शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पीक गेलं... आता प्रतीक्षा सरकारी मदतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:10 IST

सरकारच्या महसूल यंत्रणेने त्या वेळी नुकसान पहाणी दौराकरून बाधीत झालेल्या शेतीमधून ७० टक्के नुकसान झाल्याचे पहाणी

पेण : तालुक्यातील शेतकरी कष्टकरी असून यावर्षी दोनवेळा आलेल्या महापुरात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यातच शेतीची अतीवृष्टी व महापूराने पूर्ण विल्हेवाट लावली होती. उध्वस्त झालेल्या शेतीकडे हताश नजरेने पहात न शेतक-यांनी त्यावेळीच खरीपाच्या उत्पन्नाची आशा सोडून दिली होती. मात्र शेतजमीनीला हिरवी साडी परिधान करायची या वेड्या आशेने इकडून तिकडून पीक गोळा करुन लागवड केली.

सरकारच्या महसूल यंत्रणेने त्या वेळी नुकसान पहाणी दौराकरून बाधीत झालेल्या शेतीमधून ७० टक्के नुकसान झाल्याचे पहाणी अहवाल तयार केला होता. सप्टेबर महिन्यामधील हा अहवाल होता. त्यानंतर आक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस व समुद्रात आलेल्या क्यार, महाचक्रीवादळमुळे शिवारात जे उरलेल ३० टक्के पीक होत ते सुध्दा पावसाने हिरावून नेल्याने आता शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आशा आहे. पेणमध्ये १०० टक्के शेती नुकसानीचा अहवाल तयार झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पंचनामे युध्दपातळीवर करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक यांची पथके कार्यरत झाले आहेत.महाचक्रीवादळ येणार असल्याच्या भीतीने शेतात जे काही बाकी राहिलं आहे, ते भातपीक थोडे थोडे कापून शेताच्या बांधावर झोडणी करुन शेतकरी धान्य घरी नेण्यासाठी धावपळ करताना शिवारात दिसत आहेत. पावसाने झालं तेवढ खूप नुकसान झालं; त्यात पदरी खाण्यापूर्त तरी मिळावं या अपेक्षे ही शिवारात सुरू असेली धावपळ दिसून येत आहे. २०१५-१६ नंतर २०१६-१७ व २०१७-१८अशा तीन वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले होते. सरकारी मदतीचा हात म्हणावा तसा मिळाला नव्हता. मात्र गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळाले होते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ रकमेपैकी दोन हजार रुपयांचे दोन हप्ते शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेत. याचा लाभ ५० टक्के शेतक-यांना मिळाला आहे; मात्र ५० टेक्के शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. सरकारी यंत्रणेला याकामी पूर्ण वेळ मिळाला नाही. अतिवृष्टी, महापूर, वादळी वाऱ्यांसह जोरदार पडणा-या पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.

टॅग्स :Raigadरायगड