शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

अवकाळी पावसाने बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 00:38 IST

मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.  २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : एप्रिल, मे महिना चालू झाला की शेतकरी आपली शेतीची कामे उरकती घेत असतो. यावेळी लागणारा लाकूडफाटा, वैरण, आदी शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जमा करण्यात शेतकरी मजूर मश्गुल असतानाच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या अगोदर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी घरांची कौले, पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. परसुळे येथील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जमीनदोस्त होऊन पत्रे व इतर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.  २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच किचन शेड, शौचालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, ध्वजस्तंभ व हँडवॉश स्टँड याचेही पूर्ण नुकसान झाले आहे. यानंतर सर्व ग्रामस्थ व मुख्याध्यापक कळंबे तसेच ग्रामसेवक करमत यांनी तातडीने येऊन पत्रे उडालेल्या खोलीमधून सर्व साहित्य इतरत्र हलविले. त्याचप्रमाणे गावातील जितेंद्र जाधव यांच्याही घराचे पत्रे उडाले आहेत.अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तसेच वादळी वाऱ्याने नुकत्याच आलेला आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आंबा जमिनीवर कोसळला. शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नपोलादपूर तालुक्यातील ढवळे भागात सोमवारी तसेच मंगळवारी पुन्हा दुपारनंतर पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली आहे. कशेडीसह इतर विभागात वाऱ्याचा तडाखा बसल्याने आंबे गळून पडले आहेत. त्यातच जनावरांचा चारा भिजल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील ढवली, कामथी, सावित्री विभाग, कापडे, वाकण, बोरावलेसह विविध गावांतील शेतकऱ्याच्या आंबा बागायतीला पावसाचा फटका बसला आहे.

 

टॅग्स :Raigadरायगड