शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

फटाक्यांच्या किंमती वाढल्याने खरेदी करण्याकडे ग्राहकांची पाठ

By निखिल म्हात्रे | Updated: October 20, 2022 17:44 IST

सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षे सततच्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे अजूनतरी बाजारात शांततेचाच माहोल आहे.

अलिबाग - दिवाळीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना प्रादुर्भावाने मागील दोन वर्षे दिवाळी साधेपणाने साजरी केली. परंतु, यंदा फटाक्यांवरील बंदी हटविण्यात आल्याने बार फुटणार हे नक्की. परंतु अद्याप ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरविल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सध्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके आले आहेत. परंतु, गेली दोन वर्षे सततच्या सुरू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे अजूनतरी बाजारात शांततेचाच माहोल आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदाची दिवाळी साधेपणानेच, परंतु थोडी जल्लोषात साजरी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पण, असे असले तरीसुद्धा याचा मोठा फटका विक्रेत्यांना बसत आहे.

दरवर्षी दिवाळीची तयारी जवळपास 15-20 दिवस आधीच सुरू व्हायची. परंतु, कोरोनामुळे गेली दोन वर्षे या तयारीची लगबग हळूहळू कमी होताना दिसत आहे. तसेच सध्या लॉकडाऊनची टांगती तलवार या सणावर नसली तरीसुद्धा बाजारपेठांतील दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता असल्याने दुकानदारांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतु, कोरोनापूर्वी असणारी फटाक्यांसाठीची मागणी तेवढी दिसून येत नसल्याने पूर्वीसारखा धंदा होण्याची शक्यता फार तुरळक वाटत आहे.

फटाक्यांचे भाव वाढले 

दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु, यंदा फटाक्यांमध्ये फारसे काही नाविण्य पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे सालाबादप्रमाणे फुलबाज्या, पाऊस, चक्र, टिकल्या, बंदुका, आपटी बॉम्ब, रॉकेट, मटका बॉम्ब, लॅनटर्न, सुतळी बॉम्ब, लवंगी, लक्ष्मी बार व या सगळ्या प्रकारांमध्ये लहान-मोठ्या आकारांचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साधारणपणे 100 रुपयांपासून दोन-तीन हजारांपर्यंत या फटाक्यांच्या किमती आहेत. परंतु, अजूनही हव्या त्या प्रमाणात ग्राहकांची ये-जा नसल्याने मालाचा खप फारसा झालेला नाही.

फटाके अद्याप दुकानातच 

गेल्या वर्षी आणि यावर्षी धंद्याची परिस्थिती सारखीच असल्याचे, तसेच कोरोनामुळे सगळ्यांकडेच पैशांची कणकण भासत असल्याने आधीच ग्राहक नाहीत व त्यातही खरेदीसाठी येणारे ग्राहक सामानाचा भाव करून नेतात. परंतु, काहीच धंदा होत नसल्याने ग्राहक करत असलेल्या भावांसोबतच तडजोड करत असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

कोरोनामुळे सगळेच धंदे मंदावले आहेत. परंतु, आता लोकांची सगळीकडे वर्दळ सुरू झाली असल्याने ग्राहकांची पावले हळूहळू दुकानांकडे वळण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे यंदा जरा बरा धंदा होईल, असा अंदाज आहे.

- केदार मगर, फटाका विक्रेता. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022