शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

पावसामुळे पिकाचे नुकसान , शेतकरी चिंताग्रस्त : आदिवासीवाड्यांतील प्रकार; काळ्या पावसाने भात गळती झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:14 IST

भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा

नागोठणे : भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. अर्धे अधिक पीक वाया गेल्याने कृषी खात्याने त्याची पाहणी करावी, अशी मागणी वासगाव येथील अशोक कोकरे, जानू कोकरे, कोंडू कोकरेंसह नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.१५ दिवसांपूर्वी शहराच्या पूर्वेकडील वासगाव, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याचीवाडी आदी आदिवासीवाड्यांवर रसायनमिश्रीत काळ्या रंगाचा पाऊस पडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल, कृषी तसेच प्रदूषण मंडळाने येथे पाहणी करण्याचा कार्यक्रम उरकला होता. या पावसामुळे बहुतांशी भाजीपाला आणि फळभाजीचे पीक वाया गेले होते. विशेष म्हणजे, संबंधित खात्यांच्या या दौºयात भातशेतीची पाहणी केली होती. भाताचे पीक तेव्हा पूर्ण तयार झाले नसल्याने त्या वेळी भाताचे पीक शाबूत असल्याचा पंचनामा संबंधितांकडून करण्यात येऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार केला होता. कालांतराने काही दिवसांनी पिकाची शेतात कापणी करण्यात येऊन ते शेतातच आडवे टाकण्यात आले होते. मात्र, झोडणीसाठी भाताच्या लोंब्या घेतल्या असता, शेतकºयांना त्यावरील भाताचे बहुतांशी दाणे शेतातच गळून गेले असल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले. तयार झालेल्या भात पिकाच्या बुंध्याला, तसेच कणसाला किडींचा प्रादूर्भाव झाल्यामुळेच हाती आलेले पीक गळून गेले असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक पिकाला आम्ही मुकलो असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडे, हेमंत हंबीर यांनी सांगितले.मागे पडलेल्या काळ्या पावसामुळे भाजीपाला पीक नष्ट झाले होते व आता तयार झालेले भात पीक आमच्या हाताला लागले नसल्याने काळ्या पावसाचाच हा प्रताप असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तेव्हापासून एकही सरकारी कर्मचारी पंचनामा करण्यासाठी येथे पोहोचलाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Farmerशेतकरी