शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

दोन मासेमारी गटात समुद्रात संघर्ष, एलईडी फिशिंगवरून झाला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 02:11 IST

मासेमारी करणाऱ्या दोन गटांमध्ये मुरुड-कोर्लईच्या भरसमुद्रामध्ये संघर्ष उफाळून आला.

- आविष्कार देसाईअलिबाग : मासेमारी करणाऱ्या दोन गटांमध्ये मुरुड-कोर्लईच्या भरसमुद्रामध्ये संघर्ष उफाळून आला. अलिबाग तालुक्यातील आक्षीमधील एक गट एलईडी फिशिंग करत असल्याने त्यांना रेवस-बोडणीमधील मासेमारी करणाऱ्यांनी हटकले असता, दोन्ही गटांमध्ये वाद होऊन याचे रुपांतर हाणामारीमध्ये झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील बोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. बोडणीमधील मासेमारी करणाºयांनी आक्षीमधील बोटींवर ताबा मिळवला. त्यानंतर ते मांडव्याच्या दिशेने त्यांना घेऊन निघाले आहेत. त्यांना पोहोचण्यासाठी तब्बल सहा तासांचा अवधी लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.एलईडी फिशिंग करणे कायद्याने गुन्हा असतानाही आक्षी येथील चार मासेमारी बोटी एलईडीच्या माध्यमातून मुरुड-कोर्लई परिसरात मासेमारी करत होत्या. सदरची बाब रेवस-बोडणी येथील मासेमारी करणाºयांना आढळली. त्यामुळे त्यांनी आक्षीवाल्या बोटीतील मासेमारी करणाºयांना हटकले. त्याचा राग आल्याने एका गटाने दुसºया गटावर दगडफेक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे बोडणीमधील गटाने त्याच परिसरात मासेमारी करणाºया अन्य सहकाºयांशी संपर्क साधला. त्यानंतर काही कालावधीत अन्य बोटी तेथे आल्यानंतर दोन्ही गटामध्ये भरसमुद्रामध्य संघर्ष सुरू झाला. त्यानंतर रेवसमधील मासेमारी करणाºयांनी आक्षीच्या बोटींवर ताबा मिळवला आणि त्यांना पकडून मांडवा सागरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी ते निघाले. ही बाब आक्षीमधील अन्य मासेमारी करणाºयांना कळताच. तेथील काही मासेमारी करणारे पूर्ण तयारी करून आपल्या सहकाºयांच्या मदतीला निघाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रात्री उशिरापर्यंत हे नाट्य समुद्रामध्ये सुरू होते. आक्षी आणि बोडणी परिसरातील दोन गटांंमध्ये संघर्ष झाल्याची माहिती मिळाली आहे. सदरची घटना १२ नॉटिकल माइल्सच्या बाहेर झाली असल्याने हे प्रकरण मुंबई यलोगेट पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.याबाबत भारतीय तटरक्षक दलाचे सहायक कमांडंट कृष्णा कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुट्टीवर असल्याचे सांगितले. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी मुरुड येथील तटरक्षक दलाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या हाणामारीचा पुढे काही परिणाम होतात हे सांगणे कठीण आहे. मात्र अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दोन गटांमध्ये संघर्ष झालेला आहे. ही घटना १२ नॉटिकल माइल्सच्या बाहेरची आहे. असे असले तरी, संबंधितांनी आमच्याकडे तक्रार दिल्यास ती घेतली जाईल. अद्यापही दोन्ही गटांच्या बोटी समुद्रामध्येच प्रवासात आहेत. त्यांना पोहोचण्यासाठी सुमारे सहा तासांचा अवधी लागेल. परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.-अनिल पारस्कर,जिल्हा पोलीस अधीक्षक