शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दादली, टोळ पूल धोकादायक, जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहतूक बंदी अधिसूचना लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:27 IST

रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे सावित्री नदीवरील दादली व टोळ हे दोन्ही पूल कमकुवत झाले आहेत

- जयंत धुळपअलिबाग : रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे सावित्री नदीवरील दादली व टोळ हे दोन्ही पूल कमकुवत झाले आहेत, त्यामुळे त्यावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार दोन्ही पुलांवरून केवळ २० मे. टन वाहतूक प्रतितास २० कि.मी. या वेगानेच करावी लागणार आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश शासनाने दिले होते, त्यानुसार टोळ पुलाचे १८ जुलै २०१८ रोजी केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार पुलाचे बेअरिंग पूर्णपणे खराब झाले आहेत, तसेच पूल पिलर्सच्या पाण्यातील बांधकामाला उभ्या भेगा पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, असा अहवाल अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवी मुंबई यांनी दिला आहे. तर दादली पुलाच्या पाहणीत, पूल पिलरच्या फाउंडेशन व नदीतळात पोकळी निर्माण झाली आहे. परिणामी, हा पूलदेखील कमकुवत झाला असून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाहूतक बंदी अधिसूचना जारी केली असून, ती शासन राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. सावित्री नदीवरील मांदाड-महाड-विसापूर रस्त्यामधील दादली पूल (लांबी १२०.५० मीटर) तसेच वीर-टोळ, आंबेत, बागमांडला रस्त्यावरील टोळ पूल (लांबी १५८ मीटर) हे कमकुवत झाले आहेत, असा अहवाल अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवी मुंबई यांनी तांत्रिक पाहणी व स्ट्रक्चरल आॅडिट करून दिला आहे.पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांची मागणीपुलांवरील अवजड वाहतूक बंद करून फक्त २० मे. टनपर्यंत वजनाची वाहतूक प्रतितास २० मि. मी. इतक्या धिम्या गतीने वेगाने चालू ठेवण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांना सूचित केले आहे. या बाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रायगड जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दादली पूल व टोळपूल या दोन्ही पुलांवरून अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचेआदेश देऊन वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.>३४ वर्षांपूर्वीचे पूलरत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी बॅ. ए. आर. अंतुले यांनी ३४ वर्षांपूर्वी ते मुख्यमंत्री असताना महाड तालुक्यातील टोळ, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी केली होती.प्राथमिक सर्वेक्षणानंतर हेतिन्ही पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल कमकुवत झाल्याचा सूचनाफलक लावण्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ माजली होती.