शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

corona vaccination : लस जरा जपूनच वापरा, सरकारचे अलिखित फर्मान, १ एप्रिलपासून हाेणाऱ्या लसीकरणाला फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 02:18 IST

corona vaccination:  रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असतानाच काेराेना लसींचा तुटवडा जाणवत आहे. दीड लाख लसींची मागणी केली आहे मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही.

-  आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असतानाच काेराेना लसींचा तुटवडा जाणवत आहे. दीड लाख लसींची मागणी केली आहे मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यातच आहे तीच लस जपून वापरा असे अलिखित फर्मान सरकारने काढले आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील तब्बल साडेसात लाख नागरिकांना करण्यात येणाऱ्या लसीकरणाला फटका बसणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील लाेकसंख्येच्या २६ टक्के लाेकसंख्या ही ४५ वर्षाच्या वरील आहे. सुमारे साडे सात लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आराेग्य यंत्रणेने ठेवले आहे. यासाठी तब्बल १६ लाख काेराेनाची लस लागणार आहे. सध्या ८० लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. सुमारे १४० लसीकरण केंद्र उभारल्यानंतरच आणि मागणी केलेली लस उपलब्ध झाल्यावरच उद्दिष्ट गाठणे शक्य हाेणार आहे. सध्या जिल्ह्यात फक्त सुमारे १० हजार लस उपलब्ध आहे. तसेच दीड लाख लसीची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लसीकरण कसे करणार असा प्रश्न आराेग्य व्यवस्थेसमाेर उभा आहे.४५ वर्षांपुढील साडेसात लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरणजिल्ह्याच्या लाेकसंख्येच्या २६ टक्के म्हणजेच तब्बल साडेसात नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये व्याधी असणाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणावर लसीकरण करायचे असेल तर जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यांमध्ये किमान १४० ठिकाणी सुट्टी वगळता लसीकरण केंद्र सुरु करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे सुमारे १६ लाख लस उपलब्ध हाेणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या मागणी केलेली लस उपलब्ध झालेली नाही. लसीचा तु़डवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण कसे करणार असा प्रश्न आहे.सध्या मागणी किती, साठा मिळताे किती...जिल्ह्याला आतापर्यंत ८० हजार ६४४ लस उपलब्ध झालेली आहे. तसेच ती लाभार्थ्यांना टाेचूनही झालेली आहे. सध्या दीड लाख लसींची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही. लस जपून वापरा असे अलिखित निर्देश सरकारने दिले आहेत. त्यामुळे एवढ्या माेठ्या लाेकसंख्येला लसीकरण कसे करायचे असा प्रश्न आराेग्य व्यवस्थेसमाेर उभा आहे.सध्या ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना काेराेनाची लस देण्यात येणार आहे. तब्बल साडेसात लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १६ लाख डाेस लागणार आहेत. सरकारकडे सध्या दीड लाख लसींची मागणी केली आहे. ती लवकरच प्राप्त हाेईल.- डाॅ.गजानन गुंजकर (निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सरकारी रुग्णालय)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसRaigadरायगड