शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

दादली, टोळ पूल धोकादायक, जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहतूक बंदी अधिसूचना लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:27 IST

रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे सावित्री नदीवरील दादली व टोळ हे दोन्ही पूल कमकुवत झाले आहेत

- जयंत धुळपअलिबाग : रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे सावित्री नदीवरील दादली व टोळ हे दोन्ही पूल कमकुवत झाले आहेत, त्यामुळे त्यावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार दोन्ही पुलांवरून केवळ २० मे. टन वाहतूक प्रतितास २० कि.मी. या वेगानेच करावी लागणार आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश शासनाने दिले होते, त्यानुसार टोळ पुलाचे १८ जुलै २०१८ रोजी केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार पुलाचे बेअरिंग पूर्णपणे खराब झाले आहेत, तसेच पूल पिलर्सच्या पाण्यातील बांधकामाला उभ्या भेगा पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, असा अहवाल अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवी मुंबई यांनी दिला आहे. तर दादली पुलाच्या पाहणीत, पूल पिलरच्या फाउंडेशन व नदीतळात पोकळी निर्माण झाली आहे. परिणामी, हा पूलदेखील कमकुवत झाला असून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाहूतक बंदी अधिसूचना जारी केली असून, ती शासन राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. सावित्री नदीवरील मांदाड-महाड-विसापूर रस्त्यामधील दादली पूल (लांबी १२०.५० मीटर) तसेच वीर-टोळ, आंबेत, बागमांडला रस्त्यावरील टोळ पूल (लांबी १५८ मीटर) हे कमकुवत झाले आहेत, असा अहवाल अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवी मुंबई यांनी तांत्रिक पाहणी व स्ट्रक्चरल आॅडिट करून दिला आहे.पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांची मागणीपुलांवरील अवजड वाहतूक बंद करून फक्त २० मे. टनपर्यंत वजनाची वाहतूक प्रतितास २० मि. मी. इतक्या धिम्या गतीने वेगाने चालू ठेवण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांना सूचित केले आहे. या बाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रायगड जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दादली पूल व टोळपूल या दोन्ही पुलांवरून अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचेआदेश देऊन वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.>३४ वर्षांपूर्वीचे पूलरत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी बॅ. ए. आर. अंतुले यांनी ३४ वर्षांपूर्वी ते मुख्यमंत्री असताना महाड तालुक्यातील टोळ, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी केली होती.प्राथमिक सर्वेक्षणानंतर हेतिन्ही पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल कमकुवत झाल्याचा सूचनाफलक लावण्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ माजली होती.