शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रातोरात उभे राहिला कोपरा पुल; दहा वर्षाचा प्रश्न एका रात्रीत सुटला 

By वैभव गायकर | Updated: April 14, 2023 19:51 IST

या सोहळ्याला 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

वैभव गायकर 

पनवेल - प्रशासनाने ठरवले तर काहीही होऊ शकत हे खारघर मध्ये पहावयास मिळाले आहे.मागील दहा वर्षात जे झाले नाही ते रातोरात सिडकोने प्रशासनाने करून दाखवले आहे.दि.16 रोजी खारघर शहरात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा रंगणार आहे.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.यावेळी सोहळ्याला राज्यातील मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाची तत्परता पहावयास मिळत आहे.

या सोहळ्याला 20 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असल्याने शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या भावनेने सिडकोने रात्रभर तात्पुरत्या स्वरूपाचे पूल उभारले आहे.खारघर मधून सायनपनवेल हायवेला बाहेर पडता यावं म्हणून कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आहे. कोपरा पुलाजवळील वाहतूक कोंडी कित्येक वर्षाचा प्रश्न बिकट बनला आहे.याठिकाणी पर्यायी मार्ग सुरु करा म्हणुन माजी नगरसेवक प्रवीण पाटील,मनसेचे गणेश बनकर,शिवसेनेचे मनेश पाटील,माजी नगरसेवक नरेश ठाकुर,माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला.सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत निवेदन सादर केली.मात्र सिडकोने ते मनावर घेतले नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपुर्ण राज्यातील मंत्रिमंडळ खारघर शहरात दाखल होणार असल्याने रातोरात शहरात विकासकांना गती आली आहे.शहराला एक वेगळीच झळाळी मिळत आहे.कित्येक वर्षांपासून रखडलेला कोपरा पूल हे देखील याचे उत्तम उदाहरण आहे.