शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 00:31 IST

महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. बंधाºयावरील मार्गावर खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात पुराचे पाणी गेल्याने बंधाºयाचे नुकसान झाले आहे. या बंधाºयाच्या एका बाजूचा माती भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असला तरी लघू पाटबंधारे विभागाने या मार्गावरील वाहतूक सुरूच ठेवली आहे.कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या या बंधाºयावरून खरवली आणि बिरवाडी या दोन्ही गावांतील ग्रामस्थ ये-जा करतात. खरवली आणि बिरवाडीमध्ये असलेल्या शाळांमधील विद्यार्थीदेखील या मार्गाचा वापर करतात. बंधाºयावरील मार्ग अत्यंत खराब आणि खाचखळग्यांचा झाला आहे. ज्या नदीवर हा बंधारा बांधला आहे त्या काळ नदीचे पात्र आणि पाण्याचा प्रवाह ऐन पावसाळ्यात रौद्र रूप धारण करून असतो. प्रचंड आवाज करीत पाण्याचा प्रवाह येथून सावित्री नदीला मिळतो. अनेकवेळा या बंधाºयावरूनदेखील पाणी जाते. अशा वेळी हा मार्ग बंद होतो. काही दिवसांपूर्वी या बंधाºयावरून पाणी गेल्याने मोठे वृक्ष यावर आदळले गेले आहेत. काही वृक्ष या ठिकाणी अडकले आहेत. यामुळे हा बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधाºयावरून यापूर्वीच अवजड वाहतूक बंद केली आहे. मात्र तरीदेखील अनेक वेळा मोठी वाहने यावरून ये-जा करीत असतात. येथील लघू पाटबंधारे विभागाचे सुरक्षा विभाग कार्यालयदेखील बंद आहे. त्याचीदेखील मोडतोड झाली आहे. बंधाºयाच्या एका बाजूचा माती भरावदेखील वाहून गेला आहे. यामुळे हा मार्ग बंद करणे गरजेचे असतानादेखील याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केला आहे. यामुळे ये-जा करणारे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.बिरवाडी गावाजवळ काळ नदीवर कोल्हापूर पद्धतीने सन १९७६ रोजी बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाºयामुळे बिरवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या बंधाºयातील पाणीसाठ्यापैकी काही भाग सिंचनाकरितादेखील राखीव आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांनादेखील याच पाण्याचा वापर करता येतो. १.६९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा यामध्ये होत असून ४.५६ हेक्टर क्षेत्र बुडीत गेले आहे. प्रतिवर्षी सिंचन आणि पाणीपुरवठा यातून लघू पाटबंधारे विभागाला किमान ६० लाख रुपयांचे उत्पन्न होत असले तरी या बंधाºयाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. लोखंडी प्लेट्स आणि मजबुतीकरण याकरिता सन २०१४ मध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले, मात्र या बंधाºयावरील मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही.>मागच्या दोन वर्षांत धरणाच्या वरच्या बाजूला काँक्रिटची दुरुस्ती आणि खालील स्टील काँक्रिटची दुरुस्ती याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मान्यता मिळत नसल्याने ते काम थांबले आहे. या वर्षी वरचे काँक्रिट दोन्ही ठिकाणी वाहून गेल्यामुळे दुरुस्तीसाठी वरील कार्यालयाकडे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. मान्यता मिळताच काम केले जाईल.- प्रकाश पोळ,शाखा अभियंता, लघू पाटबंधारे विभाग