शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

धुतुम ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार? सेना- भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:16 IST

ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करावे

उरण : वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या केलेल्या अनेक विकासकामात अपहार केला आहे. शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करीत सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे. 

शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा गंभीर आरोप रविनाथ ठाकूर,अंगत ठाकूर, निर्मला ठाकूर, पूजा ठाकूर आदी सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी केला.  पुराव्यानिशी दाखल केलेल्या लेखी तक्रारीची माहिती देतानाच तातडीने धुतुम ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे. या मागणीमुळे मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ९ आहे. यापैकी  थेट निवडून आलेल्या सरपंचासह शेकापचे ६ सदस्य तर दोन-दोन सदस्य  सेना-काँग्रेसच्या महाआघाडीचे आहेत. शेकाप मागील साडेतीन वर्षांपासून सत्तेवर आहे.  याआधीही विविध राजकीय पक्षांच्या सत्ताकाळातही धुतुम ग्रामपंचायत कायम वादात राहिली आहे. मात्र मागील साडेतीन वर्षांपासून ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराच्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.

वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या विकासकामात अपहार केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून गैरकारभार चालविला आहे. विरोधकांच्या ठाम विरोधानंतरही ५७ लाखांची रक्कम बुडित गेलेल्या कर्नाळा बँकेत ठेवण्यात आली आहे. ३५ लाख रुपये खर्च घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र कचरा व्यवस्थापन कागदावरच उरले आहे. ग्रामपंचायतींमध्ये मागील साडेतीन वर्षांच्या कालावधीत सुमारे अडीच कोटींची विविध विकासकामे, दुरुस्ती आणि इतर तत्सम कामे झाल्याचे दाखविण्यात आली आहेत. मात्र ही कामे फक्त प्रत्यक्षात कागदावरच दिसून येत आहेत. यामध्ये सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न झालेल्या कामांची बनावट बिले बनवून मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार केला आहे. विरोधी सदस्यांनी मागणी केल्यानंतरही प्रोसिडिंग, आवश्यककागदपत्रे, माहिती दिली जात नाही. सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या अशा मनमानी कारभारामुळे मात्र ग्रामपंचायतीचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.

धुतुम ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासात सत्ताधारी आणि विरोधक असा कोणत्याही प्रकारचा पक्षभेद न करता विकास कामे पार पाडीत आहोत. मात्र स्वतःला विरोधक समजणारे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या सभेस उपस्थित राहूनही सभेच्या अजेंठ्यावर स्वाक्षऱ्या करीत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मुभा का देण्यात यावी? भ्रष्टाचार, गैरप्रकार, मनमानी कारभाराचा  कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे  विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना योग्य वेळी चोख उत्तर दिले जाईल. - रेश्मा ठाकूर, सरपंच, धुतुम 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा