शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:20 IST

बेजबाबदारपणाला घरातल्यांनीच लगाम लावण्याची गरज 

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी तरुण मंडळी सर्वाधिक कारणीभूत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घरातच राहत असले तरी त्यांच्याच घरातील तरुण मंडळी विविध कारणांनी बाहेर जाऊन कोरोना घेऊन घरी परत येत असल्यामुळे घरातील मंडळी कोरोनाची शिकार होत असल्याचे दिसत आहे.भाजी, औषधी किंवा किराणा वगैरे घेण्याचे सोडून इतर कामाने किंवा मित्र मंडळींच्या भेटीगाठीसाठी तरुण मंडळी सहजरीत्या घराबाहेर पडत आहेत. कोरोनापेक्षा त्यांना पोलिसांची भीती वाटत असली तरी विविध कारणे पुढे करून ते घराबाहेर पडतात. बाहेरून घरात कोरोना आणल्यावर ते घरातील लोकांच्या संपर्कात येऊन ज्येष्ठ व बालकांना हसत-खेळत कोरोनाची भेट देत आहेत. यामुळेच २४ तास घरातच राहणारे ज्येष्ठ व लहान बालकेही कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी त्यांच्याच घरातील तरुण मंडळी कारणीभूत आहेत. ज्या तरुणांनी घरात कोरोना आणला ते सुखरूप आहेत. परंतु घरातील ज्येष्ठांना त्यांनी जीवन - मरणाच्या दारात नेऊन सोडले आहे. तरुणांच्या बेजबाबदारपणाला घरातीलच मंडळींनी लगाम लावण्याची गरज आहे व तेव्हाच कोरोनाला आळा बसेल.

 बाहेरून घरी आल्यास ही घ्या काळजी आपण कामानिमित्त किंवा बाजारातून घरी परतल्यास घरात प्रवेश करण्याच्या अगोदर साबणाने आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. जेणेकरून बाहेरून आलेला कोरोना विषाणू घरात प्रवेश करणार नाही.आंघोळ करण्यासाठी काढलेले कपडे व आंघोळीनंतरचे कपडे एका बादलीत कपडे धुण्याचे पावडर असलेल्या पाण्यात भिजत ठेवावेत. भाजीपाला आणल्यास तोही मिठाच्या पाण्यातून धुऊन काढावा. बाहेरून घरी आल्यावर गरम पाणी प्यावे, हळदीचा चहा घ्यावा, गरम अन्न खावे, आइसक्रीम किंवा थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नियमितपणे तोंडाला मास्क लावावा. शारीरिक अंतर ठेवूनच इतर आवश्यक कामे करावीत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडणारे स्वतःचा व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी प्रत्येकाने विचार करावा.- डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक

ही पाहा उदाहरणे...nसध्या लग्नसराईमुळे जणू कोरोनाला निमंत्रणच मिळाले आहे. लग्नसमारंभात झालेल्या गर्दीमुळे सध्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात तरुणाईचा हुल्लडबाजीपणा अंगलट येत आहे.nघरातील मंडळीशिवाय माझा दुसऱ्या कुणाशीही संपर्क आला नाही. घरातील मंडळी खूप कमी प्रमाणात घराबाहेर जातात. तरीही मी कोविड पॉझिटिव्ह आलो. गृहकामासाठी, काही साहित्य आणण्यासाठी घरातील मंडळी बाहेर जाणार नाही तर काय. परंतु खूप काळजी घेऊनही आम्ही पाॅझिटिव्ह आलो आहोत. आताही काळजी घेणे सुरूच असल्याचे एका आजोबांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस