शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

कोलमडणा-या इंटरनेट सेवेमुळे ग्राहक संतप्तदोन महिन्यांपासून समस्या : हजारो ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:22 IST

वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

उरण : वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदी विभागातील हजारो ग्राहकांना बसला आहे. एमटीएनएलच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. शासकीय कार्यालयाही सातत्याने बंद पडणा-या इंटरनेट सेवेचा फटका बसला आहे. त्याचा विपरीत परिणाम विविध शासकीय कार्यालये, बँकांच्या कामकाजावरही होऊ लागला आहे. त्याचा नाहक मनस्ताप मात्र नागरिक आणि ग्राहकांना होत आहे. याबाबत उरण एमटीएनएल कार्यालयाकडे विचारणा केली असता उरण-जासई, बेलापूर, करळ ब्रिज, उरण शहर परिसरात सातत्याने रस्त्यासाठी खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामांमुळे वारंवार आॅप्टीकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेट सेवा कोलमडत असल्याची माहिती एमटीएनएलचे उरण विभागाचे डीएम एल. आर. यादव यांनी दिली. याबाबत विचारणा केली असता उरण एमटीएनएलचे अधिकाºयांकडून टाळाटाळ करण्यातयेत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जावून इंटरनेट सेवाच बंद करण्याचा इशारा देवू लागलेआहेत.वारंवार होणाºया इंटरनेट सेवा दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्गालाच फारसे स्वारस्य नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्यात कामचुकार अधिकारीच जादा जबाबदार असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.बोर्ली पंचतनमध्ये नेटवर्कचे तीनतेरादांडगुरी : तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य ग्राहक मोबाइलसाठी इंटरनेटचा वापर करतात. बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच सर्व मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क खंडित होत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.दिवेआगर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असून डिसेंबर, जानेवारीत हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. मात्र सातत्याने नेटवर्क जात असल्याने पर्यटकांना व स्थानिकांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. मोबाइलचे नेटवर्क जाणे, फोन कट होणे, नेटवर्क संथ असल्यच्या अडचणी ग्राहकांना येत आहेत.तक्र ार करायची म्हटले तरी ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचाºयांकडून कोणत्याही समस्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे जलद चालणाºया कंपनीची सेवा शहरात मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड