शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कॉरिडॉरमुळे शेतकरी लागणार देशोधडीला

By admin | Updated: February 3, 2017 02:35 IST

दिल्ली-मुंबई, अमृतसर-कोलकाता, चेन्नई-बंगळूर, मुंबई-बंगळूर आणि विशाखपट्टणम-बंगळूर अशा पाच कॉरिडॉरमुळे देशाचा ४३ टक्के भूभाग प्रभावित होणार आहे. दिल्ली-मुंबई

- आविष्कार देसाई,  अलिबाग

दिल्ली-मुंबई, अमृतसर-कोलकाता, चेन्नई-बंगळूर, मुंबई-बंगळूर आणि विशाखपट्टणम-बंगळूर अशा पाच कॉरिडॉरमुळे देशाचा ४३ टक्के भूभाग प्रभावित होणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे शेतकऱ्यांची जमीन, गावठाण, नोकरीही मिळणार नसल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या प्रकल्पांना २०१३ चा भूसंपादन कायदा लागू झाला पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी आता सक्तीने संपादन करण्याचे पाऊल उचलण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यांनी सक्तीचे भूसंपादन थांबवावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या उल्का महाजन यांनी दिला. अलिबाग येथील रायगड जिल्हा पत्रकार भवन येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉर जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील १४ हजार १३७ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. जिल्ह्यात प्रकल्प येणार हे आधीच सत्ताधाऱ्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या हस्तकांनी तेथे जमिनी घेऊन त्या विकल्या आहेत. ज्यांना शेतीशी काही देणे घेणे नाही त्यांनी तातडीने संपादनाला संमती दिली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना याची माहिती दिली आहे. हेच मंत्री सत्तेमध्ये नव्हते तेव्हा आमच्या आंदोलनात सामील झाले होते, आता त्यांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असे महाजन यांनी सांगितले.- दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या संकल्पनेलाच आक्षेप आहे. लोकशाही पध्दतीने राबवलेला हा प्रकल्प नसून केवळ भांडवलदारांना खूश करण्यासाठीची ही योजना आहे. भारत सरकार आणि जपान सरकार यांच्यामध्ये एमओयू झाला आहे. जपानची यामध्ये २६ टक्के भागीदारी आहे. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी हजारो एकर जमिनीचे आधीच संपादन करु न ठेवण्यात आले आहे. या जमिनी कित्येक वर्षे तशाच पडून आहेत. ५५ टक्के जमीन वापरात आहे, तर ४५ टक्के जमिनीचा वापर होत नाही. तेथील प्रकल्प आधी पूर्ण करु न स्थानिकांना रोजगार देणे गरजेचे आहे.- 2013 चा भूसंपादन कायदा संसदेत संमत करण्यात आला. त्याचे कायद्यात रूपांतरही झाले आहे. परंतु २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला लागणाऱ्या जमिनीचे संपादन केले जात नाही. कारण त्याकायद्यानुसार शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीचे संपादन करता येत नाही. सरकारनेच केलेला कायदा नाकारणे हे लोकशाहीला घातक आहे.- सक्तीने संपादन करू नयेमाणगाव तालुक्यातील कालवण येथील आदिवासी बांधवांच्या सिलिंगच्या जमिनीची विक्र ी झाली आहे. त्याचा सातबारा तयार करून तिचे संपादन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशी आदिवासी समाजाची चार उदाहरणे आहेत. इकोसेंसिन्टिव्ह झोनमधील जमिनीही या प्रकल्पात गेल्या आहेत. संसदीय समितीपुढे सर्व माहिती ठेवण्यात आली आहे. त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे सक्तीने संपादन करु नये, अशी मागणी आहे.