शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

लोकांशी संपर्क व भेटी वाढवायला हव्या - अदिती तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:39 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा.

मुरुड जंजिरा -  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. सरकारच्या चाललेल्या एककल्ली कारभारामुळे समस्त जनता त्रस्त आहे. याचा फायदा मिळवण्यासाठी मतदारांना आपल्यातला व त्यांच्यातील फरक दाखवून द्या. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते कसे मिळतील यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केले.पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मुरुड येथे आल्या होत्या. त्यावेळी गोल्डन स्वान येथील सभागृहात संपन्न झालेल्या सभेत त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अदिती तटकरे म्हणाल्या की, पदवीधर मतदार संघासाठी शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस व कवाडे गट व अन्य मित्र पक्षांचा पाठिंबा आहे. पदवीधर मतदार हा सुशिक्षित असून त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षांनी केली विकासकामे तसेच भविष्यात सत्ता मिळाल्यानंतर परिवर्तनात्मक योजना या विषयी विशेष माहिती देऊन मतदारांना आकर्षित करा. मतदारांच्या घरापर्यंत पोहचून जास्तीत जास्त मतदान करून घेणे सुद्धा आवश्यक आहे. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे असणारी जागा राष्ट्रवादीने जिंकली. यामध्ये बदल होणार नाही सदरची ही जागा पुन्हा राष्ट्रवादी पक्षच जिंकेल यासाठी कार्यकर्र्त्यांनी मेहनत घ्यावी व विजयश्री खेचून आणूया. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पक्षाला विजय मिळत असतो, असेही त्या यावेळी म्हणाल्या. नजीब मुल्ला हे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच कोकण मर्कंटाईल या बँकेचे चेअरमन सुद्धा आहेत. पदवीधर लोकांची मते मिळवण्यासाठी संपर्क व भेट या दोन गोष्टीवर विशेष लक्ष देण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी या रायगड जिल्ह्याचा खरा विकास आमदार सुनील तटकरे यांनी केला आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आमचे कार्यकर्ते मनापासून काम करून आपला उमेदवार निश्चित विजयी करतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आमच्या तालुक्याला विकास निधी सुद्धा दिला गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

टॅग्स :newsबातम्याPoliticsराजकारणRaigadरायगड