शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: काेराेना विद्यार्थ्यांना पावला, शाळांना काेपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:24 IST

जिल्ह्यातील आठवीपर्यंतचे तीन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

रायगड : जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे तब्बल तीन लाख ७६ हजार २२२ विद्यार्थी थेट पास झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काेराेना पावला असे बाेलले जात आहे. मात्र शाळांमध्ये परीक्षाच हाेणार नसल्याने पालक शाळांमध्ये फी भरणार नाहीत. त्यामुळे काही शाळा या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.सध्या रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी ५०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यामध्ये वेगळी परिस्थिती नसल्याने काेराेना संसर्गाचा धाेका अधिक वाढला आहे. वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी सुरुवातीला सरकारने शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवली हाेती. त्यानंतर पुन्हा सुरू केली हाेती, मात्र आता सरकारने ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये सरकारी, खासगी, जिल्हा परिषद, पालिका, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ७६ हजार ९३३ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ हाेणार आहे. मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने शिक्षण विभागासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षाच झाली नसल्याने मुलांना पास करण्याचा निर्णय मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा हा अंतिम उपाय नाही.- संजीव नाईक, पालकसरकारने निर्णय घेतला आहे म्हणजे सर्व बाजू तपासूनच घेतला असणार. आधी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता आल्या नाहीत. आता सर्वच मुले पास असा निर्णय घेण्याची सरकारवर पुन्हा वेळ येऊ नये असे वाटते.- अविनाश पाटील, पालकसरकारने सरसकट मुलांना पास करण्याचा निर्णय घेणे हास्यास्पद आहे. ऑफलाइन परीक्षा घेता येत नसेल तर किमान ऑनलाइन तरी परीक्षा घेणे गरजेचे हाेते. परीक्षाच हाेणार नसेल, तर पालक शाळेमध्ये फी भरणारच नाहीत. त्यामुळे कायम विनाअनुदानीत शाळा आर्थिक अडचणीत सापडतील आणि हे अत्यंत धाेकादायक आहे.- अमर वार्डे, शिक्षणतज्ज्ञसर्वांनाच पास करण्याचा निर्णय घेताना सरकारला आनंद झाला असेल असे मला वाटत नाही. काेराेनामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांच्या मनावरही निश्चित परिणाम झाला आहे.- दयानंद गावडे, पालकपरीक्षा न देताच मुले पास हाेणे म्हणजे मुलांच्या भवितव्याचा पायाच कमकुवत करण्यासारखे आहे. परंतु काेराेनाच्या महामारीच्या संकटापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. त्याला सरकार तरी काय करणार?- हाफीज गाेंडेकर, पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस