शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

सेंद्रिय खतामुळे शेती उत्पादनात वाढ शक्य;कृषी विकासातील सीमोल्लंघनाचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:23 IST

हिरवा कचरा, भुईमुगाची टरफले, तांदळाचा तूस आदी कचºयापासून डिझेल निर्मितीचे पेटंट देशात सर्वप्रथम मिळविणारे रायगड जिल्ह्यातील गुळसुंदा येथील सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी, अलीकडेच सेंद्रिय शेतीस पोषक अशा कल्चरची निर्मिती केली आहे.

- जयंत धुळप ।अलिबाग : हिरवा कचरा, भुईमुगाची टरफले, तांदळाचा तूस आदी कचºयापासून डिझेल निर्मितीचे पेटंट देशात सर्वप्रथम मिळविणारे रायगड जिल्ह्यातील गुळसुंदा येथील सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी, अलीकडेच सेंद्रिय शेतीस पोषक अशा कल्चरची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीतून अधिक उत्पादन प्राप्त होऊ शकते, हे सप्रयोग सिद्ध करून ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘देशातील सेंद्रिय शेती’ याची सांगड घातल्यास, शेती उत्पादनात व आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतो, असा विश्वास सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आणि विजयादशमीच्या दिवशी कृषी विकासातील सीमोल्लंघनाचा आधुनिक विचार मांडला.सेंद्रिय शेती विषयी सध्या मोठ्या प्रमाणावर जागरूकता होत आहे; परंतु सेंद्रिय शेती म्हणजे नुसते शेण, लेंडी टाकून श्ोती न करता, काही नावीन्यपूर्ण गोष्टी मागवून सगळ्या प्रकारची न्यूट्रियन्ट (पोषक द्रव्ये) शेतीस मिळू शकतील, याचा विचार करणे गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यांत सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांनी संशोधन करून शोधून काढलेल्या सेंद्रिय खतांमध्ये देशी गाईचे शेण, देशीवाणाच्या बक ºयांची लेंडी, राख यांसारखे घटक वापरले आहेत. त्यातून पावडर प्रकारातील जमिनीत देण्याचे खत तयार करण्यात आले आहे.सेंद्रिय खतांच्या नियमित वापराने पिकांवरील किडींचे प्रमाण कमी होते. जमिनीचा पोत सुधारतो. तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. उत्पादनात वाढ होऊन उत्पादित मालाची गुणवत्ता देखील सुधारते. या सेंद्रिय खतांचा सर्व प्रकारची धान्ये उदा. भात, गहू, सोयाबिन, तूर, मूग, वाल, हरभरे, सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांवर अनेक ठिकाणी वापर चालू झालेला आहे व त्यातून दर्जेदार उत्पादनाबरोबरच उत्पादनवृद्धी होते, याचे स्पष्ट निष्कर्ष प्राप्त झाल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. राष्ट्रीय हिताच्या उपक्रमात नागरिकांचा स्वेच्छा सहभाग आवश्यक त्याकरिता घरातील ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे छोटेसे काम करून नागरिकांनी या राष्ट्रीय हिताच्या उपक्रमात स्वेच्छेने सहभाग देणे आवश्यक आहे. रासायनिक खतासाठी सरकारचे कोट्यवधी रुपयांचे दिले जाणार अनुदान वाचून, जमिनीचा ºहास थांबून सेंद्रिय आरोग्य संवर्धक उत्पादने देशवासीयांना उपलब्ध होतील, असा ठाम विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.मोफत खते उपलब्धशहरात व ग्रामीण भागात तयार होणाºया कचºयापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली, तर पहिल्या भागात कचºयाचे व्यवस्थापन व दुसºया भागात सेंद्रिय खतांची निर्मिती होऊन शेतकºयांना सेंद्रिय खते मोफत उपलब्ध करून देता येऊ शेकतील, असा विश्वास गाडगीळ यांना आहे.