शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: समाजमन जागृत ठेवून कोरोनाशी मुकाबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:10 IST

स्थानिक पातळीवर घेतली जातेय खबरदारी; उद्योगांची संख्या आणि महानगरचा शेजार ठरतोय धोकादायक

- आविष्कार देसाई रायगड : हा उद्योगांचा जिल्हा आहे. त्याचप्रमाणे महानगराला लागून असल्याने या ठिकाणी कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवून कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याची खबरदारी स्थानिक पातळीवर समाजमन जागृत ठेवून घेण्यात येत आहे.उद्योगधंद्यांचे जाळे ज्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात आहे तो जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असे समीकरण मांडण्यात येते. मात्र उद्योग आणि महानगराचा शेजार कधीकधी घातक ठरू शकतो हे अलीकडेच कोरोना प्रादुर्भावाच्या संख्येवरून दिसून येते. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे हे अगदी लगतचे जिल्हे आहेत. सुरुवातीपासूनच या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आला आहे. त्याचा विपरीत परिणाम हा रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढण्यावर झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये उरण, तळोजा, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या औद्योगिक पट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढलेला आहे. कारखान्यांतील कामगार, अधिकारी हे कोरोनाची शिकार झाल्याने स्थानिक पातळीवरील गावांमध्ये कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.कोरोनामुळे आज माणसाने माणूसपण हरवले आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये समाजमन जागे ठेवून कोरोनाशी मुकाबला करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा यांनी पावले टाकली आहेत. गावांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.सॅनिटायझरचा वापर, नाका-तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करणे, त्यांच्या नातेवाइकांना क्वारंटाइन करणे, त्याचप्रपाणे क्वारंटाइन केलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे, गावांमध्ये स्वच्छता ठेवणे, शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचे वाटप करणे असे विविध उपाय करण्यात येत आहेत. गावकऱ्यांना गावाबाहेर जायचे असेल तर ते मास्क आणि सॅनिटायझर घेऊनच बाहेर पडत आहेत.नेमके काय केले?कोरोनाला रोखण्यासाठी गावांमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे.दुकानामध्ये अथवा बोलताना सामाजिक अंतर राखण्यात येत आहे. नागरिक हि याबाबत सजग झाले आहेत.गावात नव्याने येणाºयांची नोंद ठेवून त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. नियम पाळले जात आहेत.क्वारंटाइन करण्यासाठी समाज मंदिर, शाळेच्या इमारतींत राहण्याची व्यवस्था करणे.क्वारंटाइन कालावधीमध्ये कोणी बाहेर पडणार नाही याची काळजी घेणे, जेवणाची औषधांची व्यवस्था करणे.क्वारंटाइन केलेल्यांच्या घरातील वयोवृद्ध, लहान मुले, महिला, गरोदर माता यांची काळजी घेणे.गावामध्ये सण, उत्सव साजरे न करण्यासाठी दवंडी देण्यात येत आहे.नागरिकांच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप करणे.प्रशासनाकडून कोरोनाबाबत येणाºया सूचना, आदेशांचे काटेकोर पालन के ले जात आहे.कोरोनामुळे समाजातील नागरिकांचे तंटे होऊ नयेत याची योग्य खबरदारी घेतली जात आहे.अडीच लाख नागरिक परतलेसध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बी-बियाणे, अवजारे यांची खरेदी करताना दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे अडीच लाख नागरिक आले होते. मुंबई-पुणे येथे काम-धंद्यानिमित्त हे नागरिक तेथे राहतात.कोरोना रोखण्यासाठी जनजागृतीकोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण पातळीवर जनजागृती के ली जातआहे. कोरोना रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज आहे, कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सरकारकडून आलेले निर्देश, सूचना यांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्क्रीनिंग करण्यात येत आहे.- किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगडभीती दूर के लीस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सॅनिटायझर, मास्कचा वापर, कोरोनाबाबतचे समज-गैरसमज याबाबत जनजागृती करून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली. कोरोनासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे.- सरिता भगत, सरपंच, वाडगावस्वच्छतेवर दिला भरकोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक अंतर राखणे यावर भर दिला. बाहेरून येणाºयांची तपासणी करण्यात येते. सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.- संजय पाटील, सरपंच, बेलकडेग्रामस्थांचे सहकार्यग्रामपंचायत हद्दीतील लोकांना मास्क लावण्यास सांगून कोणताही कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देतो. माझे सर्व सहकारी व ग्रामस्थ मला सहकार्य करतात.- सुरेश फराट, सरपंच, वरई तर्फे निड ग्रुप ग्रामपंचायत-कर्जतनिर्जंतुकीकरणावर भर गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत गावातून फलक लावले. चौकातून दवंडी देण्यात आली.- चंद्रकांत चाळके, सरपंच, शिस्तेमास्कची सक्तीबोर्लीपंचतन ग्रामपंचायत हद्दीत कॉर्नर बैठका, दवंडी आणि फलक लावून नागरिकांत जनजागृती करण्यात आली. मास्क वापरावर सक्ती करून, नागरिकांना सामाजिक अंतराचे भान ठेवण्यास सांगत आहोत.- उत्तम दिवेकर, उपसरपंचप्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिकाकोरोनाची दहशत प्रचंड असल्याने खासगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यास नकार देत होते. त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उभे होते. एखादा कोरोना रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर उपचार करण्यात येतात.अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोलग्रामीण भागामध्ये खºया अर्थाने सुदृढ आरोग्याची जबाबदारी ही अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर्स यांच्यावरच आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, औषधांचे वाटप करणे ही कामे करतानाच, शालेय पोषण आहाराचे वाटप करणे, गरोदर मातांचे संगोपन करणे अशी कामेही करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या