शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

१०४ कोटी ३६ लाखांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:16 IST

खरीप हंगामासाठी शेतकºयांना द्यावयाचे पीक कर्ज, पीक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : खरीप हंगामासाठी शेतकºयांना द्यावयाचे पीक कर्ज, पीक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ८९७ खातेदारांना १०४ कोटी ३६ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटप अधिकाधिक शेतकºयांना झाले पाहिजे, त्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी दिले आहेत.शेतकरी खरीप पीक कर्ज, पीक विमा तसेच कर्जमाफी योजनेअंतर्गत द्यावयाचे १० हजार रु पयांचे अंतरिम कर्ज यांचा जिल्ह्यातील वितरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बँकांच्या विशेष समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. जिल्हाधिकाºयांनी बैठकीत बँकनिहाय आढावा घेतला. कर्जमाफी योजनेत द्यावयाचे १० हजार रु पयांच्या वितरणाबाबत तसेच पीक विमा यासंदर्भात आढावा घेतला. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध कर्ज योजनांतर्गत द्यावयाच्या कर्ज वितरण प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सामाजिक साहाय्य योजनांमधील लाभार्थी, तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेचे नोंदणीकृत मजूर यांची बँक खाती प्राधान्याने आधार संलग्नित करावी अशी सूचनाही यावेळी दिली.बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अशोक नंदनवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रामदास बघे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रेमलता जैतू, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुधाकर रगतवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक प्रदीप नाईक, बँक आॅफ महाराष्ट्र व्यवस्थापक ए.एस. पाटणकर, पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक आर.बी.नलावडे, विविध बँकांचे अधिकार आणि शाखाप्रमुख उपस्थित होते.