शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये चाकरमान्यांमुळे पसरतोय कोरोना; जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:38 IST

महानगरात वाढणाऱ्या संसर्गाच्या भीतीने गावाकडे धाव

- आविष्कार देसाईअलिबाग : महानगरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावापुढे नागरिक हतबल झाले आहेत. कोरोना आपल्याला चिकटण्याआधी आपणच कोरोनापासून दूर जाऊया या भावनेने लाखोंच्या संख्येने चाकरमानी नागरिकांनी आपल्या गावाकडचे घर गाठण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा आलेख चढता राहिल्याचे दिसून येते.

कोरोनाचा हाहाकार सर्वत्रच झपाट्याने वाढतच चालला आहे. हजारो नागरिकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसारख्या महानगरांमध्ये कोरोनाने आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. कोरोनाला पोषक असणारे वातावरण नागरिकांकडूनच तयार केले जात असल्याने तो मानवी वस्तींच्या मुळावर उठला आहे. एकामागून एक अशा झपाट्याने कोरोनाने नागरिकांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे.

काम-धंद्यानिमित्त कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने या महानगराकडे वळली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्याचा आकडा सर्वाधिक आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हेच नागरिक जीव वाचवण्यासाठी गावाकडे येत आहेत. आपल्या गावीच त्यांना सुरक्षित वाटत असल्याने लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यातच जिल्ह्यामध्ये एक लाख ३६ हजार चाकरमानी आले होते. त्यानंतर संचारबंदी आणि लॉकडाउनमुळे सर्वत्रच कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात चाकरमानी नागरिक येण्याला बºयापैकी ब्रेक लागला होता. दुसºया आणि तिसºया लॉकडाउनमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत होता.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये कमालीची शिथिलता दिल्याने चाकरमानी नागरिकांनी ही संधी सोडली नाही. अधिकृत मार्गाने त्यांनी पुन्हा रायगडची वाट धरली. आतापर्यंत सुमारे सव्वा लाखाहून अधिक नागरिक आल्याचे समजते. येणारे नागरिक हे रेड झोन आणि कोरोनाबाधित क्षेत्रातून येत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात कमतरता, गर्दीच्या ठिकाणी जाणे, सातत्याने हात न धुणे, मास्कचा वापर न करणे अशा कारणांनी कोरोनाने नागरिकांना गाठले आहे.

रायगडमध्ये ७५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सुरुवातीला पनवेल महापालिका, पनवेल ग्रमीण याच ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. मात्र कोरोनाने आता उरणपासून ते थेट पोलादपूरपर्यंत हाहाकार पसरवला आहे. २४ मेपर्यंत पनवेल महापालिका आणि पनवेल ग्रामीणमध्ये ५२२ रुग्णांची संख्या होती, तर अन्य १३ तालुक्यांमध्ये २३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आकडा ७५८ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामध्ये ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३१७ रुग्णांवर उपचार सुरू होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड