शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खतामुळे शेती उत्पादनात वाढ शक्य;कृषी विकासातील सीमोल्लंघनाचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 05:23 IST

हिरवा कचरा, भुईमुगाची टरफले, तांदळाचा तूस आदी कचºयापासून डिझेल निर्मितीचे पेटंट देशात सर्वप्रथम मिळविणारे रायगड जिल्ह्यातील गुळसुंदा येथील सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी, अलीकडेच सेंद्रिय शेतीस पोषक अशा कल्चरची निर्मिती केली आहे.

- जयंत धुळप ।अलिबाग : हिरवा कचरा, भुईमुगाची टरफले, तांदळाचा तूस आदी कचºयापासून डिझेल निर्मितीचे पेटंट देशात सर्वप्रथम मिळविणारे रायगड जिल्ह्यातील गुळसुंदा येथील सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी, अलीकडेच सेंद्रिय शेतीस पोषक अशा कल्चरची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीतून अधिक उत्पादन प्राप्त होऊ शकते, हे सप्रयोग सिद्ध करून ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘देशातील सेंद्रिय शेती’ याची सांगड घातल्यास, शेती उत्पादनात व आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतो, असा विश्वास सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आणि विजयादशमीच्या दिवशी कृषी विकासातील सीमोल्लंघनाचा आधुनिक विचार मांडला.सेंद्रिय शेती विषयी सध्या मोठ्या प्रमाणावर जागरूकता होत आहे; परंतु सेंद्रिय शेती म्हणजे नुसते शेण, लेंडी टाकून श्ोती न करता, काही नावीन्यपूर्ण गोष्टी मागवून सगळ्या प्रकारची न्यूट्रियन्ट (पोषक द्रव्ये) शेतीस मिळू शकतील, याचा विचार करणे गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यांत सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांनी संशोधन करून शोधून काढलेल्या सेंद्रिय खतांमध्ये देशी गाईचे शेण, देशीवाणाच्या बक ºयांची लेंडी, राख यांसारखे घटक वापरले आहेत. त्यातून पावडर प्रकारातील जमिनीत देण्याचे खत तयार करण्यात आले आहे.सेंद्रिय खतांच्या नियमित वापराने पिकांवरील किडींचे प्रमाण कमी होते. जमिनीचा पोत सुधारतो. तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. उत्पादनात वाढ होऊन उत्पादित मालाची गुणवत्ता देखील सुधारते. या सेंद्रिय खतांचा सर्व प्रकारची धान्ये उदा. भात, गहू, सोयाबिन, तूर, मूग, वाल, हरभरे, सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांवर अनेक ठिकाणी वापर चालू झालेला आहे व त्यातून दर्जेदार उत्पादनाबरोबरच उत्पादनवृद्धी होते, याचे स्पष्ट निष्कर्ष प्राप्त झाल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. राष्ट्रीय हिताच्या उपक्रमात नागरिकांचा स्वेच्छा सहभाग आवश्यक त्याकरिता घरातील ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे छोटेसे काम करून नागरिकांनी या राष्ट्रीय हिताच्या उपक्रमात स्वेच्छेने सहभाग देणे आवश्यक आहे. रासायनिक खतासाठी सरकारचे कोट्यवधी रुपयांचे दिले जाणार अनुदान वाचून, जमिनीचा ºहास थांबून सेंद्रिय आरोग्य संवर्धक उत्पादने देशवासीयांना उपलब्ध होतील, असा ठाम विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.मोफत खते उपलब्धशहरात व ग्रामीण भागात तयार होणाºया कचºयापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली, तर पहिल्या भागात कचºयाचे व्यवस्थापन व दुसºया भागात सेंद्रिय खतांची निर्मिती होऊन शेतकºयांना सेंद्रिय खते मोफत उपलब्ध करून देता येऊ शेकतील, असा विश्वास गाडगीळ यांना आहे.