शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

रायगडमध्ये चाकरमान्यांमुळे पसरतोय कोरोना; जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:38 IST

महानगरात वाढणाऱ्या संसर्गाच्या भीतीने गावाकडे धाव

- आविष्कार देसाईअलिबाग : महानगरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावापुढे नागरिक हतबल झाले आहेत. कोरोना आपल्याला चिकटण्याआधी आपणच कोरोनापासून दूर जाऊया या भावनेने लाखोंच्या संख्येने चाकरमानी नागरिकांनी आपल्या गावाकडचे घर गाठण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिल्याचे दिसून येते.

कोरोनाचा हाहाकार सर्वत्रच झपाट्याने वाढतच चालला आहे. हजारो नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्ये कोरोनाने आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. कोरोनाला पोषक असणारे वातावरण नागरिकांकडूनच तयार केले जात असल्याने तो मानवी वस्तींच्या मुळावर उठला आहे. एकामागून एक अशा झपाट्याने कोरोनाने नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे.

काम-धंद्यानिमित्त कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने या महानगराकडे वळली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हेच नागरिक जीव वाचवण्यासाठी गावाकडे येत आहेत. आपल्या गावीच त्यांना सुरक्षित वाटत असल्याने लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच जिल्ह्यामध्ये एक लाख ३६ हजार चाकरमानी आले होते. त्यानंतर संचारबंदी आणि लॉकडाउनमुळे सर्वत्रच कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात चाकरमानी नागरिक येण्याला बºयापैकी ब्रेक लागला होता. दुसºया आणि तिसºया लॉकडाउनमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये कमालीची शिथिलता दिल्याने चाकरमानी नागरिकांनी ही संधी सोडली नाही. अधिकृत मार्गाने त्यांनी पुन्हा रायगडची वाट धरली. आतापर्यंत सुमारे सव्वा लाखाहून अधिक नागरिक आल्याचे समजते. येणारे नागरिक हे रेड झोन आणि कोरोनाबाधित क्षेत्रातून येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात कमतरता, गर्दीच्या ठिकाणी जाणे, सातत्याने हात न धुणे, मास्कचा वापर न करणे अशा कारणांनी कोरोनाने नागरिकांना गाठले आहे.

रायगडमध्ये ७५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सुरुवातीला पनवेल महापालिका, पनवेल ग्रमीण याच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. मात्र कोरोनाने आता उरणपासून ते थेट पोलादपूरपर्यंत हाहाकार पसरवला आहे. २४ मेपर्यंत पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीणमध्ये ५२२ रुग्णांची संख्या होती, तर अन्य १३ तालुक्यांमध्ये २३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आकडा ७५८ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३१७ रुग्णांवर उपचार सुरू होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड