शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कॉरिडॉरमुळे शेतकरी लागणार देशोधडीला

By admin | Updated: February 3, 2017 02:35 IST

दिल्ली-मुंबई, अमृतसर-कोलकाता, चेन्नई-बंगळूर, मुंबई-बंगळूर आणि विशाखपट्टणम-बंगळूर अशा पाच कॉरिडॉरमुळे देशाचा ४३ टक्के भूभाग प्रभावित होणार आहे. दिल्ली-मुंबई

- आविष्कार देसाई,  अलिबाग

दिल्ली-मुंबई, अमृतसर-कोलकाता, चेन्नई-बंगळूर, मुंबई-बंगळूर आणि विशाखपट्टणम-बंगळूर अशा पाच कॉरिडॉरमुळे देशाचा ४३ टक्के भूभाग प्रभावित होणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे शेतकऱ्यांची जमीन, गावठाण, नोकरीही मिळणार नसल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या प्रकल्पांना २०१३ चा भूसंपादन कायदा लागू झाला पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी आता सक्तीने संपादन करण्याचे पाऊल उचलण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यांनी सक्तीचे भूसंपादन थांबवावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या उल्का महाजन यांनी दिला. अलिबाग येथील रायगड जिल्हा पत्रकार भवन येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉर जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील १४ हजार १३७ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. जिल्ह्यात प्रकल्प येणार हे आधीच सत्ताधाऱ्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या हस्तकांनी तेथे जमिनी घेऊन त्या विकल्या आहेत. ज्यांना शेतीशी काही देणे घेणे नाही त्यांनी तातडीने संपादनाला संमती दिली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना याची माहिती दिली आहे. हेच मंत्री सत्तेमध्ये नव्हते तेव्हा आमच्या आंदोलनात सामील झाले होते, आता त्यांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असे महाजन यांनी सांगितले.- दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या संकल्पनेलाच आक्षेप आहे. लोकशाही पध्दतीने राबवलेला हा प्रकल्प नसून केवळ भांडवलदारांना खूश करण्यासाठीची ही योजना आहे. भारत सरकार आणि जपान सरकार यांच्यामध्ये एमओयू झाला आहे. जपानची यामध्ये २६ टक्के भागीदारी आहे. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी हजारो एकर जमिनीचे आधीच संपादन करु न ठेवण्यात आले आहे. या जमिनी कित्येक वर्षे तशाच पडून आहेत. ५५ टक्के जमीन वापरात आहे, तर ४५ टक्के जमिनीचा वापर होत नाही. तेथील प्रकल्प आधी पूर्ण करु न स्थानिकांना रोजगार देणे गरजेचे आहे.- 2013 चा भूसंपादन कायदा संसदेत संमत करण्यात आला. त्याचे कायद्यात रूपांतरही झाले आहे. परंतु २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला लागणाऱ्या जमिनीचे संपादन केले जात नाही. कारण त्याकायद्यानुसार शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीचे संपादन करता येत नाही. सरकारनेच केलेला कायदा नाकारणे हे लोकशाहीला घातक आहे.- सक्तीने संपादन करू नयेमाणगाव तालुक्यातील कालवण येथील आदिवासी बांधवांच्या सिलिंगच्या जमिनीची विक्र ी झाली आहे. त्याचा सातबारा तयार करून तिचे संपादन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशी आदिवासी समाजाची चार उदाहरणे आहेत. इकोसेंसिन्टिव्ह झोनमधील जमिनीही या प्रकल्पात गेल्या आहेत. संसदीय समितीपुढे सर्व माहिती ठेवण्यात आली आहे. त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे सक्तीने संपादन करु नये, अशी मागणी आहे.