शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus : कर्जतमध्ये पाच परदेशी नागरिक निगराणी कक्षात, कोरोना नसल्याचा तहसील कार्यालयाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:15 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत.

कर्जत : बाहेरच्या देशातून आलेल्या परदेशी पाच नागरिकांना कर्जत येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती कर्जत प्रशासनातर्फे देण्यात आली.कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत. त्यादृष्टीने खबरदारी जिल्हा, तालुका पातळीवर घेण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात बाहेरच्या देशातून दुबईतून २, मलेशिया २, इंग्लंड १ असे पाच नागरिक आले आहेत. खबरदारी म्हणून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या निगराणी कक्षात त्यांना ठेवण्यात आले आहे.त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत, मात्र ते परदेशातून आले आहेत म्हणून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवस डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचा निर्वाळा कर्जत तहसील प्रशासनाने दिला असून फक्त बाहेरच्या देशातून आले आहेत म्हणून त्यांना निगराणीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याची गरज नाही असे देखिल स्पष्ट के ले आहे.११ ठिकाणी कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्षआरोग्य विभाग पंचायत समिती कर्जत कोरोना संक्रमण उपाययोजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत, यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सी.के. मोरे काम पाहत आहेत.कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल, नेरळ येथील सन्मान लॉज, वामनराव पै रामवाडी येथील जीवनविद्या मिशन, कळंबोली येथील रिवर गेट रिसॉर्ट, खांडपे येथील रेडिसन ब्ल्यू, वांजळे येथील डॉक्टर मोदी रिसॉर्ट, कळंब येथील दी रिच रिसॉर्ट, वारे कुरुंग रोड येथील फार्म लाइफ, मागार्ची वाडी येथील भीमाशंकर हिल आणि कोंठीबे येथील हरी ओम मठ अशा ११ ठिकाणी कोरोना संक्रमण उपाययोजना तालुका नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.उरणमधील रुग्णालयात ४० खाटांची व्यवस्थाउरण : राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारण करण्यासाठी उरण तालुक्यात युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी ४० खाटांच्या खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशभरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून आली आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी कंबर कसली आहे. संसर्गजन्य कोरोनाचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाला सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील बोकडवीरा येथील खासगी केअर पॉइंट रुग्णालयाचे अधिग्रहण करण्यात आले असून ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेएनपीटीच्याट्रॉमा सेंटरमध्येही आपत्कालीनम्हणून आणखी आठ खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.परदेश दौऱ्यावरून परतलेल्या दहा व्यक्तींना खारघरमधील विलगीकरण केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.परिसरातील परीक्षा सुरू असलेल्या शाळा, महाविद्यालये वगळता इतर सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उरण परिसरात १५ ते ३१ मार्च दरम्यान होणाºया मोर्चे, जाहीर सभांच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा सामना आणि निवारणासाठी उरण तालुक्यात युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे.- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, उरण

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाRaigadरायगड