शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कर्जतमध्ये पाच परदेशी नागरिक निगराणी कक्षात, कोरोना नसल्याचा तहसील कार्यालयाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:15 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत.

कर्जत : बाहेरच्या देशातून आलेल्या परदेशी पाच नागरिकांना कर्जत येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती कर्जत प्रशासनातर्फे देण्यात आली.कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने खबरदारी जिल्हा, तालुका पातळीवर घेण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात बाहेरच्या देशातून दुबईतून २, मलेशिया २, इंग्लंड १ असे पाच नागरिक आले आहेत. खबरदारी म्हणून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या निगराणी कक्षात त्यांना ठेवण्यात आले आहे.त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, मात्र ते परदेशातून आले आहेत म्हणून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवस डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा कर्जत तहसील प्रशासनाने दिला असून फक्त बाहेरच्या देशातून आले आहेत म्हणून त्यांना निगराणीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही असे देखिल स्पष्ट के ले आहे.११ ठिकाणी कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्षआरोग्य विभाग पंचायत समिती कर्जत कोरोना संक्रमण उपाययोजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत, यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सी.के. मोरे काम पाहत आहेत.कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल, नेरळ येथील सन्मान लॉज, वामनराव पै रामवाडी येथील जीवनविद्या मिशन, कळंबोली येथील रिवर गेट रिसॉर्ट, खांडपे येथील रेडिसन ब्ल्यू, वांजळे येथील डॉक्टर मोदी रिसॉर्ट, कळंब येथील दी रिच रिसॉर्ट, वारे कुरुंग रोड येथील फार्म लाइफ, मागार्ची वाडी येथील भीमाशंकर हिल आणि कोंठीबे येथील हरी ओम मठ अशा ११ ठिकाणी कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.उरणमधील रुग्णालयात ४० खाटांची व्यवस्थाउरण : राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारण करण्यासाठी उरण तालुक्यात युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी ४० खाटांच्या खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी कंबर कसली आहे. संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाला सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील बोकडवीरा येथील खासगी केअर पॉइंट रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आले असून ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेएनपीटीच्याट्रॉमा सेंटरमध्येही आपत्कालीनम्हणून आणखी आठ खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.परदेश दौऱ्यावरून परतलेल्या दहा व्यक्तींना खारघरमधील विलगीकरण केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.परिसरातील परीक्षा सुरू असलेल्या शाळा, महाविद्यालये वगळता इतर सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उरण परिसरात १५ ते ३१ मार्च दरम्यान होणाºया मोर्चे, जाहीर सभांच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारणासाठी उरण तालुक्यात युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाRaigadरायगड