शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला आला कॉर्पाेरेट लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:58 IST

दोन टेबलांच्या मधून एकच व्यक्ती जाईल, अशी गर्दीची जागा, फायलींचा साठलेला ढीग, डोक्यावर खडखड वाजणारा पंखा, असे सरकारी कार्यालयाचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत;

आविष्कार देसाईअलिबाग : नेहमीच अंधारलेल्या खोल्या, दोन टेबलांच्या मधून एकच व्यक्ती जाईल, अशी गर्दीची जागा, फायलींचा साठलेला ढीग, डोक्यावर खडखड वाजणारा पंखा, असे सरकारी कार्यालयाचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत; परंतु रायगड जिल्हा परिषद अशा गोष्टींना अपवाद ठरत असल्याचे दिसते. तब्बल ७० लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे मेकओव्हर होत आहे. नव्याने मिळणाऱ्या कॉर्पाेरेट लूकमुळे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्याला बळ मिळणार असल्याचे बोलले जाते.रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीला तब्बल ३० वर्षे उलटून गेली आहेत. आजही शिवतीर्थ नावाची ही देखणी वास्तू राज्याचे लक्ष वेधत आहे. शेकापचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी या वास्तूची उभारणी केली आहे. शिवरायांनी रयतेचे राज्य याच रायगडातून चालवले होते. त्यानुसारच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राज्यकारभार चालावा. या हेतूने प्रेरीत होऊनच प्रभाकर पाटील यांनी या इमारतीला शिवतीर्थ असे नाव दिले आहे. शिवतीर्थ इमारतीमध्ये महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अर्थ विभाग, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता यासह अन्य विभाग आहेत. त्याचप्रमाणे तीन सभागृह, विविध खात्याचे प्रमुख, सभापती यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये आहेत. नव्याने निवडून येणारे सदस्य आणि अधिकारी आपापल्या आवडीनुसार दालनाची सजावट करत आले आहेत; परंतु कर्मचाºयांना आता चांगल्या जागेत बसून काम करता येणार आहे.अर्थ विभागातील कार्यालयाची रचना कालबाह्य झाली होती. त्यामुळे अर्थ विभागाचे प्रमुख दत्तात्रेय पाथरुट यांनी मेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी पक्षाचे प्रभारी उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी त्यांना तातडीने मान्यता दिली. त्यानुसार आता अर्थ विभागातील कार्यालयाची रचना बदलण्यात आली आहे. बसण्यासाठी अतिशय सुटसुटीत जागा, चांगल्या दर्जाची बैठक व्यवस्था टेबल, खुर्ची, लख्ख प्रकाश, वातानुकूलित यंत्रणा, प्रत्येकाला स्वतंत्र शेल्फ, ड्रॉव्हर अशी व्यवस्था करण्यात येत आहे. अर्थ विभागामध्ये एकत्रित मिळून ४० कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे कॅशिअर, अकाउंट आॅफिसर, मुख्य लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी यांचे स्वंतत्र दालन उभारण्यात आले आहे.>उत्कृष्ट पद्धतीने सर्व अंतर्गत रचना निर्माण करण्यात आल्याने अर्थ विभागाच्या कार्यालयाला आता कॉर्पाेरेट कंपन्यांच्या कार्यालयासरखा लूक आला आहे. त्यामुळे आता काम करताना थकवा जाणवणार नाही, तसेच वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होऊन कर्मचाºयांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास अर्थ विभागाचे प्रमुख दत्तात्रेय पाथरुट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.>सुमारे ७० लाख रुपये यावर खर्च करण्यात आले आहेत. लवकरच या नवीन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचेही पाथरुट यांनी सांगितले. अंतर्गत रचना बदलण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळे वाळवी, आग यापासून पुढील १५ ते २० वर्षे संरक्षण होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लवकरच अन्य विभागातील कार्यालयांचा मेकओव्हर करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.