शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कोलमडणा-या इंटरनेट सेवेमुळे ग्राहक संतप्तदोन महिन्यांपासून समस्या : हजारो ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:22 IST

वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

उरण : वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदी विभागातील हजारो ग्राहकांना बसला आहे. एमटीएनएलच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. शासकीय कार्यालयाही सातत्याने बंद पडणा-या इंटरनेट सेवेचा फटका बसला आहे. त्याचा विपरीत परिणाम विविध शासकीय कार्यालये, बँकांच्या कामकाजावरही होऊ लागला आहे. त्याचा नाहक मनस्ताप मात्र नागरिक आणि ग्राहकांना होत आहे. याबाबत उरण एमटीएनएल कार्यालयाकडे विचारणा केली असता उरण-जासई, बेलापूर, करळ ब्रिज, उरण शहर परिसरात सातत्याने रस्त्यासाठी खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामांमुळे वारंवार आॅप्टीकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेट सेवा कोलमडत असल्याची माहिती एमटीएनएलचे उरण विभागाचे डीएम एल. आर. यादव यांनी दिली. याबाबत विचारणा केली असता उरण एमटीएनएलचे अधिकाºयांकडून टाळाटाळ करण्यातयेत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जावून इंटरनेट सेवाच बंद करण्याचा इशारा देवू लागलेआहेत.वारंवार होणाºया इंटरनेट सेवा दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्गालाच फारसे स्वारस्य नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्यात कामचुकार अधिकारीच जादा जबाबदार असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.बोर्ली पंचतनमध्ये नेटवर्कचे तीनतेरादांडगुरी : तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य ग्राहक मोबाइलसाठी इंटरनेटचा वापर करतात. बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच सर्व मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क खंडित होत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.दिवेआगर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असून डिसेंबर, जानेवारीत हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. मात्र सातत्याने नेटवर्क जात असल्याने पर्यटकांना व स्थानिकांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. मोबाइलचे नेटवर्क जाणे, फोन कट होणे, नेटवर्क संथ असल्यच्या अडचणी ग्राहकांना येत आहेत.तक्र ार करायची म्हटले तरी ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचाºयांकडून कोणत्याही समस्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे जलद चालणाºया कंपनीची सेवा शहरात मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड