शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Coronavirus: लॉकडाऊन हा पर्याय नाही; नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा बडगा उगारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:42 IST

कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी आणि आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच अलिबागमधील व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांना सूचना देण्यात येतील.

रायगड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. नागरिकांनीच कोरोनाचे गांभीर्य ओळखून नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोरोनासंबंधातील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईला तयार राहा, असा इशाराही ते द्यायला विसरले नाहीत.

रोहा, कर्जत, पेण, मुरुड आणि श्रीवर्धन शहरांमध्ये तीन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अलिबाग या महत्त्वाच्या शहरात मात्र अनलॉक आहे. शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन प्रभावी उपाय नसल्याचे नाईक यांनी सांगितले. सरकारनेही लॉकडाऊन करण्याला विरोध केला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही जिल्ह्यात लॉकडाऊन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील परिस्थित पाहून संबंधित स्वराज्य संस्था आवश्यक तो निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार, संबंधित ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून निर्णय घेतले जात आहेत. सर्वत्रच कोरोनाचा वाढता संसर्ग सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.

सध्या तालुक्यातील कोरोनाचा वाढता आकडा सर्वांचीच डोकेदुखी ठरली आहे. कोरोनाची चेन तोडण्याकरिता काही शहरांमध्ये तीन-चार दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे, तर काही शहर त्या दिशेने विचार करत आहेत. पेण, कर्जत, रोहा, मुरुड आणि श्रीवर्धन शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने बाजारपेठ, तसेच दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. हे जरी खरे असले, तरी तेथील कोरोनाचा वाढता संसर्ग थांबलेला नाही, ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही, असे प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून सलून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन करून त्यांचे अथवा अन्य व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यात ३४४९ कोरोनाबाधित1) जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३४४९ वर गेली आहे. आतापर्यंत १२८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उरण तालुक्यात २५५, कर्जत १२८, अलिबाग ११५ आणि पेणमध्ये १०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. अन्य तालुक्यांमधील हाच आकडा १०० च्या खाली आहे.2) शहरांचा विचार केल्यास पेण, रोहा, कर्जत या शहरांमध्ये कोरोनाने कहर केलेला आहे. त्या तुलनेत अलिबागची परिस्थिती बरी आहे.3) अलिबाग शहराला काही महत्त्वाच्या ग्रामपंचायती लागून आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका संभवतो, परंतु नागरिकांनीच खबरदारी घेतली पाहिजे. नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले.नागरिकांनी खबरदारी घ्यावीकोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी आणि आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच अलिबागमधील व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांना सूचना देण्यात येतील. त्यांनी आपल्या येथील गर्दी कमी करून सामाजिक अंतर राखण्यासाठी, तसेच सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस