शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

पीक गेलं... आता प्रतीक्षा सरकारी मदतीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:10 IST

सरकारच्या महसूल यंत्रणेने त्या वेळी नुकसान पहाणी दौराकरून बाधीत झालेल्या शेतीमधून ७० टक्के नुकसान झाल्याचे पहाणी

पेण : तालुक्यातील शेतकरी कष्टकरी असून यावर्षी दोनवेळा आलेल्या महापुरात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यातच शेतीची अतीवृष्टी व महापूराने पूर्ण विल्हेवाट लावली होती. उध्वस्त झालेल्या शेतीकडे हताश नजरेने पहात न शेतक-यांनी त्यावेळीच खरीपाच्या उत्पन्नाची आशा सोडून दिली होती. मात्र शेतजमीनीला हिरवी साडी परिधान करायची या वेड्या आशेने इकडून तिकडून पीक गोळा करुन लागवड केली.

सरकारच्या महसूल यंत्रणेने त्या वेळी नुकसान पहाणी दौराकरून बाधीत झालेल्या शेतीमधून ७० टक्के नुकसान झाल्याचे पहाणी अहवाल तयार केला होता. सप्टेबर महिन्यामधील हा अहवाल होता. त्यानंतर आक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस व समुद्रात आलेल्या क्यार, महाचक्रीवादळमुळे शिवारात जे उरलेल ३० टक्के पीक होत ते सुध्दा पावसाने हिरावून नेल्याने आता शेतकऱ्यांना सरकारी मदतीची आशा आहे. पेणमध्ये १०० टक्के शेती नुकसानीचा अहवाल तयार झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पंचनामे युध्दपातळीवर करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक यांची पथके कार्यरत झाले आहेत.महाचक्रीवादळ येणार असल्याच्या भीतीने शेतात जे काही बाकी राहिलं आहे, ते भातपीक थोडे थोडे कापून शेताच्या बांधावर झोडणी करुन शेतकरी धान्य घरी नेण्यासाठी धावपळ करताना शिवारात दिसत आहेत. पावसाने झालं तेवढ खूप नुकसान झालं; त्यात पदरी खाण्यापूर्त तरी मिळावं या अपेक्षे ही शिवारात सुरू असेली धावपळ दिसून येत आहे. २०१५-१६ नंतर २०१६-१७ व २०१७-१८अशा तीन वर्षांत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले होते. सरकारी मदतीचा हात म्हणावा तसा मिळाला नव्हता. मात्र गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळाले होते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ रकमेपैकी दोन हजार रुपयांचे दोन हप्ते शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेत. याचा लाभ ५० टक्के शेतक-यांना मिळाला आहे; मात्र ५० टेक्के शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. सरकारी यंत्रणेला याकामी पूर्ण वेळ मिळाला नाही. अतिवृष्टी, महापूर, वादळी वाऱ्यांसह जोरदार पडणा-या पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.

टॅग्स :Raigadरायगड