शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Cyclone Nisarga: संकटात झाले देवाचे दर्शन; पोलीस यंत्रणेसह प्रशासनाचे अभूतपूर्व काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 00:46 IST

निसर्ग चक्रीवादळाला एक महिना पूर्ण, चक्रीवादळाने रमाकांत बाळू केळस्कर (७५) यांना नगरपरिषद व कर्मचारी यांचे वेगळेच रूप अनुभवायला मिळाले.

संतोष सापतेश्रीवर्धन : सदैव सर्वसामान्य व्यक्तीच्या चर्चेचा व टीका-टिप्पणीचा विषय असलेली प्रशासकीय यंत्रणा कोरोना आणि चक्रीवादळ या दोन्ही आपत्तींमध्ये जिव्हाळा, आपुलकीची ठरलेली आहे. चक्रीवादळाच्या नंतर विविध ठिकाणी खाकीतील माणुसकीचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आलेला आहे. आपली कर्तव्यनिष्ठा, जनतेप्रति दायित्व, आपुलकी याचे दर्शन लोकसमूहला घडलेले आहे. अनेकांनी या प्रशासकीय पोलीस यंत्रणेच्या मदतीमुळे देवाचेच दर्शन झाले असल्याची भावना व्यक्त के ली आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या यशस्वीतेनंतर त्याचे सर्व श्रेय संबंधित खात्यातील प्रमुखाच्या नावावरती जाते. मात्र, खऱ्या अर्थाने तळागाळात काम करणारी व्यक्ती ही कुठेतरी दुर्लक्षित केली जाते. शुक्रवार, ३ जुलै रोजी चक्रीवादळाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या अनुषंगाने खºया अर्थाने चक्रीवादळामध्ये काम केलेल्या समर्पक भावनेने कार्यरत असलेल्या सर्वसामान्य व्यक्तींचा मागोवा ‘लोकमत’च्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.

३ जूनला वादळ संपल्यानंतर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात निगडी येथील एका कुटुंबातील व्यक्ती वादळात भिंत पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. वादळाची तीव्रता प्रचंड होती. श्रीवर्धन ते निगडी नऊ किलोमीटर अंतर आहे. मात्र, सर्वत्र रस्त्यांवर झाडांचा खच पडलेला असताना, श्रीवर्धन ठाणे अंमलदार हवालदार सुरेश भगवान माने यांनी आपली कर्तव्यनिष्ठता बजावत, स्वत:च्या दुचाकीवरून निगडीकडे मार्गस्थ झाले. मात्र, रस्त्यावर सर्वत्र झाडे आडवी पडल्यामुळे दुचाकीवरून घटनास्थळी जाणे माने यांना शक्य नव्हते. या प्रसंगी माने यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला लावून ते चालत घटनास्थळी पोहोचले. चक्रीवादळाने भिंत पडून घरातील तरुण जागीच गतप्राण झाल्याचे माने यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरातील व्यक्तींना धीर देत, त्यांचे सांत्वन करून, पंचनामा पूर्ण करून आपले कर्तव्य पार पाडले. कर्तव्याप्रति जागरूक असलेल्या माने यांची कृती प्रथमदर्शनी अतिशय साधी वाटत असली, तरीसुद्धा आपत्तीच्या काळात त्यांनी दाखविलेली समयसूचकता अतिशय समर्पक आहे.

श्रीवर्धन शहरातील दाबक पाखाडीत भास्कर माळी या व्यक्तीने आपल्या निवृत्तीच्या प्राप्त रकमेतून घराची बांधणी केलेली होती. मात्र, चक्रीवादळाने भले मोठे आंब्याचे झाड चक्रीवादळानंतर त्यांच्या घरावर पडले. भास्कर त्याच्या कुटुंबातील इतर सभासदांसोबत जीव मुठीत धरून कसेतरी घरात थांबले. मात्र, वादळ शांत झाल्यानंतर, घरावरती पडलेल्या झाडाने कुटुंबातील सर्वच व्यक्तींची तारांबळ उडवून दिली. कारण भास्कर माळीच्या घरावरती पडलेले झाड अवाढव्य होते. पडलेल्या झाडांची कटाई करून देणाºया व्यक्तीने झाड घरापासून दूर करण्यास असमर्थता दर्शविली. यावेळी हातातील काम बाजूला सारून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दोन जेसीबींच्या मदतीने हे झाड बाजूला काढले व त्यानंतर भास्कर माळी व त्याच्या कुटुंबाला निर्माण झालेल्या धोक्यापासून त्यांची सुटका केली.पाच दिवसांनी सुटकाचक्रीवादळाने रमाकांत बाळू केळस्कर (७५) यांना नगरपरिषद व कर्मचारी यांचे वेगळेच रूप अनुभवायला मिळाले. केळकर बाबा हे कुसमा देवीच्या भागामध्ये राहतात. कुसमा देवी मंदिराच्या परिसरात चिंच, आंबा, वड व अन्य विविध जातींची झाडे रस्त्यावर उन्मळून पडलेली होती. हे वृद्ध दाम्पत्य पाच दिवस पडलेल्या झाडांमध्ये अडकून पडले होते. यावेळी नगरपरिषदेच्या वीरू वाणी, नरेश काप, बंड्या आगरकर, अमर गुरव यांच्या पथकान सर्व झाडे दूर करून केळस्करांची सुटका के ली.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ