शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

लोकांशी संपर्क व भेटी वाढवायला हव्या - अदिती तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:39 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा.

मुरुड जंजिरा -  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोकणामधून जसा आपला उमेदवार विजयी झाला आहे, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी भेटी वाढवा. सरकारच्या चाललेल्या एककल्ली कारभारामुळे समस्त जनता त्रस्त आहे. याचा फायदा मिळवण्यासाठी मतदारांना आपल्यातला व त्यांच्यातील फरक दाखवून द्या. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते कसे मिळतील यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी केले.पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा मुरुड येथे आल्या होत्या. त्यावेळी गोल्डन स्वान येथील सभागृहात संपन्न झालेल्या सभेत त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. अदिती तटकरे म्हणाल्या की, पदवीधर मतदार संघासाठी शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस व कवाडे गट व अन्य मित्र पक्षांचा पाठिंबा आहे. पदवीधर मतदार हा सुशिक्षित असून त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षांनी केली विकासकामे तसेच भविष्यात सत्ता मिळाल्यानंतर परिवर्तनात्मक योजना या विषयी विशेष माहिती देऊन मतदारांना आकर्षित करा. मतदारांच्या घरापर्यंत पोहचून जास्तीत जास्त मतदान करून घेणे सुद्धा आवश्यक आहे. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे असणारी जागा राष्ट्रवादीने जिंकली. यामध्ये बदल होणार नाही सदरची ही जागा पुन्हा राष्ट्रवादी पक्षच जिंकेल यासाठी कार्यकर्र्त्यांनी मेहनत घ्यावी व विजयश्री खेचून आणूया. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच पक्षाला विजय मिळत असतो, असेही त्या यावेळी म्हणाल्या. नजीब मुल्ला हे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच कोकण मर्कंटाईल या बँकेचे चेअरमन सुद्धा आहेत. पदवीधर लोकांची मते मिळवण्यासाठी संपर्क व भेट या दोन गोष्टीवर विशेष लक्ष देण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी या रायगड जिल्ह्याचा खरा विकास आमदार सुनील तटकरे यांनी केला आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आमचे कार्यकर्ते मनापासून काम करून आपला उमेदवार निश्चित विजयी करतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. आमच्या तालुक्याला विकास निधी सुद्धा दिला गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

टॅग्स :newsबातम्याPoliticsराजकारणRaigadरायगड