शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धुतुम ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार? सेना- भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:16 IST

ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करावे

उरण : वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या केलेल्या अनेक विकासकामात अपहार केला आहे. शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करीत सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे. 

शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा गंभीर आरोप रविनाथ ठाकूर,अंगत ठाकूर, निर्मला ठाकूर, पूजा ठाकूर आदी सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी केला.  पुराव्यानिशी दाखल केलेल्या लेखी तक्रारीची माहिती देतानाच तातडीने धुतुम ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे. या मागणीमुळे मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ९ आहे. यापैकी  थेट निवडून आलेल्या सरपंचासह शेकापचे ६ सदस्य तर दोन-दोन सदस्य  सेना-काँग्रेसच्या महाआघाडीचे आहेत. शेकाप मागील साडेतीन वर्षांपासून सत्तेवर आहे.  याआधीही विविध राजकीय पक्षांच्या सत्ताकाळातही धुतुम ग्रामपंचायत कायम वादात राहिली आहे. मात्र मागील साडेतीन वर्षांपासून ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराच्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.

वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या विकासकामात अपहार केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून गैरकारभार चालविला आहे. विरोधकांच्या ठाम विरोधानंतरही ५७ लाखांची रक्कम बुडित गेलेल्या कर्नाळा बँकेत ठेवण्यात आली आहे. ३५ लाख रुपये खर्च घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र कचरा व्यवस्थापन कागदावरच उरले आहे. ग्रामपंचायतींमध्ये मागील साडेतीन वर्षांच्या कालावधीत सुमारे अडीच कोटींची विविध विकासकामे, दुरुस्ती आणि इतर तत्सम कामे झाल्याचे दाखविण्यात आली आहेत. मात्र ही कामे फक्त प्रत्यक्षात कागदावरच दिसून येत आहेत. यामध्ये सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न झालेल्या कामांची बनावट बिले बनवून मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार केला आहे. विरोधी सदस्यांनी मागणी केल्यानंतरही प्रोसिडिंग, आवश्यककागदपत्रे, माहिती दिली जात नाही. सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या अशा मनमानी कारभारामुळे मात्र ग्रामपंचायतीचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.

धुतुम ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासात सत्ताधारी आणि विरोधक असा कोणत्याही प्रकारचा पक्षभेद न करता विकास कामे पार पाडीत आहोत. मात्र स्वतःला विरोधक समजणारे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या सभेस उपस्थित राहूनही सभेच्या अजेंठ्यावर स्वाक्षऱ्या करीत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मुभा का देण्यात यावी? भ्रष्टाचार, गैरप्रकार, मनमानी कारभाराचा  कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे  विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना योग्य वेळी चोख उत्तर दिले जाईल. - रेश्मा ठाकूर, सरपंच, धुतुम 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा