शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

CoronaVirus News: काेराेना विद्यार्थ्यांना पावला, शाळांना काेपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:24 IST

जिल्ह्यातील आठवीपर्यंतचे तीन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

रायगड : जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे तब्बल तीन लाख ७६ हजार २२२ विद्यार्थी थेट पास झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काेराेना पावला असे बाेलले जात आहे. मात्र शाळांमध्ये परीक्षाच हाेणार नसल्याने पालक शाळांमध्ये फी भरणार नाहीत. त्यामुळे काही शाळा या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.सध्या रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी ५०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यामध्ये वेगळी परिस्थिती नसल्याने काेराेना संसर्गाचा धाेका अधिक वाढला आहे. वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी सुरुवातीला सरकारने शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवली हाेती. त्यानंतर पुन्हा सुरू केली हाेती, मात्र आता सरकारने ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये सरकारी, खासगी, जिल्हा परिषद, पालिका, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ७६ हजार ९३३ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ हाेणार आहे. मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने शिक्षण विभागासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षाच झाली नसल्याने मुलांना पास करण्याचा निर्णय मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा हा अंतिम उपाय नाही.- संजीव नाईक, पालकसरकारने निर्णय घेतला आहे म्हणजे सर्व बाजू तपासूनच घेतला असणार. आधी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता आल्या नाहीत. आता सर्वच मुले पास असा निर्णय घेण्याची सरकारवर पुन्हा वेळ येऊ नये असे वाटते.- अविनाश पाटील, पालकसरकारने सरसकट मुलांना पास करण्याचा निर्णय घेणे हास्यास्पद आहे. ऑफलाइन परीक्षा घेता येत नसेल तर किमान ऑनलाइन तरी परीक्षा घेणे गरजेचे हाेते. परीक्षाच हाेणार नसेल, तर पालक शाळेमध्ये फी भरणारच नाहीत. त्यामुळे कायम विनाअनुदानीत शाळा आर्थिक अडचणीत सापडतील आणि हे अत्यंत धाेकादायक आहे.- अमर वार्डे, शिक्षणतज्ज्ञसर्वांनाच पास करण्याचा निर्णय घेताना सरकारला आनंद झाला असेल असे मला वाटत नाही. काेराेनामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांच्या मनावरही निश्चित परिणाम झाला आहे.- दयानंद गावडे, पालकपरीक्षा न देताच मुले पास हाेणे म्हणजे मुलांच्या भवितव्याचा पायाच कमकुवत करण्यासारखे आहे. परंतु काेराेनाच्या महामारीच्या संकटापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. त्याला सरकार तरी काय करणार?- हाफीज गाेंडेकर, पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस