शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

जिल्ह्यात सायबर क्राईम गुन्हे वाढले, २०२३ या वर्षात ४२ गुन्ह्यांची नोंद

By निखिल म्हात्रे | Updated: February 2, 2024 14:28 IST

यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेटची उपलब्धता तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईमचे लोण सर्वत्र पसरले आहे. २०२३ या वर्षात रायगड जिल्ह्यात सायबर क्राईम निगडित ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

वाढते नागरिकरण तसेच आधुनिक जीवनशैली यामुळे जिल्ह्यात सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. इंटरनेट तसेच मोबाईलची वाढती संख्या यामुळे सायबर क्राईम वाढत असल्याचे दिसून येते. सायबर क्राईमचे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे. तसेच सायबर क्राईमसंबंधी वाढते गुन्हे लक्षात घेऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी तपास करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही सायबर क्राईमचे गुन्हे सातत्याने घडत आहेत. २०२३ मध्ये सायबर क्राईमचे ४२ गुन्हे घडले आहेत. यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. सायबर क्राईममध्ये परदेशातील तसेच परराज्यातील काही टोळ्या सक्रीय असल्याने पोलीसांना तपास करताना अडचणी निर्माण होत आहेत. 

सायबर गुन्हेगारीचे प्रकार -- सोशल साईट्सच्या माध्यमातून तरुण, तरुणींना ब्लॅकमेल करणं- नोकरीविषयक साईट्सवरुन नोकरीच्या आमिषाने पैसे घेऊन फसवणूक करणं- विवाहविषयक साईट्सवर नोंदणी करणाऱ्या महिलांची आर्थिक फसवणूक- ई-मेलवर माहिती मागवून त्यांची आर्थिक फसवणूक करणे- बँकेतून फोन केल्याची बतावणी करत खात्याची सर्व माहिती घेऊन त्याआधारे फसवणूक

लोकांचे दुर्लक्ष सायबर गुन्हे वाढण्यास कारणीभूत -अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हे आवाहन करताना तसे संदेशही अनेकदा मोबाईलवरून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही आणि तो विचारूही शकत नाही. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. तरीही ग्राहक या फसवेगिरीला फसतो आणि दृष्टचक्रात अडकतो.

सोशल नेटवर्किंग साईटवर आपली संपूर्ण माहिती टाकू नका. अनोलखी माणसासोबत चॅटींग करताना त्याला आपले फोटो तसेच वैयक्तिक माहिती देऊ नका असे आवाहनही पोलीस करतात, मात्र याकडेही नागरिक दुर्लक्ष करतात, यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावत आहे. त्यामुळे नागरीकांनी आपल्याला आलेला ओटीपी कोणालाही  देऊ नये.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस