबत सरकारने अद्यापही कार्यवाही केलेली नाही. उलट त्याच धोकादायक पुलावरील रस्ता तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. काम न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.अलिबाग तालुक्यामधील विविध प्रकल्प सरकारने गुंडाळून ठेवले आहेत, तर काही प्रकल्पांचे काम हे अतिशय धीम्या गतीने सुरूआहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण, विरार-अलिबाग रेल्वे, अलिबाग-मुंबई रेल्वे मार्ग त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.अलिबाग-मांडवा हा रस्ता मांडवा जेटीवर येणाºया पर्यटकांमुळे जगाच्या नकाशावर पोचला आहे. त्याच मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याच रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे यासाठी सर्वपक्षीयांनी नागरिकांच्या सोबत विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण, रास्ता रोको करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता.सरकारने जन आंदोलनानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली हे चांगले असले तरी, याच मार्गावर ब्रिटिशकालीन खडताळ पूल आहे. या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुलावर जागोजागी झाडे उगवली आहेत, तर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. याच पुलावरील रस्त्यावर भला मोठा खड्डाही पडला होता. सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर राज्यासह जिल्ह्यातील सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होेते. त्यानुसार खडताळ पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या आशयाचा फलकही पुलाशेजारी लावला. सा. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.1अहवालाप्रमाणे खडताळ पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा फलक लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम संपले असे सार्वजनिक बांधकाम विभागाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. याच खडताळ पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल उभारणे गरजेचे आहे. परंतु बांधकाम विभागाने नव्याने पूल उभारण्याबाबत कोणतेच प्रयत्न केल्याचे दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस जगदीश घरत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.2नव्याने पुलाचे काम करण्याचे सोडून त्याच धोकादायक पुलावर मात्र रस्ता तयार करण्याचे काम कसे काय करू शकता असा प्रश्न त्यांनी बांधकाम विभागाला विचारला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक असताना त्याच पुलावरील रस्त्यासाठी जनतेच्या लाखो रुपयांचे का नुकसान करण्यात येत आहे, अशीही विचारणा त्यांनी केली. नव्याने पूल बांधण्याच्या कामाला तातडीने सुुरुवात केली नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Damधरण