शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पाण्यासाठी टँकरभोवती गराडा, एक ते दोन हंड्यांच्या पाण्यावर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:54 IST

केंबुर्ली गावात भीषण पाणीटंचाई । एक ते दोन हंड्यांच्या पाण्यावर समाधान

सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा गावांना महाड पंचायत समितीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत गावांना होणारा पाणीपुरवठा हा अपुरा पडत आहे. महाड तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या केंबुर्ली गावाला भीषण पाणीटंचाईची झळ बसली आहे. गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, गावात टँकर शिरताच महिलांचा त्याच्याभोवती पाण्यासाठी गराडा पडतो.

महाड तालुक्यातील केंबुर्ली गावात गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. या गावात फक्त दोनच विहिरी असून, गावासाठी येणारी नळ पाणीपुरवठा योजनादेखील कधीच ठप्प झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिलासा म्हणून महाड पंचायत समितीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला जास्त पाणी मिळावे याकरिता टँकर गावात येताच त्याच्यामागे धावपळ करताना दिसतो.गेल्या अनेक वर्षांपासून केंबुर्ली गावाला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी तो अपुरा आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची, या ठिकाणी जलसंधारणाची, सिंचनाची कामे होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे स्थानिक सांगतात.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी