शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उशिरा येणाऱ्या वीज बिलांमुळे ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:40 IST

सुधागडात ग्राहकांना दंडाचा अतिरिक्त भार; महावितरणविरोधात आंदोलन

पाली : वीज महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास सुधागड तालुक्यासह पालीतील वीज ग्राहकांना होत आहे. बहुतांश वीज ग्राहकांना वीज देयक हे नेहमी अंतिम देयक दिनांकानंतर येत आहेत. परिणामी, वेळेत बिल घरी न आल्याने ग्राहकांना वारंवार हकनाक अतिरिक्त दंड भरावा लागत आहे. वीज वितरण कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीची दखलही घेतली जात नाही. यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत.वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणाºया वीज देयकावर देयक दिनांक टाकण्यात येतो. हा देयक दिनांक म्हणजे ज्या वेळी वीज बिल सिस्टीममध्ये तयार होते ती तारीख असते. साधारण या तारखेच्या दहा दिवसांमध्ये ग्राहकांच्या घरी वीज बिल येणे अपेक्षित असते. अंतिम देयक दिनांकापासून बिल भरण्याची अंतिम तारीख घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळी असते; परंतु तोपर्यंतही अनेक ग्राहकांकडे वीज बिल पोहोचत नसल्याने ग्राहकांना हकनाक दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम वीज देयकाच्या रकमेवरून ठरते. दहा रुपयांपासून पुढे कित्येक रु पये दंड आकारला जातो. परिणामी, वीज बिल वितरक ठेकेदाराने घरी वीज बिल उशिरा आणल्याने कोणतीही चूक नसताना वीजग्राहकास दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.महावितरण कंपनीने वीज देयक वितरित करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे. सध्या वीज महावितरणचे कर्मचारीदेखील बिलांचे वाटप करत आहेत. अनेक वेळा या ठेकेदारांच्या हातात उशिरा बिले पडतात, तर काही वेळा देयके वाटण्यास उशीर झाल्याने ग्राहकांकडे वीज देयक उशिरा पोहोचते. तर काही वेळेला क्षेत्र मोठे असल्याने वीज देयक वेळेत पोहोचत नाहीत. बहुतांश ठिकाणी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याने आहेत त्यांनाच चालवून घ्यावे लागते. तर काही ग्राहकांची अशी तक्रार आहे की मुद्दामहून त्यांना उशिरा बिल दिले जाते.असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत प्रचंड राग व असंतोष निर्माण झाला असून, तालुक्यातील वीज ग्राहक महावितरणविरोधात लवकरच आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.ग्राहकांच्या सोयीसाठी आता आमच्या कर्मचाºयांमार्फत वीज देयक वाटत आहोत. केंद्रीय पद्धतीने वीज बिलिंग सुरू झाले आहे. प्रत्येकाचे अंतिम दिनांक वेगवेगळे येतात. बिलाची पीडीएफ उशिरा आली तर बिल द्यायला उशीर होतो. वीज देयक काही ठरावीक ग्राहकांनाच वारंवार उशिरा जात असतील तर त्याची दखल घेतली जाईल, अशी तक्र ार पुन्हा न येण्यासंदर्भात वीजवाटप करणाºयांनाही सांगण्यात आले आहे.- गोविंद बोईने, उपकार्यकारी अभियंता, वीज महावितरण कार्यालय, पालीवारंवार वीज देयकाच्या अंतिम दिनांकानंतर देयक घरी येते, त्यामुळे विनाकारण अतिरिक्त दंड भरावा लागतो. मागील सहा महिन्यांपासून पाली वीज वितरण कार्यालयाकडे लेखी पत्रव्यवहार करून या संदर्भात तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र, तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, तसेच वेळी-अवेळी म्हणजे पहाटे ५.३०च्या दरम्यानही घरात वीज देयक दिले जाते, त्यामुळे खूप मनस्ताप होतो. यावर वेळीच उपाययोजना होऊन अतिरिक्त दंडाची रक्कम परत करण्यात यावी.- भगवान शिंदे,वीज ग्राहक, नाडसूर

टॅग्स :electricityवीज