शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

CoronaVirus News: काेराेना विद्यार्थ्यांना पावला, शाळांना काेपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:24 IST

जिल्ह्यातील आठवीपर्यंतचे तीन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

रायगड : जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे तब्बल तीन लाख ७६ हजार २२२ विद्यार्थी थेट पास झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काेराेना पावला असे बाेलले जात आहे. मात्र शाळांमध्ये परीक्षाच हाेणार नसल्याने पालक शाळांमध्ये फी भरणार नाहीत. त्यामुळे काही शाळा या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.सध्या रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी ५०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यामध्ये वेगळी परिस्थिती नसल्याने काेराेना संसर्गाचा धाेका अधिक वाढला आहे. वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी सुरुवातीला सरकारने शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवली हाेती. त्यानंतर पुन्हा सुरू केली हाेती, मात्र आता सरकारने ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये सरकारी, खासगी, जिल्हा परिषद, पालिका, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ७६ हजार ९३३ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ हाेणार आहे. मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने शिक्षण विभागासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षाच झाली नसल्याने मुलांना पास करण्याचा निर्णय मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा हा अंतिम उपाय नाही.- संजीव नाईक, पालकसरकारने निर्णय घेतला आहे म्हणजे सर्व बाजू तपासूनच घेतला असणार. आधी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता आल्या नाहीत. आता सर्वच मुले पास असा निर्णय घेण्याची सरकारवर पुन्हा वेळ येऊ नये असे वाटते.- अविनाश पाटील, पालकसरकारने सरसकट मुलांना पास करण्याचा निर्णय घेणे हास्यास्पद आहे. ऑफलाइन परीक्षा घेता येत नसेल तर किमान ऑनलाइन तरी परीक्षा घेणे गरजेचे हाेते. परीक्षाच हाेणार नसेल, तर पालक शाळेमध्ये फी भरणारच नाहीत. त्यामुळे कायम विनाअनुदानीत शाळा आर्थिक अडचणीत सापडतील आणि हे अत्यंत धाेकादायक आहे.- अमर वार्डे, शिक्षणतज्ज्ञसर्वांनाच पास करण्याचा निर्णय घेताना सरकारला आनंद झाला असेल असे मला वाटत नाही. काेराेनामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांच्या मनावरही निश्चित परिणाम झाला आहे.- दयानंद गावडे, पालकपरीक्षा न देताच मुले पास हाेणे म्हणजे मुलांच्या भवितव्याचा पायाच कमकुवत करण्यासारखे आहे. परंतु काेराेनाच्या महामारीच्या संकटापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. त्याला सरकार तरी काय करणार?- हाफीज गाेंडेकर, पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस