शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता महत्त्वाची, त्रुटी असल्यास सुधारण्याची अपेक्षा - कायदेतज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 04:52 IST

देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्तींनी जे. चेलमेश्वर, न्या.रंजन गोगोई, न्या.माधव बी. लोकूर आणि न्या. कुरीयन जोसेफ यांनी शुक्र वारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेवून, सर्वोच्च न्यायालयातील प्रशासनाबाबत माहिती प्रसार माध्यमांना दिली. याबाबत रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिक्रिया.

अलिबाग : देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्तींनी जे. चेलमेश्वर, न्या.रंजन गोगोई, न्या.माधव बी. लोकूर आणि न्या. कुरीयन जोसेफ यांनी शुक्र वारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेवून, सर्वोच्च न्यायालयातील प्रशासनाबाबत माहिती प्रसार माध्यमांना दिली. याबाबत रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ वकिलांच्या प्रतिक्रिया.न्यायाधीशांना प्रसार माध्यमांसमोर यावे लागले, ही अभूतपूर्व पायरी चढावी लागली. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गंभीर मुद्दा आहे किंवा त्यांच्यात काहीतरी अंतर्गत वाद असतील, पत्रकार परिषदेतून हे समोर आले आहे. यात काही चुकीचे नसून मी स्वत: याचे समर्थन करतो.- सचिन पवार, स्टुडंट लॉ कौन्सिलन्याय व्यवस्थेसाठी ही अशोभनीय घटना आहे. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन हा वाद चव्हाट्यावर येणे, हे कितपत योग्य आहे. संपूर्ण देशाचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास या घटनेमुळे ढासळू शकतो.- अ‍ॅड. नरेश ठाकूर, खारघरसर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियममधील ज्येष्ठ न्यायाधीशांनी हा वितंडवाद पत्रकार परिषद घेवून जनतेसमोर मांडावा हे क्लेशकार आणि अगतिक असेच आहे. गेल्या काही वर्षांत विशेषत: अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ६० पानी आत्महत्या चिठ्ठीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल दयावह विधाने केली होती. त्यांच्या विधवा पत्नीने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे केलेल्या याचिकेपासून उत्तरप्रदेशातील मेडिकल कॉलेजपर्यंतचे जे प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात घडत होते. ते सर्वोच्च संकटासारखेच होते. त्यानंतर न्यायालयाच्या आणि प्रशासकीय आदेशांच्या प्रक्रियेतून काही सोईचे आदेश पारित होत गेले हे सर्वसामान्यांनी पाहिले होते.-अ‍ॅड. प्रदीप पाटील,मुंबई उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेवून न्यायालयातील न पटणाºया गोष्टी प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनतेसमोर मांडाव्या ही देशातली पहिली आणि धक्कादायक घटना आहे. मुळात अशी वेळ येणे हे दुर्देैवी म्हणावे लागेल. मात्र यानिमित्ताने सर्वसामान्य माणसाच्या मनात सर्वोच्च न्यायव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होवू शकते.-अ‍ॅड.प्रसाद पाटील,रायगडचे माजी जिल्हा सरकारी वकीलसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेणे हे बालिशपणाचे आहे. पदाचे भान राखणे आवश्यक होते. राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचा पर्याय होता. परंतु तसे न करता थेट पत्रकार परिषद घेणे यामुळे जनसामान्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होवू शकते. मतभेद असू शकतात, परंतु त्यावर हा मार्ग नाही.-अ‍ॅड.नीला तुळपुळे, रायगड जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ महिला वकीलजनसामान्यांना सर्वोच्च न्यायालयाप्रती नितांत आदर आहे. न्याय मिळण्याचे अंतिम न्यायालय म्हणून जनसामान्यांचा मोठा भरवसा सर्वोच्च न्यायालयावर असतो. अशा प्रकारे ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेवून माहिती प्रसिध्दी माध्यमांना देणे, यातून जनसामान्यांच्या मनातील सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा डळमळीत होवू शकते.-अ‍ॅड.स्वाती लेले, रायगड जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ महिला वकील

टॅग्स :Courtन्यायालय