शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

धुतुम ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार? सेना- भाजपचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:16 IST

ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करावे

उरण : वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या केलेल्या अनेक विकासकामात अपहार केला आहे. शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप करीत सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे. 

शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा गंभीर आरोप रविनाथ ठाकूर,अंगत ठाकूर, निर्मला ठाकूर, पूजा ठाकूर आदी सेना-काँग्रेसच्या चार सदस्यांनी केला.  पुराव्यानिशी दाखल केलेल्या लेखी तक्रारीची माहिती देतानाच तातडीने धुतुम ग्रामपंचायतीच्या कामाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी रायगड जिल्ह्याचे सहाय्यक संचालकांकडे केली आहे. या मागणीमुळे मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्या ९ आहे. यापैकी  थेट निवडून आलेल्या सरपंचासह शेकापचे ६ सदस्य तर दोन-दोन सदस्य  सेना-काँग्रेसच्या महाआघाडीचे आहेत. शेकाप मागील साडेतीन वर्षांपासून सत्तेवर आहे.  याआधीही विविध राजकीय पक्षांच्या सत्ताकाळातही धुतुम ग्रामपंचायत कायम वादात राहिली आहे. मात्र मागील साडेतीन वर्षांपासून ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराच्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा ग्रामपंचायत चर्चेत आली आहे.

वार्षिक ९० लाखांचे उत्पन्न असलेल्या धुतुम ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शेकापने अडीच कोटींच्या विकासकामात अपहार केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून गैरकारभार चालविला आहे. विरोधकांच्या ठाम विरोधानंतरही ५७ लाखांची रक्कम बुडित गेलेल्या कर्नाळा बँकेत ठेवण्यात आली आहे. ३५ लाख रुपये खर्च घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र कचरा व्यवस्थापन कागदावरच उरले आहे. ग्रामपंचायतींमध्ये मागील साडेतीन वर्षांच्या कालावधीत सुमारे अडीच कोटींची विविध विकासकामे, दुरुस्ती आणि इतर तत्सम कामे झाल्याचे दाखविण्यात आली आहेत. मात्र ही कामे फक्त प्रत्यक्षात कागदावरच दिसून येत आहेत. यामध्ये सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न झालेल्या कामांची बनावट बिले बनवून मोठ्या प्रमाणावर निधीचा अपहार केला आहे. विरोधी सदस्यांनी मागणी केल्यानंतरही प्रोसिडिंग, आवश्यककागदपत्रे, माहिती दिली जात नाही. सत्ताधाऱ्यांनी चालविलेल्या अशा मनमानी कारभारामुळे मात्र ग्रामपंचायतीचा विकास पूर्णपणे खुंटला आहे.

धुतुम ग्रामपंचायतीमध्ये गावाच्या विकासात सत्ताधारी आणि विरोधक असा कोणत्याही प्रकारचा पक्षभेद न करता विकास कामे पार पाडीत आहोत. मात्र स्वतःला विरोधक समजणारे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीच्या सभेस उपस्थित राहूनही सभेच्या अजेंठ्यावर स्वाक्षऱ्या करीत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मुभा का देण्यात यावी? भ्रष्टाचार, गैरप्रकार, मनमानी कारभाराचा  कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे  विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना योग्य वेळी चोख उत्तर दिले जाईल. - रेश्मा ठाकूर, सरपंच, धुतुम 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा