शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

पावसामुळे पिकाचे नुकसान , शेतकरी चिंताग्रस्त : आदिवासीवाड्यांतील प्रकार; काळ्या पावसाने भात गळती झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:14 IST

भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा

नागोठणे : भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. अर्धे अधिक पीक वाया गेल्याने कृषी खात्याने त्याची पाहणी करावी, अशी मागणी वासगाव येथील अशोक कोकरे, जानू कोकरे, कोंडू कोकरेंसह नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.१५ दिवसांपूर्वी शहराच्या पूर्वेकडील वासगाव, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याचीवाडी आदी आदिवासीवाड्यांवर रसायनमिश्रीत काळ्या रंगाचा पाऊस पडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल, कृषी तसेच प्रदूषण मंडळाने येथे पाहणी करण्याचा कार्यक्रम उरकला होता. या पावसामुळे बहुतांशी भाजीपाला आणि फळभाजीचे पीक वाया गेले होते. विशेष म्हणजे, संबंधित खात्यांच्या या दौºयात भातशेतीची पाहणी केली होती. भाताचे पीक तेव्हा पूर्ण तयार झाले नसल्याने त्या वेळी भाताचे पीक शाबूत असल्याचा पंचनामा संबंधितांकडून करण्यात येऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार केला होता. कालांतराने काही दिवसांनी पिकाची शेतात कापणी करण्यात येऊन ते शेतातच आडवे टाकण्यात आले होते. मात्र, झोडणीसाठी भाताच्या लोंब्या घेतल्या असता, शेतकºयांना त्यावरील भाताचे बहुतांशी दाणे शेतातच गळून गेले असल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले. तयार झालेल्या भात पिकाच्या बुंध्याला, तसेच कणसाला किडींचा प्रादूर्भाव झाल्यामुळेच हाती आलेले पीक गळून गेले असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक पिकाला आम्ही मुकलो असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडे, हेमंत हंबीर यांनी सांगितले.मागे पडलेल्या काळ्या पावसामुळे भाजीपाला पीक नष्ट झाले होते व आता तयार झालेले भात पीक आमच्या हाताला लागले नसल्याने काळ्या पावसाचाच हा प्रताप असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तेव्हापासून एकही सरकारी कर्मचारी पंचनामा करण्यासाठी येथे पोहोचलाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरी