शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सायबर क्राईम गुन्हे वाढले, २०२३ या वर्षात ४२ गुन्ह्यांची नोंद

By निखिल म्हात्रे | Updated: February 2, 2024 14:28 IST

यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेटची उपलब्धता तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईमचे लोण सर्वत्र पसरले आहे. २०२३ या वर्षात रायगड जिल्ह्यात सायबर क्राईम निगडित ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

वाढते नागरिकरण तसेच आधुनिक जीवनशैली यामुळे जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेट तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. सायबर क्राईमचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे. तसेच सायबर क्राईमसंबंधी वाढते गुन्हे लक्षात घेऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी तपास करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. २०२३ मध्ये सायबर क्राईमचे ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. सायबर क्राईममध्ये परदेशातील तसेच परराज्यातील काही टोळ्या सक्रीय असल्याने पोलीसांना तपास करताना अडचणी निर्माण होत आहेत. 

सायबर गुन्हेगारीचे प्रकार -- सोशल साईट्सच्या माध्यमातून तरुण, तरुणींना ब्लॅकमेल करणं- नोकरीविषयक साईट्सवरुन नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणं- विवाहविषयक साईट्सवर नोंदणी करणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक- ई-मेलवर माहिती मागवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे- बँकेतून फोन केल्याची बतावणी करत खात्याची सर्व माहिती घेऊन त्याआधारे फसवणूक

लोकांचे दुर्लक्ष सायबर गुन्हे वाढण्यास कारणीभूत -अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हे आवाहन करताना तसे संदेशही अनेकदा मोबाईलवरून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही आणि तो विचारूही शकत नाही. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. तरीही ग्राहक या फसवेगिरीला फसतो आणि दृष्टचक्रात अडकतो.

सोशल नेटवर्किंग साईटवर आपली संपूर्ण माहिती टाकू नका. अनोलखी माणसासोबत चॅटींग करताना त्याला आपले फोटो तसेच वैयक्तिक माहिती देऊ नका असे आवाहनही पोलीस करतात, मात्र याकडेही नागरिक दुर्लक्ष करतात, यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावत आहे. त्यामुळे नागरीकांनी आपल्याला आलेला ओटीपी कोणालाही  देऊ नये.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस