शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

रायगडमध्ये चाकरमान्यांमुळे पसरतोय कोरोना; जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:38 IST

महानगरात वाढणाऱ्या संसर्गाच्या भीतीने गावाकडे धाव

- आविष्कार देसाईअलिबाग : महानगरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावापुढे नागरिक हतबल झाले आहेत. कोरोना आपल्याला चिकटण्याआधी आपणच कोरोनापासून दूर जाऊया या भावनेने लाखोंच्या संख्येने चाकरमानी नागरिकांनी आपल्या गावाकडचे घर गाठण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिल्याचे दिसून येते.

कोरोनाचा हाहाकार सर्वत्रच झपाट्याने वाढतच चालला आहे. हजारो नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्ये कोरोनाने आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. कोरोनाला पोषक असणारे वातावरण नागरिकांकडूनच तयार केले जात असल्याने तो मानवी वस्तींच्या मुळावर उठला आहे. एकामागून एक अशा झपाट्याने कोरोनाने नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे.

काम-धंद्यानिमित्त कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने या महानगराकडे वळली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हेच नागरिक जीव वाचवण्यासाठी गावाकडे येत आहेत. आपल्या गावीच त्यांना सुरक्षित वाटत असल्याने लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच जिल्ह्यामध्ये एक लाख ३६ हजार चाकरमानी आले होते. त्यानंतर संचारबंदी आणि लॉकडाउनमुळे सर्वत्रच कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात चाकरमानी नागरिक येण्याला बºयापैकी ब्रेक लागला होता. दुसºया आणि तिसºया लॉकडाउनमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये कमालीची शिथिलता दिल्याने चाकरमानी नागरिकांनी ही संधी सोडली नाही. अधिकृत मार्गाने त्यांनी पुन्हा रायगडची वाट धरली. आतापर्यंत सुमारे सव्वा लाखाहून अधिक नागरिक आल्याचे समजते. येणारे नागरिक हे रेड झोन आणि कोरोनाबाधित क्षेत्रातून येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात कमतरता, गर्दीच्या ठिकाणी जाणे, सातत्याने हात न धुणे, मास्कचा वापर न करणे अशा कारणांनी कोरोनाने नागरिकांना गाठले आहे.

रायगडमध्ये ७५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सुरुवातीला पनवेल महापालिका, पनवेल ग्रमीण याच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. मात्र कोरोनाने आता उरणपासून ते थेट पोलादपूरपर्यंत हाहाकार पसरवला आहे. २४ मेपर्यंत पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीणमध्ये ५२२ रुग्णांची संख्या होती, तर अन्य १३ तालुक्यांमध्ये २३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आकडा ७५८ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३१७ रुग्णांवर उपचार सुरू होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड