शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: समाजमन जागृत ठेवून कोरोनाशी मुकाबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:10 IST

स्थानिक पातळीवर घेतली जातेय खबरदारी; उद्योगांची संख्या आणि महानगरचा शेजार ठरतोय धोकादायक

- आविष्कार देसाई रायगड : हा उद्योगांचा जिल्हा आहे. त्याचप्रमाणे महानगराला लागून असल्याने या ठिकाणी कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवून कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याची खबरदारी स्थानिक पातळीवर समाजमन जागृत ठेवून घेण्यात येत आहे.उद्योगधंद्यांचे जाळे ज्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात आहे तो जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असे समीकरण मांडण्यात येते. मात्र उद्योग आणि महानगराचा शेजार कधीकधी घातक ठरू शकतो हे अलीकडेच कोरोना प्रादुर्भावाच्या संख्येवरून दिसून येते. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे हे अगदी लगतचे जिल्हे आहेत. सुरुवातीपासूनच या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आला आहे. त्याचा विपरीत परिणाम हा रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढण्यावर झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये उरण, तळोजा, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या औद्योगिक पट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढलेला आहे. कारखान्यांतील कामगार, अधिकारी हे कोरोनाची शिकार झाल्याने स्थानिक पातळीवरील गावांमध्ये कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.कोरोनामुळे आज माणसाने माणूसपण हरवले आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये समाजमन जागे ठेवून कोरोनाशी मुकाबला करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा यांनी पावले टाकली आहेत. गावांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.सॅनिटायझरचा वापर, नाका-तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करणे, त्यांच्या नातेवाइकांना क्वारंटाइन करणे, त्याचप्रपाणे क्वारंटाइन केलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे, गावांमध्ये स्वच्छता ठेवणे, शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचे वाटप करणे असे विविध उपाय करण्यात येत आहेत. गावकऱ्यांना गावाबाहेर जायचे असेल तर ते मास्क आणि सॅनिटायझर घेऊनच बाहेर पडत आहेत.नेमके काय केले?कोरोनाला रोखण्यासाठी गावांमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे.दुकानामध्ये अथवा बोलताना सामाजिक अंतर राखण्यात येत आहे. नागरिक हि याबाबत सजग झाले आहेत.गावात नव्याने येणाºयांची नोंद ठेवून त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. नियम पाळले जात आहेत.क्वारंटाइन करण्यासाठी समाज मंदिर, शाळेच्या इमारतींत राहण्याची व्यवस्था करणे.क्वारंटाइन कालावधीमध्ये कोणी बाहेर पडणार नाही याची काळजी घेणे, जेवणाची औषधांची व्यवस्था करणे.क्वारंटाइन केलेल्यांच्या घरातील वयोवृद्ध, लहान मुले, महिला, गरोदर माता यांची काळजी घेणे.गावामध्ये सण, उत्सव साजरे न करण्यासाठी दवंडी देण्यात येत आहे.नागरिकांच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप करणे.प्रशासनाकडून कोरोनाबाबत येणाºया सूचना, आदेशांचे काटेकोर पालन के ले जात आहे.कोरोनामुळे समाजातील नागरिकांचे तंटे होऊ नयेत याची योग्य खबरदारी घेतली जात आहे.अडीच लाख नागरिक परतलेसध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बी-बियाणे, अवजारे यांची खरेदी करताना दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे अडीच लाख नागरिक आले होते. मुंबई-पुणे येथे काम-धंद्यानिमित्त हे नागरिक तेथे राहतात.कोरोना रोखण्यासाठी जनजागृतीकोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण पातळीवर जनजागृती के ली जातआहे. कोरोना रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज आहे, कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सरकारकडून आलेले निर्देश, सूचना यांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्क्रीनिंग करण्यात येत आहे.- किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगडभीती दूर के लीस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सॅनिटायझर, मास्कचा वापर, कोरोनाबाबतचे समज-गैरसमज याबाबत जनजागृती करून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली. कोरोनासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे.- सरिता भगत, सरपंच, वाडगावस्वच्छतेवर दिला भरकोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक अंतर राखणे यावर भर दिला. बाहेरून येणाºयांची तपासणी करण्यात येते. सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.- संजय पाटील, सरपंच, बेलकडेग्रामस्थांचे सहकार्यग्रामपंचायत हद्दीतील लोकांना मास्क लावण्यास सांगून कोणताही कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देतो. माझे सर्व सहकारी व ग्रामस्थ मला सहकार्य करतात.- सुरेश फराट, सरपंच, वरई तर्फे निड ग्रुप ग्रामपंचायत-कर्जतनिर्जंतुकीकरणावर भर गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत गावातून फलक लावले. चौकातून दवंडी देण्यात आली.- चंद्रकांत चाळके, सरपंच, शिस्तेमास्कची सक्तीबोर्लीपंचतन ग्रामपंचायत हद्दीत कॉर्नर बैठका, दवंडी आणि फलक लावून नागरिकांत जनजागृती करण्यात आली. मास्क वापरावर सक्ती करून, नागरिकांना सामाजिक अंतराचे भान ठेवण्यास सांगत आहोत.- उत्तम दिवेकर, उपसरपंचप्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिकाकोरोनाची दहशत प्रचंड असल्याने खासगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यास नकार देत होते. त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उभे होते. एखादा कोरोना रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर उपचार करण्यात येतात.अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोलग्रामीण भागामध्ये खºया अर्थाने सुदृढ आरोग्याची जबाबदारी ही अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर्स यांच्यावरच आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, औषधांचे वाटप करणे ही कामे करतानाच, शालेय पोषण आहाराचे वाटप करणे, गरोदर मातांचे संगोपन करणे अशी कामेही करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या