शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : २९ हजार नागरिकांना टंचाईची झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:40 IST

कोरोनाशी दोन हात करताना जिल्हा प्रशासनाने १७ टँकरच्या माध्यमातून तब्बल २९ हजार ४३७ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच जिल्ह्यातील १८१ गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. कोरोनाशी दोन हात करताना जिल्हा प्रशासनाने १७ टँकरच्या माध्यमातून तब्बल २९ हजार ४३७ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील २२ हजार ५८६ नागरिकांना पाणी-पाणी करावे लागत आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनासह सर्वच सरकारी यंत्रणा झटत आहेत. अलिबाग, पेण, पाली, रोहा, तळा, मुरूड, म्हसळा, महाड, माणगाव या नऊ तालुक्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे तालुके ग्रीन झोनमध्ये आहेत. मात्र पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, श्रीवर्धन आणि पोलादपूर या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.दुसरीकडे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नागरिकांना संचारबंदीमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावागावातील नदी, तलाव, विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे, तर विविध बोअरवेलमधील पाणी आटत चालले आहे. उन्हाचा तडाखा आगामी कालावधीत वाढण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.१५ तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे अशा तालुक्यांतील गावे, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका पेण तालुक्याला बसला आहे. येथील १० गावे, ७४ वाड्यांमधील एकूण २२ हजार ५८६ नागरिकांना सात खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील चार गावे, दोन वाड्यांतील दोन हजार ८९६ नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी येथे एका सामाजिक संस्थेची मदत घेण्यात आली आहे. महाड तालुक्यातील पाच गावे आणि ३७ वाड्यांमधील एकूण दोन हजार ३६५ नागरिकांना चार खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील १४ गावे आणि ३५ वाड्यांमधील एकूण एक हजार ५९० नागरिकांना पाच खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.>नियमित पाणीपुरवठा करावा - जिल्हाधिकारीजिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांमधील एकूण ३३ गावे, १४८ वाड्या असे मिळून एकूण १८१ गाव/वाड्यांमधील एकूण २९ हजार ४३७ नागरिकांना खासगी आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने १७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली. पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेने सतर्क राहावे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वच यंत्रणांनादिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या