शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पावसामुळे पिकाचे नुकसान , शेतकरी चिंताग्रस्त : आदिवासीवाड्यांतील प्रकार; काळ्या पावसाने भात गळती झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:14 IST

भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा

नागोठणे : भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. अर्धे अधिक पीक वाया गेल्याने कृषी खात्याने त्याची पाहणी करावी, अशी मागणी वासगाव येथील अशोक कोकरे, जानू कोकरे, कोंडू कोकरेंसह नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.१५ दिवसांपूर्वी शहराच्या पूर्वेकडील वासगाव, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याचीवाडी आदी आदिवासीवाड्यांवर रसायनमिश्रीत काळ्या रंगाचा पाऊस पडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल, कृषी तसेच प्रदूषण मंडळाने येथे पाहणी करण्याचा कार्यक्रम उरकला होता. या पावसामुळे बहुतांशी भाजीपाला आणि फळभाजीचे पीक वाया गेले होते. विशेष म्हणजे, संबंधित खात्यांच्या या दौºयात भातशेतीची पाहणी केली होती. भाताचे पीक तेव्हा पूर्ण तयार झाले नसल्याने त्या वेळी भाताचे पीक शाबूत असल्याचा पंचनामा संबंधितांकडून करण्यात येऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार केला होता. कालांतराने काही दिवसांनी पिकाची शेतात कापणी करण्यात येऊन ते शेतातच आडवे टाकण्यात आले होते. मात्र, झोडणीसाठी भाताच्या लोंब्या घेतल्या असता, शेतकºयांना त्यावरील भाताचे बहुतांशी दाणे शेतातच गळून गेले असल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले. तयार झालेल्या भात पिकाच्या बुंध्याला, तसेच कणसाला किडींचा प्रादूर्भाव झाल्यामुळेच हाती आलेले पीक गळून गेले असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक पिकाला आम्ही मुकलो असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडे, हेमंत हंबीर यांनी सांगितले.मागे पडलेल्या काळ्या पावसामुळे भाजीपाला पीक नष्ट झाले होते व आता तयार झालेले भात पीक आमच्या हाताला लागले नसल्याने काळ्या पावसाचाच हा प्रताप असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तेव्हापासून एकही सरकारी कर्मचारी पंचनामा करण्यासाठी येथे पोहोचलाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरी