शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

नेरळचे अवसरे धरण ओव्हरफ्लो, सांडव्यातून पाणी बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:00 IST

सांडव्यातून पाणी बाहेर : समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरले

नेरळ : कर्जत तालुक्यातील अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेला लघु-पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर पडू लागले आहे.

पाटबंधारे विभागाने अवसरे, बिरदोले आणि वरई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून अवसरे हे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे धरण साकारले. त्या भागातील सात गावातील ३०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या अवसरे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती केली गेली नसल्याने शेतीला कमी पडते, त्यामुळे अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदिवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी भातशेती उन्हाळ्यात करीत नाहीत. दरवर्षी शेतकरी धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी करीत असतात. मात्र, पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांच्या मागणीकडे बघायला वेळ नाही. गेल्या चार-पाच वर्षांत किरकोळ प्रमाणात शेतकरी उन्हाळात भातशेती करीत आहेत. तर शेतकºयांच्या ३० हेक्टर जमिनीवर अवसरे धरण बांधण्यात आले असून या धरणाच्या जलाशयात पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे केवळ भू भाडे असून काही शेतकºयाच्या जमिनी या सांडवा, मातीचा बांध आणि कालवे यांच्यासाठी वापरल्या आहेत. त्या जमिनी आता शेतकरी आपल्याला वापरायला मिळाव्यात म्हणून मागणी करीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागावर या भागातील शेतकरी नाराज आहेत. मात्र, धरण पाण्याने तुडुंब भरल्याने शेतकरी खूश झाला आहे. धरणाच्या जलाशयात पाणीसाठा हा ६४ दशलक्ष घनमीटर होत असून, मृत साठा वगळता ते सर्व पाणी हे शेतीसाठी देण्याचे नियोजन असते. मात्र, या भागात एका खासगी पाइपलाइनचे काम करण्यासाठी शेतीसाठी पाणी देणे बंद झाले. ते आजतागत दिले गेले नाही, त्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यात शेती करता येत नाही. या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची, त्यामुळे शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सहज शक्य व्हायचे; परंतु पाणी सोडले जात नसल्याने शेती करणे बंद झाले असून शेतकºयांच्या रोजगाराचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर महिन्यात शेतीसाठी पाणी सोडावे, अशी मागणी अवसरे, वरई, बिरदोले, कोदिवले, निकोप, मोहिली येथील शेतकरी करू लागले आहेत.शेतकºयांची मागणी असेल तर आम्ही शेतीसाठी पाणी सोडू शकतो. मात्र, धरणातून आम्ही दर वेळी कमी प्रमाणात पाणी सोडत असतोच; पण भात शेती केली जाणार असेल तर मात्र शेतीच्या आवश्यकतेनुसार पाणी सोडले जाईल.-भरत काटले,शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड