शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

विहूर धरणातून दूषित पाणीपुरवठा, ग्रामस्थ त्रस्त : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे तक्रार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:15 IST

Raigad News : या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली.

मुरुड : तालुक्यातील विहूर धरणातून मजगाव,उसरोली, नांदगाव, विहूर अशा चार ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सुमारे ३६ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येला या धरणातून पाणीपुरवठा होत असतो. एकमेव व अतिशय महत्त्वाचे असे धरण आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून या धरणातून दुर्गंधीयुक्त व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे या पाण्यामुळे असंख्य ग्रामस्थ त्रस्त झाले होते.या समस्येचे निराकरण व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालनात भेट घेऊन ही समस्या सोडविण्याची विनंती केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी.वेंगुर्लेकर उपस्थित होते.यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांनी विहूर धरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना पाठवून परिस्थितीचे अवलोकन करावे, विहूर धरणातून दुर्गंधीयुक्त पाणी येते का याचा तपास करावा, या समस्या कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी नवीन अंदाज पत्रक बनवून आवश्यक त्याबाबी पूर्ण करून घ्याव्यात, पुन्हा अशी समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश यावेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील यांनी विहूर धरणातून मुख्य पुरवठा करणारी वाहिनी लोखंडी टाकण्यात  आली आहे. याशिवाय ज्या पाइपलाइनमधून धरणाच्या पाण्याचा पुरवठा होतो, तिथे कचरा अडकू नये, यासाठी जाळी बसवणे आवश्यक होते, परंतु असे न केल्यामुळे पाइपलाइनमध्ये कचरा अडकून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. दोन वॉश आउट घेऊनही पाणी तसेच येत आहे. या ग्रामपंचायतींना पाण्याचा कोणताही स्रोत नाही. यासाठी विहूर धरणाची समस्या सोडवून द्यावी, अशी विनंती केली. उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले.   जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, मजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रीतम पाटील, सदस्य अमित कोळी, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अस्लम हलडे, सदस्य भाई सुर्वे, रमेश दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

उपायाची मागणी  उसरोली सरपंच मनीष नांदगावक यांनी, सध्या ग्रामपंचायतीच्या साठवण पाण्याच्या टाकीत टी.सी.एल टाकून पाणीपुरवठा करीत आहेत, परंतु आमचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. एकमेव हेच धरण चार ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारे आहे, तरी तातडीने उपाययोजना करण्याचे सांगितले. या समस्येकडे ल देण्याची मागणी केली आहे. 

पाणीसमस्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत असणार आहे. ग्रामपंचायतीमधील लोकांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद आपल्यासोबत आहे.-योगिता पारधी, अध्यक्षा, जिल्हा परिषद  

टॅग्स :Raigadरायगड