शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

कॉरिडॉरमुळे शेतकरी लागणार देशोधडीला

By admin | Updated: February 3, 2017 02:35 IST

दिल्ली-मुंबई, अमृतसर-कोलकाता, चेन्नई-बंगळूर, मुंबई-बंगळूर आणि विशाखपट्टणम-बंगळूर अशा पाच कॉरिडॉरमुळे देशाचा ४३ टक्के भूभाग प्रभावित होणार आहे. दिल्ली-मुंबई

- आविष्कार देसाई,  अलिबाग

दिल्ली-मुंबई, अमृतसर-कोलकाता, चेन्नई-बंगळूर, मुंबई-बंगळूर आणि विशाखपट्टणम-बंगळूर अशा पाच कॉरिडॉरमुळे देशाचा ४३ टक्के भूभाग प्रभावित होणार आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे शेतकऱ्यांची जमीन, गावठाण, नोकरीही मिळणार नसल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या प्रकल्पांना २०१३ चा भूसंपादन कायदा लागू झाला पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी आता सक्तीने संपादन करण्याचे पाऊल उचलण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यांनी सक्तीचे भूसंपादन थांबवावे, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉरिडॉर विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या उल्का महाजन यांनी दिला. अलिबाग येथील रायगड जिल्हा पत्रकार भवन येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉर जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील १४ हजार १३७ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. जिल्ह्यात प्रकल्प येणार हे आधीच सत्ताधाऱ्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या हस्तकांनी तेथे जमिनी घेऊन त्या विकल्या आहेत. ज्यांना शेतीशी काही देणे घेणे नाही त्यांनी तातडीने संपादनाला संमती दिली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना याची माहिती दिली आहे. हेच मंत्री सत्तेमध्ये नव्हते तेव्हा आमच्या आंदोलनात सामील झाले होते, आता त्यांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असे महाजन यांनी सांगितले.- दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या संकल्पनेलाच आक्षेप आहे. लोकशाही पध्दतीने राबवलेला हा प्रकल्प नसून केवळ भांडवलदारांना खूश करण्यासाठीची ही योजना आहे. भारत सरकार आणि जपान सरकार यांच्यामध्ये एमओयू झाला आहे. जपानची यामध्ये २६ टक्के भागीदारी आहे. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी निर्माण करण्यासाठी हजारो एकर जमिनीचे आधीच संपादन करु न ठेवण्यात आले आहे. या जमिनी कित्येक वर्षे तशाच पडून आहेत. ५५ टक्के जमीन वापरात आहे, तर ४५ टक्के जमिनीचा वापर होत नाही. तेथील प्रकल्प आधी पूर्ण करु न स्थानिकांना रोजगार देणे गरजेचे आहे.- 2013 चा भूसंपादन कायदा संसदेत संमत करण्यात आला. त्याचे कायद्यात रूपांतरही झाले आहे. परंतु २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार दिल्ली-मुंबई कॉरिडॉरला लागणाऱ्या जमिनीचे संपादन केले जात नाही. कारण त्याकायद्यानुसार शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीचे संपादन करता येत नाही. सरकारनेच केलेला कायदा नाकारणे हे लोकशाहीला घातक आहे.- सक्तीने संपादन करू नयेमाणगाव तालुक्यातील कालवण येथील आदिवासी बांधवांच्या सिलिंगच्या जमिनीची विक्र ी झाली आहे. त्याचा सातबारा तयार करून तिचे संपादन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अशी आदिवासी समाजाची चार उदाहरणे आहेत. इकोसेंसिन्टिव्ह झोनमधील जमिनीही या प्रकल्पात गेल्या आहेत. संसदीय समितीपुढे सर्व माहिती ठेवण्यात आली आहे. त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे सक्तीने संपादन करु नये, अशी मागणी आहे.