शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : शाळा बंद, खासगी शिकवण्या सुरूच, सरकारी आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:27 IST

सध्या शाळांमध्ये शुकशुकाट आहे. परंतु खासगी शिकवण्या मात्र सुरू आहेत. या शिकवण्यांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कळंबोली : रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शाळांमध्ये शुकशुकाट आहे. परंतु खासगी शिकवण्या मात्र सुरू आहेत. या शिकवण्यांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.पनवेल परिसरात खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासची संख्या मोठी आहे. या ठिकाणी लाखो रुपये शुल्क आकारून विद्यार्थ्यांना कोचिंग दिले जाते. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीच्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.त्यामध्ये खासगी शाळांचाही समावेश आहे. त्यानुसार सोमवारपासून सर्व शाळांमधील किलबिलाट बंद झाला. मात्र पनवेल परिसरातील खासगी शिकवण्या, कोचिंग क्लास सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक क्लासेसमध्ये शेकडो विद्यार्थी एका ठिकाणी बसतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र केवळ प्रतिष्ठेसाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरून खासगी कोचिंगवर कोणाचे नियंत्रण नसल्याचेही दिसून येत आहे. या शिकवण्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देणार असल्याचे नगरसेवक सतीश पाटील यांनी सांगितले.पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्या आशयाचे पत्रक आयुक्तांनी जारी केले आहे. खासगी क्लासेस सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. परंतु पालकांनीसुद्धा पाल्यांना अशा प्रकारे खासगी क्लासेसमध्ये पाठवणे टाळले पाहिजे, असे आवाहन मनपाकडून करीत आहोत.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल मनपाराष्ट्रीय आपत्ती घोषित झाल्यानंतरही शिक्षणाचा बाजार मांडलेल्या लोकांनी पैशासाठी खासगी शिकवण्या चालू ठेवल्या आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून खासगी शिकवण्या बंद करणे आवश्यक आहे.- अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर,कायदेतज्ज्ञ, नवी मुंबई

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना